शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही : शिक्षणमंत्री शेलार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:30 IST

जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.

ठळक मुद्देसत्यशोधन समिती गठित करण्यात येईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.राज्यातील मराठी शाळेतील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार शासनाकडून होत आहे. नागपूर जिल्ह्यात ३८७ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या असून, १ ते ५ पटसंख्येच्या ३४ शाळा आहे. लोकमतने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. या सर्व शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने, शहरातील काही संस्थांनी मराठी शाळा बंद पाडण्याच्या शासन धोरणाला विरोध केला होता. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. कमी पटसंख्येच्या संदर्भात विविध मुद्दे उपस्थित करून, शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख केला होता.यासंदर्भात उत्तर देताना शेलार म्हणाले की, गेल्यावर्षी शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२९२ शाळेचे समायोजन नजीकच्या शळेत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पण काही भौगोलिक कारणाने अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्थानिक पडताळणी करून समायोजन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. गेल्यावर्षी ३९१ शाळांचे समायोजन करण्यात आले. यावर्षी राज्यात १३५४४ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे. तर ४७४९ शाळा १० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी