शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Mohan Bhagwat: “हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 21:23 IST

Mohan Bhagwat: लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यावर मोहन भागवत बोलत होते.

नागपूर: हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. हिंदू हा कोणताही एक धर्म नाही, ती प्राचीन, हजारो वर्षांपासून आजतागायत सुरू असलेली एक आचरण पद्धती आहे. देशात धर्म, परंपरा वेगळ्या असू शकतात. मात्र, देशवासीयांची आचरण पद्धती बहुतांश प्रमाणात एकच आहे. देशात बंधुभाव, विविधतेतील एकता आजही टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही. तुम्ही मान्य करा अथवा नाही भारत हिंदू राष्ट्रच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली मते परखडपणे मांडली. 

धारणा करणारा नियम म्हणून धर्म

देशात विविध धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धारण करणारा नियम म्हणजे धर्म होय. हिंदू हा धर्म नाही, ती सनातन काळापासून चालत आलेल्या परंपरांची आचरण पद्धती आहे. भारत हा सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. हिंदू हे इझम नाहीए. सनातन काळापासून सुरू असलेल्या जो सर्वसमावेश धर्म आहे, त्याला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव

श्रीमद् भागवत ग्रंथांत सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या सांगितले गेले आहे. या गोष्टी कधीही बदलत नाहीत. यालाच आज हिंदू धर्म मानले गेले आहे. मात्र, वास्तविक पाहता हीच बाब भारतातील सर्वधर्मांमध्ये सांगितली गेली आहे. सत्याची अनुभूती, अनुभव प्रत्येकाने घ्यावा. मी सांगतो, तेच सत्य मानावे, अशी शिकवण कोणत्याही धर्मांत दिलेली नाही. प्रत्येक धर्मियांच्या पूजा-अर्चा, परंपरा यांमध्ये वैविध्य आढळते, भिन्नता नाही, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. देशकाल परिस्थितीनुसार आचार धर्म बदलत राहतो. त्याला चिकटून राहणे चुकीचे. काळानुरुप बदल घडवणे, बदल स्वीकारणे आणि बदल करत राहणे आवश्यक आहे. प्राचीन काळानुसार, चालत आलेल्या अनेक पद्धती, रिती, परंपरा यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणूनच हिंदूत्व शाश्वत आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती. त्यामुळे हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर