शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

गारपीटग्रस्तांचे ९२ कोटींचे वीज देयक माफ

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

अकाली पाऊस व गारपिटीमुळे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सहा महिन्यांचे वीज बिल शासनाने माफ केले आहे. वीजमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्यातील

दिलासा : राज्यातील सहा लाख शेतकर्‍यांना फायदा

जितेंद्र दखने - अमरावती

अकाली पाऊस व गारपिटीमुळे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सहा महिन्यांचे वीज बिल शासनाने माफ केले आहे. वीजमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली असून राज्यातील ५ लाख ८७ हजार २४५ शेतकर्‍यांचे ९२ कोटी ४९ लाख ४१ हजारांचे वीज देयक माफ करण्यात आले आहे.

यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये अमरावती विभागातील वीज ग्राहक शेतकर्‍यांचे २४ कोटी ५ लाख २३ हजार रूपयांचे वीज देयके माफ करण्यात आली आहे.

अकाली पाऊस, गारपिटीत शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. यात पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. मोठय़ा प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी शासनाने जानेवारी ते जून २0१४ या सहा महिन्यांचे वीज बिल माफ केले.

याविषयी राज्य शासनाने महावितरण व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या मागवून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातून राज्यातील कोकण व कल्याण वगळता सर्व विभागातील ५ लाख ८७ हजार २४५ शेतकर्‍यांना याचा फायदा मिळणार आहे.

गारपिटीने सर्वाधिक नुकसान अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम या झोनमधील १ लाख ८२ हजार ६६८ शेतकर्‍यांचे झाल्याची माहिती पुढे आली आहे.

या जिल्ह्यातील वीज ग्राहक शेतकर्‍यांचे २४ कोटी ५ लाख रूपयांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. त्यासोबतच वीज वितरण कंपनीच्या इतर तीन विभागातील १ लाख ४८ हजार २९६ शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्याही शेतकर्‍यांचे वीज देयके माफ करण्यात आली आहे.