शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 16:26 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे.

नागपूर : वेतनश्रेणी, पदोन्नतीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनांतर्गत राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपल्या खूर्चीवर न बसता सतरंजीवर बसून प्रशासकीय कामे पार पाडली.

सामाजिक न्याय विभागात अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवले जातात. मात्र या विभागातील मुळ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जात नाही, त्यामुळे अधिकारी वर्गात प्रचंड असंतोष आहे. शासनाकडे यासंदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली, परंतु शासनाकडून दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे अधिकारी अधिकच संतप्त झाले. शेवटी राजपत्रित अधिकारी संघटनेने पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे असे सतरंजी आंदोलन पुकारले आहे. यात सामाजिक न्याय विभागातील सर्व राजपत्रित अधिऱ्यांनी आपापल्या कार्यालयात खुर्चीवर न बसता खाली सतरंजी टाकून प्रशासकीय कामे पार पाडली.

सामाजिक न्याय विभागातील सहायक आयुक्तांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यात यावी, सहआयुक्त व अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात यावी, समिती व विभागाच्या बळकटीकरणासाठी समाजकल्याणमधून सहा अध्यक्षपदे भरण्यात यावी, प्रशसकीय रचना सुधारावी,राजपत्रित अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, समाजकल्याण विभागात प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवू नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :agitationआंदोलनEmployeeकर्मचारीnagpurनागपूर