शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही : शिक्षणमंत्री शेलार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:30 IST

जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.

ठळक मुद्देसत्यशोधन समिती गठित करण्यात येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.राज्यातील मराठी शाळेतील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार शासनाकडून होत आहे. नागपूर जिल्ह्यात ३८७ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या असून, १ ते ५ पटसंख्येच्या ३४ शाळा आहे. लोकमतने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. या सर्व शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने, शहरातील काही संस्थांनी मराठी शाळा बंद पाडण्याच्या शासन धोरणाला विरोध केला होता. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. कमी पटसंख्येच्या संदर्भात विविध मुद्दे उपस्थित करून, शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख केला होता.यासंदर्भात उत्तर देताना शेलार म्हणाले की, गेल्यावर्षी शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२९२ शाळेचे समायोजन नजीकच्या शळेत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पण काही भौगोलिक कारणाने अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्थानिक पडताळणी करून समायोजन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. गेल्यावर्षी ३९१ शाळांचे समायोजन करण्यात आले. यावर्षी राज्यात १३५४४ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे. तर ४७४९ शाळा १० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी