शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Bhagwat: “हिंदू विचार अन् हिंदुत्व म्हणजे काय”; मोहन भागवत यांनी व्याख्याच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 22:09 IST

Mohan Bhagwat: हिंदुत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूर: प्राचीन काळापासून चालत आलेली शाश्वत सनातन परंपरा, आचरण पद्धती यालाच आताच्या काळात हिंदू मानले गेले आहे. हिंदू हा धर्म नाही, ती एक आचरण पद्धती आहे. हिंदूत्व म्हणजे हिंदू धर्म नाही. हिंदुत्व हे कोणत्याही प्रकारचे इझम नाही. हिंदुत्वाचा विकास सर्वांनी केला आहे. हिंदूत्व हे एका संस्कृतीचे नाव आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मांडले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली परखड मते मांडली.

भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक

भारतीय माणून हा भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक आहे. हिंदूत्व कधीही पूर्णविराम मानत नाही. व्यक्तीसह सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याला हिंदूत्वामध्ये प्रोत्साहन दिले आहे. सनातन शाश्वत धर्माला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती असून, हिंदुत्व संस्कृतीचे नाव आहे. आपल्या आचरणातून जीवनाची प्रगती, विकास करणे म्हणजे सुसंस्कृतपणा आहे. नरापासून नराधम नाही, तर नारायण होणे या प्रवासाचे नाव हिंदुत्व आहे. हिंदुत्व संस्कृती सर्वत्र पवित्रता पाहते. सनातन धर्म म्हणजे मानवधर्म, मानवताधर्म आहे. समाजाचे तेच अधिष्ठान आहे. हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच. भिन्न असणे म्हणजे वेगळे असणे नाही.. विविधतेत एकता आपली ओळख आहे. सर्वांना समान संधी देणे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

बंधुभाव हाच धर्म 

बंधुभाव हाच धर्म असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. आपण सगळे भारत मातेचे सुपुत्र आहोत, हे नाते महत्त्वाचे आहे. मनामनातील आणि समाजातील बंधुत्वाशिवाय आपण टिकणार नाही. मातृभूमीच्या प्रमाने आपल्याला बांधून ठेवले आहे. भारतीय संस्कृती आपल्याला जोडून ठेवते. संघर्ष करणाऱ्या पूर्वजांना आपण आपले आदर्श मानले आहे. भाषा वेगळ्या असल्या तरी भावना एकसमान आहेत, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

दरम्यान, सर्वत्र सुखकारक असणारा करणारा म्हणजे धर्म आहे. तो कोणताही असो. एकता आहे हाच विचार समान आहे. हिंदूत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे. हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता याचा विरोध नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर