शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

उंदीर पकडण्यासाठी आली पुण्याची चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:07 IST

स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या १०० वर पोहचली आहे. या रोगाला कारणीभूत असलेले ‘चिगर माईट्स’ मिळविण्यास आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. यामुळे आता पुण्याच्या कीटकशास्त्रज्ञ चमूची मदत घेण्यात आली असून मंगळवारी या चमूने काटोल, नरखेड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना उंदीर पकडण्याचे ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.

ठळक मुद्दे‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे दिले प्रशिक्षण : स्क्रब टायफसच्या रुग्णांनी गाठली शंभरी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या १०० वर पोहचली आहे. या रोगाला कारणीभूत असलेले ‘चिगर माईट्स’ मिळविण्यास आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. यामुळे आता पुण्याच्या कीटकशास्त्रज्ञ चमूची मदत घेण्यात आली असून मंगळवारी या चमूने काटोल, नरखेड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना उंदीर पकडण्याचे ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.उंदरांच्या त्वचेला घट्ट चिकटून असणारा स्क्रब टायफसचा जीवाणू ‘चिगर माईट्स’मुळे हा रोग होत असल्याचे समोर आले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा जीवाणू शोधून त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून ‘चिगर माईट्स’ मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु आरोग्य विभागासोबतच नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाला यश आले नाही. याची दखल घेत पुण्याच्या सहसंचालक आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ चमूला पाचारण करण्यात आले. त्यानुसार सोमवारपासून ते नागपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी त्यांनी नरखेड, काटोल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.‘लोकमत’शी बोलताना कीटकशास्त्रज्ञ मुकुंद देशपांडे म्हणाले, घराघरात आढळून येणारा उंदीर आणि शेतात, जंगलात आढळून येणाºया उंदरांमध्ये फरक असतो. स्क्रब टायफस हा आजार शेतात आढळून येणाºया ‘टटेरा इंडिका’ या भुºया रंगाच्या उंदराच्या शरीरावर पोसल्या जाणाºया ‘चिगर माईट्स’मुळे होत असावा, अशी शक्यता आहे. यामुळे या रोगाचे ‘पॉझिटीव्ह’ आलेल्या रुग्णांचा इतिहास घेऊन शेत जमीन व गवताळ भागातील उंदराच्या बिळाच्या तोंडावर, आडोशाला व इतरही ठिकाणी ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण कर्मचाºयांना दिले. पकडण्यात येणारे हे उंदीर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तिथे त्यांच्या अंगावर चिकटून असलेले ‘चिगर माईट्स’ काढून त्यावर अभ्यास केला जाईल. उंदरामुळे ‘स्क्रब टायफस’ पसरतो हे म्हणणे योग्य असले तरी उंदीर मारणे हा त्यावर उपाय नाही. उंदीर मारणे सुरू झाले तर त्याच्या रक्तावर पोसणारा हा जीवाणू लोकांमध्ये वेगाने पसरून, धोका वाढू शकतो.

टॅग्स :nagpurनागपूरPuneपुणे