शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे

By नरेश डोंगरे | Updated: February 6, 2023 15:28 IST

विचारधनामुळे दोन्ही संमेलन श्रीमंत : चमक अन् चमकोगिरीचे कवित्व सुरू

नरेश डोंगरे 

नागपूर : ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा बिगुल फुंकणाऱ्या गांधी विनोबाच्या कर्मभूमीत एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनाची मशाल पेटली. या दोन्ही संमेलनात झालेली वैचारिक घुसळण अन् त्यातून बाहेर पडलेल्या विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे परतले. एका संमेलनाला लाभलेला राजाश्रय अन् दुसऱ्या संमेलनाची बांधिलकी आता कवित्व सुरू करून गेली आहे.

भक्कम वैचारिक उंचीच्या साहित्यीकांची उपस्थिती या दोन्ही संमलेनाच्या सर्वात मजबूत बाजू ठरल्या. त्यांनी उधळलेले विचारधन दोन्ही संमेलनाला अन् संमेलनात सहभागी झालेल्यांना श्रीमंत करणारे ठरले. त्यामुळे यात कोणते सरस अन् कोणते कमकुवत हा मुद्दाच चर्चेला नव्हता. परंतू संमलेनाला लाभलेल्या अर्थव्यवस्थेने दोन्हीकडची तुलना चर्चेला आणली. एकीकडे लोकवर्गणी अन् दुसरीकडे राज्यकर्त्यांसह व्यावसायिक मंडळींनी मुक्तहस्ते प्रवाहित केलेली अर्थगंगा या ज्ञानगंगेतील चमकदमक प्रदर्शीत करणारी ठरली.

विद्रोहित प्रत्येक जण घरातील लग्नकार्यासारखे स्वत:ला वाहून घेताना दिसले. केवळ स्वत:चे धनच नव्हे तर तन-मनसुद्धा खर्ची घालताना दिसले. त्यामुळे विद्रोही संमेलनाची चमक काहीशी वेगळी होती. ही चमक राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत वारंवार चर्चेला आली अन् काही आयोजकांचा अपवाद वगळता तिची मुक्तकंठाने प्रशंसाही झाली.

याऊलट दुसरीकडे चमकोगिरी जागोजागी दिसली. एक्स्पोर्ट केलेल्या तकलादू मंडळींच्या खांद्यावर संमेलनाच्या आयोजकांनी विविध जबाबदाऱ्या टाकल्या. त्यांची कुवत सोडा, चांगले करण्याची मानसिकताही नव्हती. स्वत:चे ब्रँडिंग करण्यासारखी त्यांची कृती असल्याने साहित्यिक, कवी, गझलकार अन् श्रोते या सर्वांचीच मानसिक ओढाताण झाली. अनेकांना प्रचंड मनस्तापही झाला. त्यामुळे आयोजकांना टिकेची झोडही सहन करावी लागली. त्याचमुळे सर्वकाही असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील चमक फिकी पडली अन् चमक तसेच चमकोगिरीतील फरकही स्पष्ट झाला.

बॉम्ब फुटले, ज्योती जळल्याच नाही

नावातच विद्रोह असला म्हणजे, बंडखोरी, वैचारिक लढा आलाच. मात्र, हा विद्रोह विचारांचा असून तो साहित्य तसेच समाज परिपक्व करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे अहिंसेची पदोपदी जाणीव करून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने उभारण्यात आलेल्या साहित्य नगरीतील आयोजकांशी संबंधित मंडळींनी चक्क अनुबॉम्ब फोडण्याचीच भाषा वापरली. विशेष म्हणजे, उद्घाटन सोहळ्याच्या वेळी समईतील ज्योतींनीही बराच वेळ पेटण्यास नकार दिला.

सारस्वतांना सुखावणारा पायंडा

या दोन्ही संमेलनाचे सर्वात चांगले फलित म्हणजे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्वत:च विद्रोहीच्या मंचावर जाऊन संमेलनाला दिलेल्या शुभेच्छा ठरावे. असे कधी झाले नसल्याने हा पायंडा भारतभरातीलच नव्हे तर देश-विदेशातील सारस्वतांनाही सुखावून टाकणारा ठरला.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा