शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Mohan Bhagwat: “हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही मान्य करा अथवा नाही ते आहेच”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 21:23 IST

Mohan Bhagwat: लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यावर मोहन भागवत बोलत होते.

नागपूर: हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे. हिंदू हा कोणताही एक धर्म नाही, ती प्राचीन, हजारो वर्षांपासून आजतागायत सुरू असलेली एक आचरण पद्धती आहे. देशात धर्म, परंपरा वेगळ्या असू शकतात. मात्र, देशवासीयांची आचरण पद्धती बहुतांश प्रमाणात एकच आहे. देशात बंधुभाव, विविधतेतील एकता आजही टिकून आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच नाही. तुम्ही मान्य करा अथवा नाही भारत हिंदू राष्ट्रच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. लोकमत आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी अनेकविध मुद्द्यांचा आधारे हिंदुत्व, हिंदू विचार आणि धर्मनिरपेक्षता यावर आपली मते परखडपणे मांडली. 

धारणा करणारा नियम म्हणून धर्म

देशात विविध धर्म गुण्यागोविंदाने नांदत आहेत. धारण करणारा नियम म्हणजे धर्म होय. हिंदू हा धर्म नाही, ती सनातन काळापासून चालत आलेल्या परंपरांची आचरण पद्धती आहे. भारत हा सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. हिंदू हे इझम नाहीए. सनातन काळापासून सुरू असलेल्या जो सर्वसमावेश धर्म आहे, त्याला आजच्या घडीला हिंदू धर्म मानले गेले आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव

श्रीमद् भागवत ग्रंथांत सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या सांगितले गेले आहे. या गोष्टी कधीही बदलत नाहीत. यालाच आज हिंदू धर्म मानले गेले आहे. मात्र, वास्तविक पाहता हीच बाब भारतातील सर्वधर्मांमध्ये सांगितली गेली आहे. सत्याची अनुभूती, अनुभव प्रत्येकाने घ्यावा. मी सांगतो, तेच सत्य मानावे, अशी शिकवण कोणत्याही धर्मांत दिलेली नाही. प्रत्येक धर्मियांच्या पूजा-अर्चा, परंपरा यांमध्ये वैविध्य आढळते, भिन्नता नाही, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. देशकाल परिस्थितीनुसार आचार धर्म बदलत राहतो. त्याला चिकटून राहणे चुकीचे. काळानुरुप बदल घडवणे, बदल स्वीकारणे आणि बदल करत राहणे आवश्यक आहे. प्राचीन काळानुसार, चालत आलेल्या अनेक पद्धती, रिती, परंपरा यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणूनच हिंदूत्व शाश्वत आहे. आचरण पद्धतींवर केलेले संस्कार म्हणजे संस्कृती. त्यामुळे हिंदूत्व हे संस्कृतीचे नाव आहे, असेही मोहन भागवत म्हणाले.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर