शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१०० पटसंख्येच्या शाळांना मिळतील क्रीडा, चित्रकला, कार्यानुभवाचे निदेशक

By निशांत वानखेडे | Updated: June 7, 2025 18:49 IST

कंत्राटी तत्वावर नियुक्तिला शासनाची मंजुरी : कमी पटसंख्येच्या शाळांची निराशा

निशांत वानखेडे

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची संख्या १०० पेक्षा अधिक असेल तर त्या शाळांना क्रीडा, चित्रकला आणि कार्यानुभव विषयाच्या निदेशकांची नियुक्ती केली जाणार आहे. या शिक्षकांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर असेल. मात्र कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा हे विषय शिकण्याचा अधिकार नाही का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार बालकांच्या माेफत व सक्तिच्या शिक्षण कायद्या अंतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या वर्गातील ज्या शाळांमध्ये १०० पेक्षा जास्त पटसंख्या आहे, त्या शाळांमध्ये कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आराेग्य आणि कार्यशिक्षण विषयांकरीता कंत्राटी तत्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या शिक्षकांना तासिकानुसार मानधन दिले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियान याेजनेमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे अंशकालिन निदेशकांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर करण्याचा धाेरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयावर शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्या शाळांमध्ये १०० पेक्षा कमी पटसंख्या असेल तेथील विद्यार्थ्यांना कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव शिकण्याचे अधिकार नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थीच शिक्षण घेत असतात. त्यामुळे माेफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार त्यांनाही आहे, या शिक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी केली जात आहे. हा निर्णय कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी अन्यायाकारक असल्याच आराेप केला जात आहे.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये १०० विद्यार्थ्यांकरिता कला, क्रीडा, कार्यानुभवांचे अंशकालीन निदेशक नियुक्त करणे हे धोरण स्वागतार्ह आहे. पण शंभर पेक्षा कमी विद्यार्थी संख्या ज्या शाळांमध्ये आहे त्या गोरगरीब, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मुलांना कला, क्रीडा, कार्यानुभव शिकण्याचा अधिकार नाही का? कमी पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी खेळाडू, चित्रकार, गायक बनायचेच नाही का ? शिक्षण विभागाने आता आरटीई ॲक्ट ऐवजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा ही विचार करून जी.आर. निर्गमित करावे."

- अनिल शिवणकर, अध्यक्ष पूर्व विदर्भ, भाजप शिक्षक आघाडी

जिल्ह्यातील केवळ दाेनच शाळांना लाभया निर्णयाचे काही लाेक स्वागत करीत असले तरी सत्य वेगळेच आहे. शासनाचा हा निर्णय नागपूर जिल्ह्यात केवळ दाेन शाळांना लाभदायक ठरेल. ११८ पटसंख्या असलेली चानकापूर उच्च प्राथमिक शाळा आणि पाचगाव उमरेडची जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जिथे इयत्ता ६ ते ८ वीची १०६ पटसंख्या आहे.

टॅग्स :nagpurनागपूरSchoolशाळाEducationशिक्षण