शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

पाण्याने तुडुंब भरलेल्या अंडरब्रिजमध्येस्कूल बस फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:06 IST

पिवळी नदीच्या वांजरा क्षेत्रातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेला अंडरब्रिज मंगळवारी पाण्याने तुडुंब भरला. या पुलाखाली स्कूल बस फसून बंद पडली. पाणी बसमध्ये शिरायला लागले. हे बघून मुले जीवाच्या आकांताने ओरडायला लागली.

ठळक मुद्देवांजरा क्षेत्रातील २२ वसाहतींचा मार्ग बंदनागरिकांसह विद्यार्थ्यांच्या जीवावर बेततेय संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिवळी नदीच्या वांजरा क्षेत्रातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेला अंडरब्रिज मंगळवारी पाण्याने तुडुंब भरला. या पुलाखाली स्कूल बस फसून बंद पडली. पाणी बसमध्ये शिरायला लागले. हे बघून मुले जीवाच्या आकांताने ओरडायला लागली. अखेर नागरिकांनी धाव घेऊन बंद पडलेली बस ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढली. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.वांजराच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाणी भरल्याने आजरी-माजरी, भिलगाव व वांजरा परिसरात जाणारे अनेक मार्ग बंद पडले आहेत. आजरी-माजरीकडून येणाऱ्या नागरिकांसाठी हाच एकमेव मार्ग आहे. मात्र अंडरब्रिज एवढा तुडुंब भरला की जणू तलावच वाटावा. यामुळे पायदळ चालणाऱ्या नागरिकांनी आणि दुचाकी वाहनधारकांनी रेल्वे गेट ओलांडून रस्ता पार केला. अशी परिस्थिती उद्भवली की नागरिक नाईलाजाने हा धोका पत्करतात. स्कूल बस अंडरब्रिज पार करू शकत नसल्याने विद्यार्थीही रेल्वे गेट ओलांडून पुढे जातात. यामुळे धोका वाढतो. परंतु अंडरब्रिजखाली पाणी असल्याने दुसरा पर्याय नसतो. अंडरब्रिजच्या पलीकडे वांजरा, आजरी-माजरी, बाबा दिवाण ले-आऊट, एकतानगर, शिवनगर, भिलगाव, सबीना ले-आऊट, करीमनगर, डायमंडनगर, संतोषीनगर, कळमना बायपास रोड, बिलालनगरसह सुमारे २२ रहिवासी क्षेत्र आहेत. या सर्व नागरिकांची पावसाच्या दिवसात तारांबळ उडते.टँकर अडला, भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंतीपावसामुळे अंडरब्रिज पाण्याने भरला असला तरी वांजरा, आजरी-माजरी क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. नॉन नेटवर्क क्षेत्र असल्याने वाजरा परिसरात पाईपलाईनच नाहीत. त्यामुळे या परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो. हा पुरवठा दुपारी होतो. मात्र वांजरा रेल्वे अंडरब्रिज पाण्याने भरल्याने टँकर पलीकडे पोहचू शकला नाही. अखेर प्रयत्नांची शिकस्त करून नागरिकांनी हा टँकरही पाण्यातून काढला.नागरिकांनी आधीच वेधले होते लक्षवांजरा रेल्वे अंडरब्रिजच्या बांधकामातील तांत्रिक दोषांबद्दल स्थानिक नागरिकांनी सुरुवातीपासून लक्ष वेधणे सुरू केले होते. मात्र कुणीच दखल घेतली नाही. नागरिकांनी सांगितल्यानुसार, हा रेल्वे अंडरब्रिज बांधताना व्यवस्थित उतार काढण्यात आला नाही. त्यामुळे थोड्या पावसातही पाणी साचते व मार्ग बंद पडतो. सुमारे दोन वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. यापूर्वी नागरिक रेल्वे रुळ ओलांडून जायचे. मात्र अपघाताच्या अनेक घटना घडल्याने आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्याने प्रशासनाने अंडरब्रिज बांधला. मात्र दोन वर्षातच मार्गावर खड्डे पडले. उतार व्यवस्थित काढण्यात आला नसल्याने पाणी लवकर साचते. वरच्या भागातील भींतीला लिकेज असल्याने पाणी गळत राहते.

टॅग्स :Studentविद्यार्थीBus DriverबसचालकRainपाऊस