संथारा संतुष्ट जीवनाची श्रेष्ठ क्रिया
By Admin | Updated: August 23, 2015 03:06 IST2015-08-23T03:06:40+5:302015-08-23T03:06:40+5:30
जैन धर्माच्या संथारा प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध श्री जैन सेवा मंडळाने सोमवारी २४ आॅगस्ट रोजी देशव्यापी बंद आणि मूक रॅलीचे आयोजन केले आहे.

संथारा संतुष्ट जीवनाची श्रेष्ठ क्रिया
राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जैन समाजाची मूक रॅली
नागपूर : जैन धर्माच्या संथारा प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध श्री जैन सेवा मंडळाने सोमवारी २४ आॅगस्ट रोजी देशव्यापी बंद आणि मूक रॅलीचे आयोजन केले आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी देशभरातील जैन समाज एकजूट झाला असून स्थानिक स्तरावर या निर्णयाचा विरोध करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शनिवारी इतवारी भाजी मंडीस्थित अहिंसा भवनमध्ये पत्रपरिषद आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात जैन धर्माचे सर्व पंथ श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी, तेरापंथी आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंचावर जैन संत आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी, जैन मुनिश्री विनयसागरजी महाराज, मुनिश्री प्रशमरतिविजयजी महाराज, मुनिश्री रविनंदीजी महाराज, गिरनारसागरजी महाराज, साध्वी प्रफुल्लाजी, साध्वी विनम्रमतिजी उपस्थित होते. आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वरजी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, आम्ही आत्मा मानतो आणि आत्महत्येला विरोध करतो. संथारा एक आध्यात्मिक क्रिया आहे. आम्ही स्वत: रोज झोपतेवेळी संथारा करतो. मुनिश्री प्रशमरतिविजयजी महाराज म्हणाले की, संथारा त्या व्यक्तींसाठी आहे की, ज्या वृद्धावस्था, आजारपण, दुर्घटना आदी कारणांनी स्वत:च मृत्यूच्यानजीक पोहोचलेल्या आहेत. ज्यांची जीवन जगण्याची इच्छा समाप्त झालेली आहे, इच्छा नसलेला म्हणजेच संथारा होय. ही सती प्रथा नव्हे. प्रफुल्लाश्रीजी म्हणाले की, संथारा ही मृत्यूला महोत्सव बनविणारी श्रेष्ठ क्रिया आहे.
या प्रसंगी जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता, कार्याध्यक्ष दिलीप गांधी, महामंत्री सतीश पेंढारी, कोषाध्यक्ष रवींद्र आग्रेकर, नरेश पाटणी, सुरेश आग्रेकर, सुमत लल्ला, महेन्द्र कटारिया, निखील कुसमगर, गणेश जैन, संजय टक्कामोरे, दीपक शेंडेकर, मनोज बंड, रिचा जैन, संतोष पेंढारी, रोहित शाह, दिलीप रांका, ज्ञानचंद बरैया, दिनेश बेताला, सुभाष कोटेचा, मगनभाई दोशी, रमेश शाह, संतोष नेताजी, रतनदादा जैन, इंदरचंद पेटीस, महेन्द्र सिंघवी, कांतिलाल झामड, नरेन्द्र कोठारी, उमेश कोठारी, जितेन्द्र तोरावत, सुरेश डायमंड, दिलीप राखे, सुनील पेंढारी, छाया जैन, कश्मीरा पटवा, किरण मोहता, शीला उदापुरकर, अनिता गोठी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अशी निघेल मूक रॅली
जैन समाजाच्यावतीने राजस्थान हायकोर्टच्या निर्णयाविरुद्ध संथारा प्रथेच्या समर्थनार्थ सोमवारी २४ आॅगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. एक दिवस व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवणे, कार्यालयांमधून एक दिवसाची सुटी घेणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याबाबत जैन समाजाच्या लोकांना आवाहन करण्यात आले आहे. दुपारी १.३० वाजता गांधीबागेतील गांधी पुतळा चौकातून जैन साधू-साध्वींच्या नेतृत्वात मूक रॅली निघेल. ही रॅली कस्तूरचंद पार्क येथे विसर्जित होईल. या ठिकाणाहून एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावांचे निवेदन सादर करतील.