शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

संघ, आई आणि विद्यार्थी परिषद यांनी मला घडवले : नितीन गडकरी यांची पुस्तक प्रकाशनावेळी भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:01 IST

Nagpur : गडकरी यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोक आधी भारतावर विश्वास ठेवत नव्हते. परंतु, अलीकडच्या काही घडामोडींमधून क्षमता सिद्ध झाल्यामुळे लोक भारतावर विश्वास ठेवायला लागले आहेत. परिणामी, जगाचाही भारतावरील विश्वास वाढला आहे. भारत अशक्य ते शक्य करू शकतो, हे सर्वांना कळून चुकले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या 'संघातील मानवी व्यवस्थापन' या पुस्तकाचे शुक्रवारी आंबेकर आणि ज्येष्ठ संपादक व विचारवंत विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम राजहंस प्रकाशन व मंथन व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेपेठेतील वनामती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनामध्ये चारित्र्याला खूप महत्व आहे. देशामध्ये आधी शुद्ध चारित्र्याचे लोक होते. त्यामुळे हा देश हजारो वर्षापर्यंत एकसंघ राहू शकला. म्हणूनच संघ चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्याचे कार्य करतो. असे व्यक्तीच देशाला सर्वश्रेष्ठ बनवू शकतात. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांमुळे परिवारच एकत्र राहू शकत नाही, देश व संघटना तर दूरची गोष्ट आहे, असेही आंबेकर यावेळी म्हणाले.

घळसासी यांनी वर्तमान राजकीय नेत्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता दिसून येत नसल्यामुळे खंत व्यक्त केली. आज बहुतेक नेत्यांना संगीत, साहित्य व नाट्यामध्ये रुची नाही. ते वाचन करीत नाहीत. वैचारिक चर्चा करीत नाहीत. त्यामुळे अनेकांची अभिव्यक्ती उथळ व बटबटीत वाटते. असे नेते देशाची जडणघडण करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. राजहंस प्रकाशनचे संचालक नरेश सबजीवाले यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले तर, आशुतोष अडोणी यांनी संचालन केले.

राष्ट्र सर्वोतोपरी, ते समृद्ध व्हावेमाझ्याकरिता राष्ट्रच सर्वोतोपरी असून, ते समृद्ध व्हावे, हीच माझी नेहमी इच्छा असते, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. माझे जीवन आई, संघ आणि विद्यार्थी परिषदेमुळे घडले. कार्य, कर्तृत्व, जीद्द, चिकाटी, संवेदनशीलता, सहृदयता, समभाव आदी गुण या तिघांमुळेच मिळाले. त्यातून मी देशहिताकरिता उल्लेखनीय कामे करू शकलो. देश व समाजाकरिता काम करण्याची इच्छा असली की काहीच अशक्य राहत नाही. जगात जे काही चांगले आहे, ते सर्व भारतात आले पाहिजे आणि सर्वजन सुखी झाले पाहिजे, असे मला नेहमी वाटते, असे गडकरी यांनी सांगितले. विचारशून्यता ही आज देशाची मोठी समस्या आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ