शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

संतांनी भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:50 IST

कुणाच्या आयुष्याला दिशा दिली तर कुणाच्या जीवनात परिवर्तन घडविले. देव कुणी पाहिला नाही तरी लोक भांडतात. संतांनी मात्र समतेची, सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. परमार्थिक कल्याण व ऐहिक कल्याण साधून आध्यात्मिक लोकशाही रुजविण्याचे काम संतांनी केले. अज्ञान, अंधकारात गुरफटलेल्या समाजाला विवेकनिष्ठ दृष्टीने प्रकाशमान करण्याचे काम केले. संतांनी खऱ्या अर्थाने भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला, असे मनोगत ‘संत साहित्याने मला काय दिले?’ विषयावर बोलताना वक्त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपरिसंवादात वक्त्यांचे मनोगत : यशवंत महोत्सवात संत साहित्याचे विवेचन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणाच्या आयुष्याला दिशा दिली तर कुणाच्या जीवनात परिवर्तन घडविले. देव कुणी पाहिला नाही तरी लोक भांडतात. संतांनी मात्र समतेची, सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. परमार्थिक कल्याण व ऐहिक कल्याण साधून आध्यात्मिक लोकशाही रुजविण्याचे काम संतांनी केले. अज्ञान, अंधकारात गुरफटलेल्या समाजाला विवेकनिष्ठ दृष्टीने प्रकाशमान करण्याचे काम केले. संतांनी खऱ्या अर्थाने भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला, असे मनोगत ‘संत साहित्याने मला काय दिले?’ विषयावर बोलताना वक्त्यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने सुरू असलेल्या यशवंत महोत्सवात दुसऱ्या दिवशी संत साहित्याचे विवेचन करणारे पुष्प गुंफण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या परिसंवादात राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, प्रा. नारायण निकम व ज्ञानेश्वर रक्षक वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे गिरीश गांधी, समीर सराफ प्रामुख्याने उपस्थित होते.वसंत पुरके यांनी, संत साहित्यामुळे माझ्यासारखा सामान्य माणूस मंत्री पदापर्यंत पोहचू शकल्याची भावना व्यक्त केली. ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने...’ या तुकोबाच्या अभंगाने परिवर्तन घडल्याचे सांगत सत्य, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, मानवता, प्रेम, कणव संतांच्या विचारांमध्ये असल्याचे सांगितले. जे अगम्य, अनाकलनीय आहे, ते लोकांना सांगण्याची ताकद संतांच्या विचारात आहे. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण...’ म्हणत मरणाऱ्यालाही वाचविण्याची ताकद संतांच्या विचारात आहे. आध्यात्मिक लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा संत साहित्यात आहे. विवेक आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण व्हावा, ही संतांची दृष्टी अंगिकारणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.ज्ञानेश्वर रक्षक बोलताना म्हणाले, घरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे वातावरण असल्याने लहानपणापासून त्यांच्याबद्दल आदर आणि श्रद्धेचे वातावरण होते. मात्र युवावस्थेत राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रभाव निर्माण झाला. तुकडोजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या साहित्याने ग्रंथ नाही तर समाज वाचायला शिकलो. राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेने जीवन जगण्याची दिशा दिली. संतांचे विचार वाचायचे नाही तर जगायचे असतात, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. डॉ. असदुल्लाह मनोगत व्यक्त करताना म्हणाले,महाराष्ट्रात जी शिकवण संतांनी दिली तीच शिकवण इस्लाम शिकविणाऱ्या वली, सुफीया व औलियांनी दिली. विदर्भात ताजुद्दीन बाबा, मो. चिश्ती रहमतुल्लाह यांची परंपरा आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचा संदेश देताना जीवन जगण्याची शैली या औलियांनी सांगितली. आजच्या अराजकाच्या वातावरणात या संतांच्या विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रा. नारायण निकम म्हणाले, आज कथा, प्रवचन करणाऱ्या संत म्हणवणाऱ्यांचे पेव फुटले आहे. मात्र संत होणे एवढे सोपे नाही. स्वत:च्या ज्ञानाने स्वत:ला व इतरांना तारण्याची शक्ती असलेले चालतेबोलते ब्रह्म म्हणजे संत. आत्मोद्धार व लोकोद्धाराचा संगम त्यांच्यात असतो. संतांनी अभंगातून जीवनाच्या चैतन्याचे मळे फुलविले आहेत. जगात चार पुरुषार्थ मानले जातात, पण संतांनी भक्तीचा पाचवा पुरुषार्थ दिला. संतांनी भक्तीचा मार्ग दाखवून महाराष्ट्राच्या भूमीला सार्थ केल्याचे मत प्रा. निकम यांनी मांडले. अध्यक्षीय भाषण करताना डॉ. सिद्धार्थ विनायक काणे म्हणाले, संतांनी सर्व समाजाला, देशाला खूप काही दिले, मात्र त्यांच्या विचारातून आपण काय घेतले हे महत्त्वाचे आहे. देशात दुष्प्रवृत्ती फोफावत असल्याने संतांची आवश्यकता पडली आहे. समाजात सत्प्रवृत्ती व दुष्प्रवृत्ती अनादीकाळ सुरू राहील. मात्र आपल्या व समाजाच्या भल्यासाठी संत प्रवृत्तीच्या माणसांशी संगत करणे महत्त्वाचे आहे, ही गोष्ट संत साहित्याच्या प्रभावातून शिकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. परिसंवादाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले. बाळ कुळकर्णी यांनी आभार मानले. 

यशवंत महोत्सवात आजयशवंत महोत्सवांतर्गत ६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाबुराव धनवटे सभागृहात ‘अभिव्यक्ती : जी.ए. कुळकर्णींची कथा’ या विषयावर सादरीकरण होईल.  अजित दिवाडकर व दिनकर बेडेकर हे सादरीकरण करतील. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर