शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 11:54 IST

विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देसहा वर्षानंतरही तपासणीच्या सोर्इंचा अभाव

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह बाजूच्या राज्यात वाढत असलेल्या ‘स्क्रब टायफस’च्या दहशतीचे वातावरण आहे. या रोगाने अनेक लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. काहींचा मृत्यूही झाला आहे. जर राज्य सरकार व आरोग्य विभागाने २०१२ पासूनच याच्या जनजागृतीची मोहीम राबवली असती व उपाययोजना केल्या असत्या तर हा रोग पसरला नसता, लोकांचे जीव वाचले असते, असे बोलले जात आहे.‘स्क्रब टायफस’चे पहिले प्रकरण आॅक्टोबर २०१२ मध्ये समोर आले. काटोल येथील कोलू गावातील कुसुम वानखेडे या महिलेला हा रोग झालाहोता. उपचारानंतर ही महिला बरी झाली होती. परंतु त्या नंतर या रोगाला घेऊन सामान्यांना माहिती देण्यासाठी जनजागृतीच झाली नाही. धक्कादायक म्हणाजे, स्क्रब टायफसच्या निदानासाठी आवश्यक ‘पीसीआर’सह आणखी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी, सहा वर्षांत या रोगाचा प्रकोप वाढला. सूत्रानुसार, यापूर्वीही या रोगाचे रुग्ण आढळून येत होते, काहींचा मृत्यूही झाला. परंतु प्रकरण समोर आले नसल्याने उपाययोजनाही झाल्या नाहीत. ‘लोकमत’ने पहिल्यांदा हे प्रकरण समोर आणल्याने उपाययोजनांना आता कुठे सुरूवात झाली.

कोमामध्ये होती कुसुम८ आॅक्टोबर २०१२ रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गंभीर अवस्थेत कुसुम वानखेडे यांना उपचारासाठी आणले. त्या कोमात होत्या. उपचारादरम्यान त्यांचे रक्त नमूने घेऊन डेंग्यू, मलेरिया, मेंदूज्वर व व्हायरल तापाची तपासणी करण्यात आली. परंतु या रोगाचे लक्षण दिसून आले नव्हते. नंतर मेयोच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत जोशी यांनी उपचारादरम्यान कुसुमच्या छातीवर एक व्रण दिसला. त्यावरून ‘स्क्रब टायफस’ची शंका निर्माण झाली. नंतर रक्ताचे नमूने दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पाठविण्यात आले. १९ आॅक्टोबर २०१२ रोजी आलेल्या अहवालात ‘स्क्रब टायफस’ असल्याचे निदान झाले.२०१२ मध्ये प्रसिद्ध केले होते वृत्त‘स्क्रब टायफस’चे निदान झाल्यानंतर २३ आॅक्टोबर २०१२ रोजी ‘लोकमत’ने ‘गवतावर संभाळून चला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून रोगाची माहिती दिली होती. त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले होते, उपचाराच्या सोई उपलब्ध करून दिल्या जात आहेत, रोगाला घेऊन जागरुक केले जात आहे.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य