शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 09:54 IST

अखंड भारत, आरक्षण या मुद्द्यांवरही मांडले मत

Mohan Bhagwat Indian Flag at RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आपली भूमिका प्रखरपणे आणि अतिशय स्पष्ट शब्दांत मांडण्यासाठी ओळखले जातात. मोहन भागवतांनी नुकतेच नागपुरात एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 1950 ते 2002 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यालयात राष्ट्रध्वज का फडकावला नाही असा प्रश्न त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर मोहन भागवत यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

"लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारू नये. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही जिथे असतो तिथे राष्ट्रध्वज फडकवतो. नागपुरातील महाल आणि रेशीम बाग या दोन्ही कॅम्पसमध्ये ध्वजारोहण होते. जिथे देशाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, तिथे लढा देण्यासाठी, प्राण पणाला लावण्यासाठी आम्ही तुम्हाला आघाडीवर दिसू," असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी यावेळी 1933 मध्ये जळगावजवळ घडलेला एक किस्सा सांगितला. तेव्हा काँग्रेसच्या तेजपूर अधिवेशना दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू 80 फूट उंच खांबावर ध्वज फडकवत होते. त्याच वेळी झेंडा खांबाच्या मधोमध अडकल्याची घटना घडली. दरम्यान सुमारे दहा हजारांच्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि खांबावर चढून त्याने अडकलेला ध्वज बाहेर काढला.

भागवतांच्या म्हणण्यानुसार, नेहरूंनी त्या तरुणाला अभिनंदनसाठी दुसऱ्या दिवशी परिषदेला येण्यास सांगितले पण तसे झाले नाही. कारण काही लोकांनी नेहरूंना सांगितले की तो तरुण संघाच्या शाखेत जातो. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणाच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले आणि या तरुणाचे नाव किशनसिंग राजपूत असल्याचा दावा सरसंघचालकांनी केला.

भागवत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंध आहे, तेव्हापासून ही समस्या पहिल्यांदा निर्माण झाली होती. या दोन दिवशी (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) आपण राष्ट्रध्वजही फडकवतो. तसेच, राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा आपले स्वयंसेवक सर्वात पुढे असतात आणि आपल्या प्राणांची आहुती देण्यास ते तयार असतात. याशिवाय, आरक्षणाच्या मुद्द्यावर मोहन भागवत म्हणाले की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे.

 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतreservationआरक्षण