शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:54 IST

विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देसहा वर्षानंतरही तपासणीच्या सोर्इंचा अभाव

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. या रोगाने अनेक लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. काहींचा मृत्यूही झाला आहे. जर राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.‘स्क्रब टायफस’चे पहिले प्रकरण आॅक्टोबर २०१२ मध्ये समोर आले. काटोल येथील कोलू गावातील कुसुम वानखेडे या महिलेला हा रोग झालाहोता. उपचारानंतर ही महिला बरी झाली होती. परंतु त्या नंतर या रोगाला घेऊन सामान्यांना माहिती देण्यासाठी जनजागृतीच झाली नाही. धक्कादायक म्हणाजे, स्क्रब टायफसच्या निदानासाठी आवश्यक ‘पीसीआर’सह आणखी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी, सहा वर्षांत या रोगाचा प्रकोप वाढला. सूत्रानुसार, यापूर्वीही या रोगाचे रुग्ण आढळून येत होते, काहींचा मृत्यूही झाला. परंतु प्रकरण समोर आले नसल्याने उपाययोजनाही झाल्या नाहीत. ‘लोकमत’ने पहिल्यांदा हे प्रकरण समोर आणल्याने उपाययोजनांना आता कुठे सुरूवात झाली.

कोमामध्ये होती कुसुम८ आॅक्टोबर २०१२ रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गंभीर अवस्थेत कुसुम वानखेडे यांना उपचारासाठी आणले. त्या कोमात होत्या. उपचारादरम्यान त्यांचे रक्त नमूने घेऊन डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर व व्हायरल तापाची तपासणी करण्यात आली. परंतु या रोगाचे लक्षण दिसून आले नव्हते. नंतर मेयोच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत जोशी यांनी उपचारादरम्यान कुसुमच्या छातीवर एक व्रण दिसला. त्यावरून ‘स्क्रब टायफस’ची शंका निर्माण झाली. नंतर रक्ताचे नमूने दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पाठविण्यात आले. १९ आॅक्टोबर २०१२ रोजी आलेल्या अहवालात ‘स्क्रब टायफस’ असल्याचे निदान झाले.२०१२ मध्ये प्रसिद्ध केले होते वृत्त‘स्क्रब टायफस’चे निदान झाल्यानंतर २३ आॅक्टोबर २०१२ रोजी ‘लोकमत’ने ‘गवतावर संभाळून चला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून रोगाची माहिती दिली होती. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले होते, उपचाराच्या सोई उपलब्ध करून दिल्या जात आहेत, रोगाला घेऊन जागरुक केले जात आहे.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य