शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवली, सरसंघचालकांची मोदी सरकारला शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 10:06 IST

कलम 370 हटवण्यासह गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले.

नागपूर -  कलम 370 हटवण्यासह गेल्या लर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. मोदी सरकारमध्ये साहसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे, अशी शाबासकीही भागवत यांनी दिली. तसेच इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचेही सरसंघचालकांनी कौतुक केले. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी तिने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले, असे सरसंघचालक म्हणाले. 

आज विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा नागपूरमधील रेशीमबाग येथे होत आहे. या मेळाव्यात उपस्थित स्वयंसेवकांना मोहन भागवत यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, ''मागील सरकारला परत निवडून आणून देशाच्या जनतेने त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला आहे. सोबतच येणाऱ्या काळासाठी अनेक अपेक्षादेखील व्यक्त केल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. देशाची सुरक्षेची स्थिती, सैन्यदलाची तयारी, शासनाचे सुरक्षा धोर व आंतरराष्ट्रीय राजकारणात दाखविलेली कुशलता यामुळे आज जनता आश्वस्त आहे. जनतेची परिपक्व बुद्धी व कृती, देशात जागृत झालेला स्वाभिमान, शासनाचा दृढसंकल्प व वैज्ञानिक सामर्थ्य यामुळे मागील वर्ष संस्मरणीय राहिले आहे.'' ''देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीमा प्रदेशात सुरक्षा रक्षक तसेच चौक्यांची संख्या वाढवावी लागेल. तसेच सागरी सीमेवरील बेटांच्या सुरक्षेत वाढ व्हायला हवी,'' असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन व्हावे कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा तसेच सत्तेवर असलेल्यांचे स्वागतच व्हायला हवे. आता ३७० च्या आडून न झालेली कामे पूर्ण होतील तेव्हाच हे पाऊल पूर्ण होईल, असे समजले जाईल. तेथून घालविण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले पाहिजे. तसेच काश्मीर खोºयात रोजगार निर्मितीदेखील व्हावी, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. समरसतेची स्थिती हवी तशी नाहीदरम्यान, सरसंघचालकांनी सामाजिक भेदभावावरदेखील भाष्य केले. समाजात एकात्मता, समता व समरसतेची स्थिती जशी हवी होती, तशी अद्याप नाही. याचा लाभ देशविरोधी तत्व घेतात. समाजात भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत, असेदेखील डॉ.भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरNarendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370