शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:54 IST

विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देसहा वर्षानंतरही तपासणीच्या सोर्इंचा अभाव

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. या रोगाने अनेक लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. काहींचा मृत्यूही झाला आहे. जर राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.‘स्क्रब टायफस’चे पहिले प्रकरण आॅक्टोबर २०१२ मध्ये समोर आले. काटोल येथील कोलू गावातील कुसुम वानखेडे या महिलेला हा रोग झालाहोता. उपचारानंतर ही महिला बरी झाली होती. परंतु त्या नंतर या रोगाला घेऊन सामान्यांना माहिती देण्यासाठी जनजागृतीच झाली नाही. धक्कादायक म्हणाजे, स्क्रब टायफसच्या निदानासाठी आवश्यक ‘पीसीआर’सह आणखी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी, सहा वर्षांत या रोगाचा प्रकोप वाढला. सूत्रानुसार, यापूर्वीही या रोगाचे रुग्ण आढळून येत होते, काहींचा मृत्यूही झाला. परंतु प्रकरण समोर आले नसल्याने उपाययोजनाही झाल्या नाहीत. ‘लोकमत’ने पहिल्यांदा हे प्रकरण समोर आणल्याने उपाययोजनांना आता कुठे सुरूवात झाली.

कोमामध्ये होती कुसुम८ आॅक्टोबर २०१२ रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गंभीर अवस्थेत कुसुम वानखेडे यांना उपचारासाठी आणले. त्या कोमात होत्या. उपचारादरम्यान त्यांचे रक्त नमूने घेऊन डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर व व्हायरल तापाची तपासणी करण्यात आली. परंतु या रोगाचे लक्षण दिसून आले नव्हते. नंतर मेयोच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत जोशी यांनी उपचारादरम्यान कुसुमच्या छातीवर एक व्रण दिसला. त्यावरून ‘स्क्रब टायफस’ची शंका निर्माण झाली. नंतर रक्ताचे नमूने दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पाठविण्यात आले. १९ आॅक्टोबर २०१२ रोजी आलेल्या अहवालात ‘स्क्रब टायफस’ असल्याचे निदान झाले.२०१२ मध्ये प्रसिद्ध केले होते वृत्त‘स्क्रब टायफस’चे निदान झाल्यानंतर २३ आॅक्टोबर २०१२ रोजी ‘लोकमत’ने ‘गवतावर संभाळून चला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून रोगाची माहिती दिली होती. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले होते, उपचाराच्या सोई उपलब्ध करून दिल्या जात आहेत, रोगाला घेऊन जागरुक केले जात आहे.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य