शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

रेती घाटांचा पुन्हा लिलाव होणार रेती; धोरण बदलण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:01 IST

ना लाभ ना तोटा या तत्वावर नवे धोरण : याचवर्षी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: सध्याचे रेती धोरण बदलण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी आधीच केली आहे. त्यादृष्टीने धोरण बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्याच्या पद्धतीमुळे सरकारला रेती घाटांमधून फारसा महसूल मिळत नसल्याने पुन्हा लिलाव पद्धत सुरू केली जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.

पूर्वी रेती घाटांचा लिलाव केला जात होता. घाटांबाबत पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागत होती. लिलावात जो अधिक बोली बोलले त्याला घाट मिळत होता. यातून सरकारलाही मोठा महसूल मिळायचा. परंतु नंतर अवैध उत्खनन होऊ लागले. रेती माफिया तयार झाले. अधिकाऱ्यांवर हल्ले वाढले. अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध उत्खनन होत असल्याचे आरोपही होऊ लागले. यावर आळा घालण्यासाठी सरकारने नवे धोरण आणले. तेव्हा ना लाभ ना तोटा या तत्वावर नवे धोरण असल्याचा दावा सरकारने केला. 

या धोरणानुसार प्रतिब्रास रेतीचे दर निश्चित करण्यात आले. वाहतूक खर्च वेगळा ठरविण्यात आला. रेती डेपो हे खासगी व्यक्तींना देण्यात आले. त्यावर खनिकर्म विभागाची पाळत ठेवण्यात आली. परंतु यामुळेही ग्राहकांची लूट होत असल्याचे आरोप झालेत. तसेच शासनाचे महसूल घटले. त्यामुळे यात सुधारणा करण्याची मागणी समोर आली. त्यासाठी शासनाने नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला.

समितीने लिलावाच्या माध्यमातूनच रेती घाट देण्याची शिफारस केल्याचे सांगितले जाते. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार खनिकर्म विभागाला शासनाने एक पत्र पाठवून नवे धोरण तयार केले जात असल्याने रेती घाटासंदर्भातील कुठलेही नवीन टेंडर काढण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे याच वर्षापासून रेती घाटांचे लिलाव सुरू होतील, अशी माहिती आहे.

४० घाट, ११ डेपो

  • नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण ४० घाट आहेत. 
  • सध्याच्या धोरणानुसार निविदा काढून तीन वर्षासाठी घाट खासगी व्यक्तीला उपशासाठी देण्यात आल्या आहेत.
  • त्यावर विभागाचे नियंत्रण आहे. एकूण ११ डेपो तयार करण्यात आले असून, यातून रेती विक्री होते.

 

टॅग्स :nagpurनागपूरsandवाळूmafiaमाफिया