शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे

By नरेश डोंगरे | Updated: February 6, 2023 15:28 IST

विचारधनामुळे दोन्ही संमेलन श्रीमंत : चमक अन् चमकोगिरीचे कवित्व सुरू

नरेश डोंगरे 

नागपूर : ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा बिगुल फुंकणाऱ्या गांधी विनोबाच्या कर्मभूमीत एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनाची मशाल पेटली. या दोन्ही संमेलनात झालेली वैचारिक घुसळण अन् त्यातून बाहेर पडलेल्या विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे परतले. एका संमेलनाला लाभलेला राजाश्रय अन् दुसऱ्या संमेलनाची बांधिलकी आता कवित्व सुरू करून गेली आहे.

भक्कम वैचारिक उंचीच्या साहित्यीकांची उपस्थिती या दोन्ही संमलेनाच्या सर्वात मजबूत बाजू ठरल्या. त्यांनी उधळलेले विचारधन दोन्ही संमेलनाला अन् संमेलनात सहभागी झालेल्यांना श्रीमंत करणारे ठरले. त्यामुळे यात कोणते सरस अन् कोणते कमकुवत हा मुद्दाच चर्चेला नव्हता. परंतू संमलेनाला लाभलेल्या अर्थव्यवस्थेने दोन्हीकडची तुलना चर्चेला आणली. एकीकडे लोकवर्गणी अन् दुसरीकडे राज्यकर्त्यांसह व्यावसायिक मंडळींनी मुक्तहस्ते प्रवाहित केलेली अर्थगंगा या ज्ञानगंगेतील चमकदमक प्रदर्शीत करणारी ठरली.

विद्रोहित प्रत्येक जण घरातील लग्नकार्यासारखे स्वत:ला वाहून घेताना दिसले. केवळ स्वत:चे धनच नव्हे तर तन-मनसुद्धा खर्ची घालताना दिसले. त्यामुळे विद्रोही संमेलनाची चमक काहीशी वेगळी होती. ही चमक राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत वारंवार चर्चेला आली अन् काही आयोजकांचा अपवाद वगळता तिची मुक्तकंठाने प्रशंसाही झाली.

याऊलट दुसरीकडे चमकोगिरी जागोजागी दिसली. एक्स्पोर्ट केलेल्या तकलादू मंडळींच्या खांद्यावर संमेलनाच्या आयोजकांनी विविध जबाबदाऱ्या टाकल्या. त्यांची कुवत सोडा, चांगले करण्याची मानसिकताही नव्हती. स्वत:चे ब्रँडिंग करण्यासारखी त्यांची कृती असल्याने साहित्यिक, कवी, गझलकार अन् श्रोते या सर्वांचीच मानसिक ओढाताण झाली. अनेकांना प्रचंड मनस्तापही झाला. त्यामुळे आयोजकांना टिकेची झोडही सहन करावी लागली. त्याचमुळे सर्वकाही असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील चमक फिकी पडली अन् चमक तसेच चमकोगिरीतील फरकही स्पष्ट झाला.

बॉम्ब फुटले, ज्योती जळल्याच नाही

नावातच विद्रोह असला म्हणजे, बंडखोरी, वैचारिक लढा आलाच. मात्र, हा विद्रोह विचारांचा असून तो साहित्य तसेच समाज परिपक्व करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे अहिंसेची पदोपदी जाणीव करून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने उभारण्यात आलेल्या साहित्य नगरीतील आयोजकांशी संबंधित मंडळींनी चक्क अनुबॉम्ब फोडण्याचीच भाषा वापरली. विशेष म्हणजे, उद्घाटन सोहळ्याच्या वेळी समईतील ज्योतींनीही बराच वेळ पेटण्यास नकार दिला.

सारस्वतांना सुखावणारा पायंडा

या दोन्ही संमेलनाचे सर्वात चांगले फलित म्हणजे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्वत:च विद्रोहीच्या मंचावर जाऊन संमेलनाला दिलेल्या शुभेच्छा ठरावे. असे कधी झाले नसल्याने हा पायंडा भारतभरातीलच नव्हे तर देश-विदेशातील सारस्वतांनाही सुखावून टाकणारा ठरला.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा