शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूरसाठी नव्या वर्षाचा पहिला आठवडा 'विज्ञान परमो धर्म:' चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 14:04 IST

शताब्दी वर्षात विद्यापीठाला १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद RTM Nagpur university gets a chance to organaise indian science congress

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धम्मपरिवर्तनासाठी निवडलेले शहर यांसह देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूरचा नव्या वर्षाचा पहिला आठवडा विज्ञान परमो धर्म: वातावरणाचा असेल. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तब्बल ४८ वर्षांनंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद लाभले असून या १०८ व्या सायन्स काँग्रेसमध्ये रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी मंगळवारी संपादकांशी बोलताना दिली.

याआधी १९७४ साली ६१ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद नागपूर विद्यापीठाने भूषविले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्या काँग्रेसचे उद्घाटन झाले होते. विज्ञानाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेली ही परिषद १९१४ साली सुरू झाली. त्यानंतर १९२० साली सातवी, १९३१ साली अठरावी, तसेच १९४५ साली ३२ वी सायन्स काँग्रेस नागपूरमध्ये पार पडली. आता या आयोजनाचे स्वरूप अतिभव्य झाले असून १०८ व्या काँग्रेसमध्ये शंभरावर मुख्य व्याख्याने व चारशेवर इतर व्याख्याने होतील. शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व त्याद्वारे महिला सबलीकरण अशी या आयोजनाची थीम आहे. ३ ते ७ जानेवारीपर्यंत आयोजित या सायन्स काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. याप्रसंगी २००९ मधील नोबेल पुरस्कार विजेते क्रिस्टलोग्राफर अडा ई. योनाथ (इजराईल) व २०१६ मधील नोबेल पुरस्कार विजेते सर फ्रेजर स्टॉडार्ट (ब्रिटन) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सायन्स काँग्रेसची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

सायन्स काँग्रेसची व्यापकता

१ - सायन्स काँग्रेसमध्ये १० ते १२ हजार प्रतिनिधी सहभागी होतील. त्यात १०० पेक्षा जास्त वक्ते व तज्ज्ञ राहतील.

२ - सायन्स काँग्रेसमध्ये ३ हजारापेक्षा जास्त पेपर प्रेझेंटेशन केले जातील. सुमारे १०० संशोधक मार्गदर्शन करतील.

३ - ५०० पेक्षा जास्त आदिवासी प्रतिनिधी व एक हजारावर शेतकरीही सायन्स काँग्रेसमध्ये उपस्थित होतील.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानscienceविज्ञानnagpurनागपूर