शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Bhagwat: “हिंदू विचार अन् हिंदुत्व म्हणजे काय”; मोहन भागवत यांनी व्याख्याच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 22:09 IST

Mohan Bhagwat: हिंदुत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूर: प्राचीन काळापासून चालत आलेली शाश्वत सनातन परंपरा, आचरण पद्धती यालाच आताच्या काळात हिंदू मानले गेले आहे. हिंदू हा धर्म नाही, ती एक आचरण पद्धती आहे. हिंदूत्व म्हणजे हिंदू धर्म नाही. हिंदुत्व हे कोणत्याही प्रकारचे इझम नाही. हिंदुत्वाचा विकास सर्वांनी केला आहे. हिंदूत्व हे एका संस्कृतीचे नाव आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मांडले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली परखड मते मांडली.

भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक

भारतीय माणून हा भारतीय सहिष्णू, सर्वसमावेशक आहे. हिंदूत्व कधीही पूर्णविराम मानत नाही. व्यक्तीसह सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याला हिंदूत्वामध्ये प्रोत्साहन दिले आहे. सनातन शाश्वत धर्माला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती असून, हिंदुत्व संस्कृतीचे नाव आहे. आपल्या आचरणातून जीवनाची प्रगती, विकास करणे म्हणजे सुसंस्कृतपणा आहे. नरापासून नराधम नाही, तर नारायण होणे या प्रवासाचे नाव हिंदुत्व आहे. हिंदुत्व संस्कृती सर्वत्र पवित्रता पाहते. सनातन धर्म म्हणजे मानवधर्म, मानवताधर्म आहे. समाजाचे तेच अधिष्ठान आहे. हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच. भिन्न असणे म्हणजे वेगळे असणे नाही.. विविधतेत एकता आपली ओळख आहे. सर्वांना समान संधी देणे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

बंधुभाव हाच धर्म 

बंधुभाव हाच धर्म असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. आपण सगळे भारत मातेचे सुपुत्र आहोत, हे नाते महत्त्वाचे आहे. मनामनातील आणि समाजातील बंधुत्वाशिवाय आपण टिकणार नाही. मातृभूमीच्या प्रमाने आपल्याला बांधून ठेवले आहे. भारतीय संस्कृती आपल्याला जोडून ठेवते. संघर्ष करणाऱ्या पूर्वजांना आपण आपले आदर्श मानले आहे. भाषा वेगळ्या असल्या तरी भावना एकसमान आहेत, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

दरम्यान, सर्वत्र सुखकारक असणारा करणारा म्हणजे धर्म आहे. तो कोणताही असो. एकता आहे हाच विचार समान आहे. हिंदूत्वाचे खरे आचरण करणे हेच महत्त्वाचे आहे. हिंदूत्व आणि राष्ट्रीय एकात्मता याचा विरोध नाही, असेही मोहन भागवत म्हणाले.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर