उठवळ आणि सडकी मनोवृत्ती
By Admin | Updated: May 14, 2014 14:16 IST2014-05-14T00:42:10+5:302014-05-14T14:16:13+5:30
ले खिका अरुंधती रॉय ही परवा नागपुरात महात्मा गांधींबद्दल विखारी बोलली. ‘महिलांबाबत गांधी यांचे विचार प्रतिगामी होते आणि अस्पृश्य निवारणाबद्दलची त्यांची

उठवळ आणि सडकी मनोवृत्ती
गांधी खचणार नाही किंवा मरणारही नाही!
गजानन जानभोर
ले खिका अरुंधती रॉय ही परवा नागपुरात महात्मा गांधींबद्दल विखारी बोलली. ‘महिलांबाबत गांधी यांचे विचार प्रतिगामी होते आणि अस्पृश्य निवारणाबद्दलची त्यांची भूमिका बघितल्यानंतर त्यांना महात्मा कुणी केले’ असे बरेच काही गांधीजींबद्दल ती इथे बरळली. वास्तविक अरुंधती रॉय हिच्या या विधानाची दखल घ्यावी, एवढी ती मोठी विचारवंत नाही. अरुंधती रॉय म्हणजे विदेशी पैशावर स्वदेश भक्ती करणारी सडक्या मनोवृत्तीची लेखिका. ज्या महात्म्याने स्वदेशीचे व्रत घेतले व आयुष्याच्या अखेरपर्यंत ते जपले त्याच्या महात्म्यपदाचा वाद उभा करावा एवढे हीन पातक दुसरे नाही.‘मी तिथे जाऊन काय करू शकेन, त्याची मला कल्पना नाही, परंतु तिथे गेल्याखेरीज माझे मन शांत होणार नाही’. नौखालीत हा महात्मा हिंदूंना सांगायचा, ‘मृत्यूवर मात करा’, मुस्लिमांना हात जोडून म्हणायचा, ‘तुमच्या अंत:करणातील द्वेषभावनेवर मात करा’ विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष, दोन्ही अनुभव गांधीजींच्या वाट्याला येत होते. मृत्यूनंतरही त्यांची यातून सुटका झालेली नाही. अरुंधती रॉयसारखी विकृत माणसे म्हणूनच असे बरळत असतात.‘चिअर गर्ल्स’ नी त्याची कितीही निंदानालस्ती, टवाळी केली तरी तो खचणार नाही किंवा मरणारही नाही.
गांधीजींनी सगळ्या जातीधर्माची माणसे एकत्र आणली व त्यांना स्वातंत्र्यलढय़ात सहभागी करून घेतले. भारतीय स्त्री समाजजीवनात प्रथमच समोर आली ती गांधीजींनी उभारलेल्या स्वातंत्र्य लढय़ात. हे सत्य सार्या जगाने कधीचेच मान्य केले आहे, त्यामुळे अरुंधती रॉयने केलेले विधान हा बाष्कळपणाच आहे.
गांधींवरची टीका नवी नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर देशभरात हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये दंगली उसळल्या. नौखालीतील दंगलीच्या बातम्या ऐकून गांधीजींचे हृदय विदीर्ण झाले. बापू म्हणाले,
वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत राहायचे हेच अरुंधतीसारख्यांचे पोटापाण्याचे साधन आहे. काश्मीर हा भारताचा भाग कधीही नव्हता, असे देशविघातक वक्तव्य तिने मध्यंतरी केले आणि त्यातून वाद निर्माण झाला. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे ती नेहमी सर्मथन करीत असते. नक्षलवाद्यांनी एकट्या गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत ७५0 आदिवासींची हत्या केली. वर्षभरात ४२ पोलिसांना ठार केले. या देशद्रोह्यांची ही बाई तरफदारी करते.आदिवासींच्या मुलींना पळवणार्या आणि त्यांना आपली भोगदासी बनवणार्या नक्षलवाद्यांवर ती कधीच टीका करीत नाही. अनेक आदिवासी मायबाप आपल्या मुली पळवल्या जाऊ नयेत म्हणून नक्षलवाद्यांच्या भीतीने गळ्यात मंगळसूत्र घालायला लावतात. स्वत:कडे स्त्रीमुक्तीचे पुढारीपण घेणारी आणि तशी मिरवणारी ही अरुंधती याबद्दल एक शब्दही बोलत नाही. तिच्या सर्वच भूमिका संशयास्पद आहेत.
गांधीजींवर टीका करणे ही या देशात फॅशन झाली आहे. या महात्म्यावर टीका केली की लोकांचे लक्ष वेधले जाते, हे त्यांना ठावूक आहे. गांधी कुठल्याही जातीचा नाही, धर्माचा नाही. त्याच्यावर कुणीही कुठल्याही स्तरावर जाऊन टीका केली तरीही कुणी भडकत नाही, रस्त्यावर येत नाही किंवा जाळपोळही करीत नाही. त्यामुळे मनात येईल तसे त्याच्याबद्दल बोलले जाते आणि लिहिले जाते. परवा ही अर्धवट समाजसेविका नागपुरात बोलली हा त्याच मानसिकतेचा भाग आहे. अशांना नागपूरकरांसमोर उभे करून व्याख्यान द्यायला लावणे हाही निर्लज्जपणा आहे आणि या अपराधाबद्दल संबंधित आयोजकांना जाब विचारण्याची गरज आहे. गांधी कधी संपणार नाही. माणसांच्या मुक्तीच्या मार्गाने वाट काढीत तो सतत चालत राहणार आहे. अस्वस्थेत, शांततेत, आनंदात, दु:खात कुठेही तो राहीलच. अरुंधती रॉयसारख्या