शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 17:51 IST

या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत.

नागपूर : समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्राच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ व्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन २ जुलै रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार तरुण विजय यांच्या हस्ते होणार आहे. सिव्हिल लाईन्स स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत होणाऱ्या या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत.

तत्पूर्वी, सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ग्रंथप्रदर्शन, समरसता रांगोळी प्रदर्शन आणि चित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सकाळी १० वाजता गुरुदेव सोरदे स्मृती व्यासपीठावर होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी संमेलनाध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभूणे, समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. प्रसन्न पाटील, निमंत्रक सुनील वारे, कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनासाठी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४०० प्रतिनिधींची नोंदणी झालेली आहे.

- साहित्याचा होणार जागर

उद्घाटन सत्रानंतर दुपारी १२ वाजता होणाऱ्या पहिल्या परिसंवादात ‘अण्णा भाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’ विषयावर अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख भाष्य करणार असून डॉ. भास्कर म्हरसाळे, डॉ. कोमल ठाकरे, शिवा कांबळे व डॉ. विजय तुंटे यांचाही सहभाग राहील. दुपारी ३ वाजता वाजता होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे ‘अण्णा भाऊ साठे : समतेचे पथिक’ विषयावर भाष्य करतील. यात डॉ. धनंजय भिसे, डॉ. अंबादास सकट, डॉ. उज्ज्वला हातागळे व हेमंत चोपडे यांचा सहभाग राहणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता दुर्गेश सोनार यांच्या अध्यक्षतेत निमंत्रित कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय, दुपारी १ वाजता मुक्त काव्यमंच, सायंकाळी ४ वाजता विषयनिष्ठ भाषणामध्ये ‘समरसतेची चिंतनसूत्रे’ विषयावर विवेक साप्ताहिकाचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांचे भाषण आणि रात्री ८ वाजता होणाऱ्या संगीत रजनीचे आयोजन केले जाणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकnagpurनागपूर