शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Bhagwat: “हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 21:23 IST

Mohan Bhagwat: लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यावर मोहन भागवत बोलत होते.

नागपूर: हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. हिंदू हा कोणताही एक धर्म नाही, ती प्राचीन, हजारो वर्षांपासून आजतागायत सुरू असलेली एक आचरण पद्धती आहे. देशात धर्म, परंपरा वेगळ्या असू शकतात. मात्र, देशवासीयांची आचरण पद्धती बहुतांश प्रमाणात एकच आहे. देशात बंधुभाव, विविधतेतील एकता आजही टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही. तुम्ही मान्य करा अथवा नाही भारत हिंदू राष्ट्रच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली मते परखडपणे मांडली. 

धारणा करणारा नियम म्हणून धर्म

देशात विविध धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धारण करणारा नियम म्हणजे धर्म होय. हिंदू हा धर्म नाही, ती सनातन काळापासून चालत आलेल्या परंपरांची आचरण पद्धती आहे. भारत हा सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. हिंदू हे इझम नाहीए. सनातन काळापासून सुरू असलेल्या जो सर्वसमावेश धर्म आहे, त्याला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव

श्रीमद् भागवत ग्रंथांत सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या सांगितले गेले आहे. या गोष्टी कधीही बदलत नाहीत. यालाच आज हिंदू धर्म मानले गेले आहे. मात्र, वास्तविक पाहता हीच बाब भारतातील सर्वधर्मांमध्ये सांगितली गेली आहे. सत्याची अनुभूती, अनुभव प्रत्येकाने घ्यावा. मी सांगतो, तेच सत्य मानावे, अशी शिकवण कोणत्याही धर्मांत दिलेली नाही. प्रत्येक धर्मियांच्या पूजा-अर्चा, परंपरा यांमध्ये वैविध्य आढळते, भिन्नता नाही, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. देशकाल परिस्थितीनुसार आचार धर्म बदलत राहतो. त्याला चिकटून राहणे चुकीचे. काळानुरुप बदल घडवणे, बदल स्वीकारणे आणि बदल करत राहणे आवश्यक आहे. प्राचीन काळानुसार, चालत आलेल्या अनेक पद्धती, रिती, परंपरा यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणूनच हिंदूत्व शाश्वत आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती. त्यामुळे हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर