शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

संघाच्या मुख्यालयात बरेच वर्षे तिरंगा का फडकावला नव्हता? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 09:54 IST

अखंड भारत, आरक्षण या मुद्द्यांवरही मांडले मत

Mohan Bhagwat Indian Flag at RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आपली भूमिका प्रखरपणे आणि अतिशय स्पष्ट शब्दांत मांडण्यासाठी ओळखले जातात. मोहन भागवतांनी नुकतेच नागपुरात एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 1950 ते 2002 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यालयात राष्ट्रध्वज का फडकावला नाही असा प्रश्न त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर मोहन भागवत यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

"लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारू नये. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आम्ही जिथे असतो तिथे राष्ट्रध्वज फडकवतो. नागपुरातील महाल आणि रेशीम बाग या दोन्ही कॅम्पसमध्ये ध्वजारोहण होते. जिथे देशाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न असतो, तिथे लढा देण्यासाठी, प्राण पणाला लावण्यासाठी आम्ही तुम्हाला आघाडीवर दिसू," असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी यावेळी 1933 मध्ये जळगावजवळ घडलेला एक किस्सा सांगितला. तेव्हा काँग्रेसच्या तेजपूर अधिवेशना दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू 80 फूट उंच खांबावर ध्वज फडकवत होते. त्याच वेळी झेंडा खांबाच्या मधोमध अडकल्याची घटना घडली. दरम्यान सुमारे दहा हजारांच्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि खांबावर चढून त्याने अडकलेला ध्वज बाहेर काढला.

भागवतांच्या म्हणण्यानुसार, नेहरूंनी त्या तरुणाला अभिनंदनसाठी दुसऱ्या दिवशी परिषदेला येण्यास सांगितले पण तसे झाले नाही. कारण काही लोकांनी नेहरूंना सांगितले की तो तरुण संघाच्या शाखेत जातो. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना याची माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणाच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले आणि या तरुणाचे नाव किशनसिंग राजपूत असल्याचा दावा सरसंघचालकांनी केला.

भागवत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रध्वजाच्या सन्मानाशी संबंध आहे, तेव्हापासून ही समस्या पहिल्यांदा निर्माण झाली होती. या दोन दिवशी (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) आपण राष्ट्रध्वजही फडकवतो. तसेच, राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची वेळ येते, तेव्हा आपले स्वयंसेवक सर्वात पुढे असतात आणि आपल्या प्राणांची आहुती देण्यास ते तयार असतात. याशिवाय, आरक्षणाच्या मुद्द्यावर मोहन भागवत म्हणाले की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे.

 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतreservationआरक्षण