शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Mohan Bhagwat: “हिंदू विचार अन् हिंदुत्व म्हणजे काय”; मोहन भागवत यांनी व्याख्याच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 22:09 IST

Mohan Bhagwat: हिंदुत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूर: प्राचीन काळापासून चालत आलेली शाश्वत सनातन परंपरा, आचरण पद्धती यालाच आताच्या काळात हिंदू मानले गेले आहे. हिंदू हा धर्म नाही, ती एक आचरण पद्धती आहे. हिंदूत्व म्हणजे हिंदू धर्म नाही. हिंदुत्व हे कोणत्याही प्रकारचे इझम नाही. हिंदुत्वाचा विकास सर्वांनी केला आहे. हिंदूत्व हे एका संस्कृतीचे नाव आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मांडले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली परखड मते मांडली.

भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक

भारतीय माणून हा भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक आहे. हिंदूत्व कधीही पूर्णविराम मानत नाही. व्यक्तीसह सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याला हिंदूत्वामध्ये प्रोत्साहन दिले आहे. सनातन शाश्वत धर्माला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती असून, हिंदुत्व संस्कृतीचे नाव आहे. आपल्या आचरणातून जीवनाची प्रगती, विकास करणे म्हणजे सुसंस्कृतपणा आहे. नरापासून नराधम नाही, तर नारायण होणे या प्रवासाचे नाव हिंदुत्व आहे. हिंदुत्व संस्कृती सर्वत्र पवित्रता पाहते. सनातन धर्म म्हणजे मानवधर्म, मानवताधर्म आहे. समाजाचे तेच अधिष्ठान आहे. हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच. भिन्न असणे म्हणजे वेगळे असणे नाही.. विविधतेत एकता आपली ओळख आहे. सर्वांना समान संधी देणे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

बंधुभाव हाच धर्म 

बंधुभाव हाच धर्म असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. आपण सगळे भारत मातेचे सुपुत्र आहोत, हे नाते महत्त्वाचे आहे. मनामनातील आणि समाजातील बंधुत्वाशिवाय आपण टिकणार नाही. मातृभूमीच्या प्रमाने आपल्याला बांधून ठेवले आहे. भारतीय संस्कृती आपल्याला जोडून ठेवते. संघर्ष करणाऱ्या पूर्वजांना आपण आपले आदर्श मानले आहे. भाषा वेगळ्या असल्या तरी भावना एकसमान आहेत, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

दरम्यान, सर्वत्र सुखकारक असणारा करणारा म्हणजे धर्म आहे. तो कोणताही असो. एकता आहे हाच विचार समान आहे. हिंदूत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे. हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता याचा विरोध नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर