शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 09:54 IST

अखंड भारत, आरक्षण या मुद्द्यांवरही मांडले मत

Mohan Bhagwat Indian Flag at RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आपली भूमिका प्रखरपणे आणि अतिशय स्पष्ट शब्दांत मांडण्यासाठी ओळखले जातात. मोहन भागवतांनी नुकतेच नागपुरात एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 1950 ते 2002 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यालयात राष्ट्रध्वज का फडकावला नाही असा प्रश्न त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर मोहन भागवत यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

"लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारू नये. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही जिथे असतो तिथे राष्ट्रध्वज फडकवतो. नागपुरातील महाल आणि रेशीम बाग या दोन्ही कॅम्पसमध्ये ध्वजारोहण होते. जिथे देशाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, तिथे लढा देण्यासाठी, प्राण पणाला लावण्यासाठी आम्ही तुम्हाला आघाडीवर दिसू," असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी यावेळी 1933 मध्ये जळगावजवळ घडलेला एक किस्सा सांगितला. तेव्हा काँग्रेसच्या तेजपूर अधिवेशना दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू 80 फूट उंच खांबावर ध्वज फडकवत होते. त्याच वेळी झेंडा खांबाच्या मधोमध अडकल्याची घटना घडली. दरम्यान सुमारे दहा हजारांच्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि खांबावर चढून त्याने अडकलेला ध्वज बाहेर काढला.

भागवतांच्या म्हणण्यानुसार, नेहरूंनी त्या तरुणाला अभिनंदनसाठी दुसऱ्या दिवशी परिषदेला येण्यास सांगितले पण तसे झाले नाही. कारण काही लोकांनी नेहरूंना सांगितले की तो तरुण संघाच्या शाखेत जातो. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणाच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले आणि या तरुणाचे नाव किशनसिंग राजपूत असल्याचा दावा सरसंघचालकांनी केला.

भागवत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंध आहे, तेव्हापासून ही समस्या पहिल्यांदा निर्माण झाली होती. या दोन दिवशी (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) आपण राष्ट्रध्वजही फडकवतो. तसेच, राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा आपले स्वयंसेवक सर्वात पुढे असतात आणि आपल्या प्राणांची आहुती देण्यास ते तयार असतात. याशिवाय, आरक्षणाच्या मुद्द्यावर मोहन भागवत म्हणाले की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे.

 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतreservationआरक्षण