शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

शाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:06 AM

ज्या शाळेत मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे.

ठळक मुद्देमनपाच्या सुरेंद्रगड शाळेला दिले नवे रूप कृतीतून शिक्षणाचा नवा पायंडा

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या आणि पडक्या इमारती, अस्वच्छता, निरस वातावरण, पगार मिळतोय म्हणून काम करणारे शिक्षक, असे निराशादायी चित्र महापालिकेच्या अनेक शाळांचे बघायला मिळते. शासनाने अध्यापनाच्या पद्धती बदलल्या पण महापालिकेच्या शाळांमध्ये आजही तोच तो पणा कायम दिसतो. पण ज्या शाळेत प्रमुख म्हणजेच मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो अशा निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे. इमारत जुनी असली तरी, तिला कल्पकतेने बोलकी केल्याने, शाळेत आता विद्यार्थ्यांची किलबिलही वाढली आहे.युनेस्कोनेही अशीच काहीशी संकल्पना मांडली आहे. त्यांच्या बिल्डींग अ‍ॅण्ड लर्निंग एड (बाला) या प्रकल्पाअंतर्गत भकास शाळांचे आंतरिक आणि बाह्य रूप सजवून त्यांना ‘चाईल्ड फ्रेंडली’ करण्याची ही संकल्पना आहे. याच संकल्पनेतून मुख्याध्यापिका शीला अथिलकर यांनी येथे काम सुरू केले. जनमंच या स्वयंसेवी संस्थेची त्यांना साथ मिळाली. मिळणाऱ्या वेतनातून त्यांनी शाळेच्या रंगरंगोटीवर खर्च केला आणि शाळेमध्ये काही बदल घडवून आणला. शाळेच्या आत प्रवेश केल्यास येथे भारताचा नकाशा काढलेला आहे. त्यात सर्व धर्म समभावाचा संदेश त्यातून दिला आहे. निसर्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळवे, झाडे वाचवा झाडे जगवा असा संदेश दिला आहे. निसर्गातील सौंदर्य कलेच्या माध्यमातून शाळेच्या भिंतीवर रेखाटले आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, व्यायामाचे काय फायदे आहे, स्वच्छतेमुळे आरोग्य कसे सदृढ राहील, वाहतुकीचे नियम पाळणे किती गरजेचे आहे, आवश्यक तेवढाच विजेचा वापर करावा, अशा आशयाचे सामाजिक संदेश कार्टुन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले आहे. कुंचल्याच्या माध्यमातून भिंतीवर रंगछटा साकारून वातावरण निर्मिती केली आहे.त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमात झालेले कृतिशिल बदल हे वर्गामध्येही दिसून येत आहेत.त्यामुळे शाळेत नियमित होत असलेली स्वच्छता, निटनेटकेपणा यामुळे विद्यार्थी रमायला लागले आहेत. खासगी शाळांच्या धर्तीवर स्वच्छ पाणी, कम्प्युटर लॅब, सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधासुद्धा मनपाच्या शाळेत उपलब्ध करून दिल्या आहेत.

शाळेची प्रगती असो वा अधोगती ही शिक्षकांवरच अवलंबून असते. ज्या कर्तव्यासाठी सरकार आपल्याला वेतन देते ते कर्तव्य जर प्रामाणिक केले तर नक्कीच बदल घडून येतो. मी शाळेसाठी तेच केले आहे. थोडा आर्थिक भार मलाही पडला आहे. पण आज या शाळेची दखल घेतली जात असल्याचे समाधान आहे. कदाचित या बदलामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या ६०० पर्यंत गेली आहे.- शीला अथिलकर, मुख्याध्यापिका, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा, मनपा

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र