शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 09:54 IST

अखंड भारत, आरक्षण या मुद्द्यांवरही मांडले मत

Mohan Bhagwat Indian Flag at RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आपली भूमिका प्रखरपणे आणि अतिशय स्पष्ट शब्दांत मांडण्यासाठी ओळखले जातात. मोहन भागवतांनी नुकतेच नागपुरात एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 1950 ते 2002 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यालयात राष्ट्रध्वज का फडकावला नाही असा प्रश्न त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर मोहन भागवत यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

"लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारू नये. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही जिथे असतो तिथे राष्ट्रध्वज फडकवतो. नागपुरातील महाल आणि रेशीम बाग या दोन्ही कॅम्पसमध्ये ध्वजारोहण होते. जिथे देशाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, तिथे लढा देण्यासाठी, प्राण पणाला लावण्यासाठी आम्ही तुम्हाला आघाडीवर दिसू," असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी यावेळी 1933 मध्ये जळगावजवळ घडलेला एक किस्सा सांगितला. तेव्हा काँग्रेसच्या तेजपूर अधिवेशना दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू 80 फूट उंच खांबावर ध्वज फडकवत होते. त्याच वेळी झेंडा खांबाच्या मधोमध अडकल्याची घटना घडली. दरम्यान सुमारे दहा हजारांच्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि खांबावर चढून त्याने अडकलेला ध्वज बाहेर काढला.

भागवतांच्या म्हणण्यानुसार, नेहरूंनी त्या तरुणाला अभिनंदनसाठी दुसऱ्या दिवशी परिषदेला येण्यास सांगितले पण तसे झाले नाही. कारण काही लोकांनी नेहरूंना सांगितले की तो तरुण संघाच्या शाखेत जातो. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणाच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले आणि या तरुणाचे नाव किशनसिंग राजपूत असल्याचा दावा सरसंघचालकांनी केला.

भागवत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंध आहे, तेव्हापासून ही समस्या पहिल्यांदा निर्माण झाली होती. या दोन दिवशी (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) आपण राष्ट्रध्वजही फडकवतो. तसेच, राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा आपले स्वयंसेवक सर्वात पुढे असतात आणि आपल्या प्राणांची आहुती देण्यास ते तयार असतात. याशिवाय, आरक्षणाच्या मुद्द्यावर मोहन भागवत म्हणाले की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे.

 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतreservationआरक्षण