शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : साडेपाच हजारावर बालकांना प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:05 IST

RTE, Nagpur news शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील ५,६११ बालकांची ६८० शाळांमधून निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ३० जूनपर्यंत सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्दे प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील ५,६११ बालकांची ६८० शाळांमधून निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ३० जूनपर्यंत सुरुवात होणार आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांनी ११ ते ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.

आरटीई कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असली तरी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी प्रवेशासाठी शाळेत गर्दी टाळावी. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना सोबत नेऊ नये. शाळेकडून प्रवेशाची तारीख अर्जात नमूद मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील ॲप्लीकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून प्रवेशाची तारीख पाहावी.

पालकांनी प्रवेशासाठी एसएमएस प्राप्त सूचनेनंतर शाळेत जावे. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती तसेच पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती ॲप्लीकेशन वाईज डिटेल्स आणि अलॉटमेंट लेटरची प्रत सोबत नेणे आवश्यक आहे.

भिवापूर तालुक्यात पाच शाळांसाठी ४०, तर हिंगणा तालुक्यात ४१ शाळांसाठी ३९३, कळमेश्वर तालुक्यात २६ शाळांसाठी ११८, कामठी तालुक्यात ४० शाळांसाठी ३९१, काटोल तालुक्यात १९ शाळांसाठी १६४, कुही तालुक्यात १५ शाळांसाठी ९९, मौदा तालुक्यात १९ शाळांसाठी १७२, नागपूर ग्रामीणमध्ये १०२ शाळांसाठी ९०८, नरखेड तालुक्यात १४ शाळांसाठी ११४, पारशिवनी तालुक्यात १७ शाळांसाठी ११२, रामटेक तालुक्यात १३ शाळांसाठी १२७, सावनेर तालुक्यात ३४ शाळांसाठी २२४, उमरेड तालुक्यात २४ साठी २२२ अशा पद्धतीने बालकांची निवड झाली आहे. शहरी भागातील यूआरसी १ मध्ये २७२ शाळांसाठी १,८४८ तर यूआरसी २ मध्ये ३९ शाळांसाठी ६७९ बालकांची निवड झाली आहे.

शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क असून, राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षण देण्यात येण्याची तरतूद आहे. प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क या कायद्याने मिळणार आहे.

शाळेत प्रवेश घेताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी