शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री; ६५२ जणांकडून ३० लाख दंड वसूल

By नरेश डोंगरे | Updated: June 2, 2024 21:16 IST

महिनाभरात रेल्वेची कारवाई : मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरखपूर एक्स्प्रेसमधील बिर्याणी प्रकरण तापल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिनाभरात रेल्वेत खानपानाच्या चिजवस्तू विकणाऱ्यांना चांगलेच टाइट केले आहे. या पार्श्वभूमीवर, परवानगी नसताना विविध खाद्यपदार्थ तसेच पेय विकणाऱ्या ६५२ जणांना कारवाईचा दणका दिला आहे.

महिनाभरापूर्वी गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या ७० जणांना बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून घेतलेली बिर्याणी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणाचे पडसाद सर्वदूर उमटल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. विविध रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये अनधिकृत व्हेंडर्सचा सुळसुळाट झाल्याचे ध्यानात घेऊन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी कडक भूमिका घेऊन रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर चालणाऱ्या सर्व गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, १ मे पासून ठिकठिकाणी कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

प्रवाशांच्या आरोग्यास पोषक आणि दर्जेदार खानपान सेवा देण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील पँट्री कार आणि कॅटरिंग स्टॉल्सची कसून तपासणी सुरू झाली. या कारवाईत दर्जाहीन अन् परवानगी नसणारे पदार्थ, पाणी तसेच ६५२ अनधिकृत विक्रेते आढळले. अनिमियतता बाळगणाऱ्या १४४ पॅन्ट्री कारच्या चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडापोटी २७.४५ लाख रुपये वसूल करण्यात आले.

ठरवून दिलेल्या मानकांचे पालन न करणाऱ्या ८३ कॅटरिंग स्टॉल्सवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेत नीर पाण्याच्या बाटलीशिवाय दुसऱ्या पाणी बॉटल्स विकण्यात मनाई असूनही दुसऱ्याच पाण्याच्या बाटल्या विकल्या जात असल्याचे तपासणीत उघड झाले. अशा २६८८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. लेबल (स्टिकर) शिवाय विकली जाणारी खाद्यपदार्थांची १२२ पाकिटेही जप्त करण्यात आली.प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध : मित्तल

प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती मिळावी. तसेच त्यांना दर्जेदार खाद्यपदार्थ, पेय आणि पिण्याचे पाणी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे. अनधिकृत विक्रेत्यांमुळे आरोग्यास अपायकारक पदार्थ विकले जाऊ नये आणि प्रवाशांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून ती यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी कळविले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेfood poisoningअन्नातून विषबाधा