शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

पाण्याने तुडुंब भरलेल्या अंडरब्रिजमध्येस्कूल बस फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:06 IST

पिवळी नदीच्या वांजरा क्षेत्रातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेला अंडरब्रिज मंगळवारी पाण्याने तुडुंब भरला. या पुलाखाली स्कूल बस फसून बंद पडली. पाणी बसमध्ये शिरायला लागले. हे बघून मुले जीवाच्या आकांताने ओरडायला लागली.

ठळक मुद्देवांजरा क्षेत्रातील २२ वसाहतींचा मार्ग बंदनागरिकांसह विद्यार्थ्यांच्या जीवावर बेततेय संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिवळी नदीच्या वांजरा क्षेत्रातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेला अंडरब्रिज मंगळवारी पाण्याने तुडुंब भरला. या पुलाखाली स्कूल बस फसून बंद पडली. पाणी बसमध्ये शिरायला लागले. हे बघून मुले जीवाच्या आकांताने ओरडायला लागली. अखेर नागरिकांनी धाव घेऊन बंद पडलेली बस ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढली. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.वांजराच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाणी भरल्याने आजरी-माजरी, भिलगाव व वांजरा परिसरात जाणारे अनेक मार्ग बंद पडले आहेत. आजरी-माजरीकडून येणाऱ्या नागरिकांसाठी हाच एकमेव मार्ग आहे. मात्र अंडरब्रिज एवढा तुडुंब भरला की जणू तलावच वाटावा. यामुळे पायदळ चालणाऱ्या नागरिकांनी आणि दुचाकी वाहनधारकांनी रेल्वे गेट ओलांडून रस्ता पार केला. अशी परिस्थिती उद्भवली की नागरिक नाईलाजाने हा धोका पत्करतात. स्कूल बस अंडरब्रिज पार करू शकत नसल्याने विद्यार्थीही रेल्वे गेट ओलांडून पुढे जातात. यामुळे धोका वाढतो. परंतु अंडरब्रिजखाली पाणी असल्याने दुसरा पर्याय नसतो. अंडरब्रिजच्या पलीकडे वांजरा, आजरी-माजरी, बाबा दिवाण ले-आऊट, एकतानगर, शिवनगर, भिलगाव, सबीना ले-आऊट, करीमनगर, डायमंडनगर, संतोषीनगर, कळमना बायपास रोड, बिलालनगरसह सुमारे २२ रहिवासी क्षेत्र आहेत. या सर्व नागरिकांची पावसाच्या दिवसात तारांबळ उडते.टँकर अडला, भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंतीपावसामुळे अंडरब्रिज पाण्याने भरला असला तरी वांजरा, आजरी-माजरी क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. नॉन नेटवर्क क्षेत्र असल्याने वाजरा परिसरात पाईपलाईनच नाहीत. त्यामुळे या परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो. हा पुरवठा दुपारी होतो. मात्र वांजरा रेल्वे अंडरब्रिज पाण्याने भरल्याने टँकर पलीकडे पोहचू शकला नाही. अखेर प्रयत्नांची शिकस्त करून नागरिकांनी हा टँकरही पाण्यातून काढला.नागरिकांनी आधीच वेधले होते लक्षवांजरा रेल्वे अंडरब्रिजच्या बांधकामातील तांत्रिक दोषांबद्दल स्थानिक नागरिकांनी सुरुवातीपासून लक्ष वेधणे सुरू केले होते. मात्र कुणीच दखल घेतली नाही. नागरिकांनी सांगितल्यानुसार, हा रेल्वे अंडरब्रिज बांधताना व्यवस्थित उतार काढण्यात आला नाही. त्यामुळे थोड्या पावसातही पाणी साचते व मार्ग बंद पडतो. सुमारे दोन वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. यापूर्वी नागरिक रेल्वे रुळ ओलांडून जायचे. मात्र अपघाताच्या अनेक घटना घडल्याने आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्याने प्रशासनाने अंडरब्रिज बांधला. मात्र दोन वर्षातच मार्गावर खड्डे पडले. उतार व्यवस्थित काढण्यात आला नसल्याने पाणी लवकर साचते. वरच्या भागातील भींतीला लिकेज असल्याने पाणी गळत राहते.

टॅग्स :Studentविद्यार्थीBus DriverबसचालकRainपाऊस