शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे

By नरेश डोंगरे | Updated: February 6, 2023 15:28 IST

विचारधनामुळे दोन्ही संमेलन श्रीमंत : चमक अन् चमकोगिरीचे कवित्व सुरू

नरेश डोंगरे 

नागपूर : ब्रिटीश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा बिगुल फुंकणाऱ्या गांधी विनोबाच्या कर्मभूमीत एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनाची मशाल पेटली. या दोन्ही संमेलनात झालेली वैचारिक घुसळण अन् त्यातून बाहेर पडलेल्या विचारांचा अमृत कलश घेऊन ठिकठिकाणचे सारस्वत आपापल्या गावांकडे परतले. एका संमेलनाला लाभलेला राजाश्रय अन् दुसऱ्या संमेलनाची बांधिलकी आता कवित्व सुरू करून गेली आहे.

भक्कम वैचारिक उंचीच्या साहित्यीकांची उपस्थिती या दोन्ही संमलेनाच्या सर्वात मजबूत बाजू ठरल्या. त्यांनी उधळलेले विचारधन दोन्ही संमेलनाला अन् संमेलनात सहभागी झालेल्यांना श्रीमंत करणारे ठरले. त्यामुळे यात कोणते सरस अन् कोणते कमकुवत हा मुद्दाच चर्चेला नव्हता. परंतू संमलेनाला लाभलेल्या अर्थव्यवस्थेने दोन्हीकडची तुलना चर्चेला आणली. एकीकडे लोकवर्गणी अन् दुसरीकडे राज्यकर्त्यांसह व्यावसायिक मंडळींनी मुक्तहस्ते प्रवाहित केलेली अर्थगंगा या ज्ञानगंगेतील चमकदमक प्रदर्शीत करणारी ठरली.

विद्रोहित प्रत्येक जण घरातील लग्नकार्यासारखे स्वत:ला वाहून घेताना दिसले. केवळ स्वत:चे धनच नव्हे तर तन-मनसुद्धा खर्ची घालताना दिसले. त्यामुळे विद्रोही संमेलनाची चमक काहीशी वेगळी होती. ही चमक राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत वारंवार चर्चेला आली अन् काही आयोजकांचा अपवाद वगळता तिची मुक्तकंठाने प्रशंसाही झाली.

याऊलट दुसरीकडे चमकोगिरी जागोजागी दिसली. एक्स्पोर्ट केलेल्या तकलादू मंडळींच्या खांद्यावर संमेलनाच्या आयोजकांनी विविध जबाबदाऱ्या टाकल्या. त्यांची कुवत सोडा, चांगले करण्याची मानसिकताही नव्हती. स्वत:चे ब्रँडिंग करण्यासारखी त्यांची कृती असल्याने साहित्यिक, कवी, गझलकार अन् श्रोते या सर्वांचीच मानसिक ओढाताण झाली. अनेकांना प्रचंड मनस्तापही झाला. त्यामुळे आयोजकांना टिकेची झोडही सहन करावी लागली. त्याचमुळे सर्वकाही असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील चमक फिकी पडली अन् चमक तसेच चमकोगिरीतील फरकही स्पष्ट झाला.

बॉम्ब फुटले, ज्योती जळल्याच नाही

नावातच विद्रोह असला म्हणजे, बंडखोरी, वैचारिक लढा आलाच. मात्र, हा विद्रोह विचारांचा असून तो साहित्य तसेच समाज परिपक्व करण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे अहिंसेची पदोपदी जाणीव करून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नावाने उभारण्यात आलेल्या साहित्य नगरीतील आयोजकांशी संबंधित मंडळींनी चक्क अनुबॉम्ब फोडण्याचीच भाषा वापरली. विशेष म्हणजे, उद्घाटन सोहळ्याच्या वेळी समईतील ज्योतींनीही बराच वेळ पेटण्यास नकार दिला.

सारस्वतांना सुखावणारा पायंडा

या दोन्ही संमेलनाचे सर्वात चांगले फलित म्हणजे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्वत:च विद्रोहीच्या मंचावर जाऊन संमेलनाला दिलेल्या शुभेच्छा ठरावे. असे कधी झाले नसल्याने हा पायंडा भारतभरातीलच नव्हे तर देश-विदेशातील सारस्वतांनाही सुखावून टाकणारा ठरला.

टॅग्स :literatureसाहित्यakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळwardha-acवर्धा