शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आरटीई : साडेपाच हजारावर बालकांना प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:05 IST

RTE, Nagpur news शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील ५,६११ बालकांची ६८० शाळांमधून निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ३० जूनपर्यंत सुरुवात होणार आहे.

ठळक मुद्दे प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील ५,६११ बालकांची ६८० शाळांमधून निवड झाली आहे. प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून ३० जूनपर्यंत सुरुवात होणार आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांनी ११ ते ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.

आरटीई कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असली तरी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी प्रवेशासाठी शाळेत गर्दी टाळावी. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना सोबत नेऊ नये. शाळेकडून प्रवेशाची तारीख अर्जात नमूद मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील ॲप्लीकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून प्रवेशाची तारीख पाहावी.

पालकांनी प्रवेशासाठी एसएमएस प्राप्त सूचनेनंतर शाळेत जावे. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती तसेच पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती ॲप्लीकेशन वाईज डिटेल्स आणि अलॉटमेंट लेटरची प्रत सोबत नेणे आवश्यक आहे.

भिवापूर तालुक्यात पाच शाळांसाठी ४०, तर हिंगणा तालुक्यात ४१ शाळांसाठी ३९३, कळमेश्वर तालुक्यात २६ शाळांसाठी ११८, कामठी तालुक्यात ४० शाळांसाठी ३९१, काटोल तालुक्यात १९ शाळांसाठी १६४, कुही तालुक्यात १५ शाळांसाठी ९९, मौदा तालुक्यात १९ शाळांसाठी १७२, नागपूर ग्रामीणमध्ये १०२ शाळांसाठी ९०८, नरखेड तालुक्यात १४ शाळांसाठी ११४, पारशिवनी तालुक्यात १७ शाळांसाठी ११२, रामटेक तालुक्यात १३ शाळांसाठी १२७, सावनेर तालुक्यात ३४ शाळांसाठी २२४, उमरेड तालुक्यात २४ साठी २२२ अशा पद्धतीने बालकांची निवड झाली आहे. शहरी भागातील यूआरसी १ मध्ये २७२ शाळांसाठी १,८४८ तर यूआरसी २ मध्ये ३९ शाळांसाठी ६७९ बालकांची निवड झाली आहे.

शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क असून, राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षण देण्यात येण्याची तरतूद आहे. प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क या कायद्याने मिळणार आहे.

शाळेत प्रवेश घेताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी