शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफचे 'लाख मोलाचे' ऑपरेशन अमानत; प्रवाशांना दिलासा, रोकड अन् दागिन्यांसह ९ लाखांचा ऐवज परत केला

By नरेश डोंगरे | Updated: February 17, 2024 20:48 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे.

नागपूर : रेल्वेची संपत्ती तसेच प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 'ऑपरेशन अमानत' अंतर्गत तत्परतेचा परिचय देऊन अवघ्या १० दिवसांत दोन प्रवाशांची रोकड आणि माैल्यवान चिजवस्तूंसह ९ लाखांचे साहित्य परत केले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे. वेगवेगळ्या कारणामुळे घरून पळून जाणाऱ्या, कुणी पळवून नेणाऱ्या किंवा अनवधानाने हरविलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्याची महत्वपूर्ण कामगिरी 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत बजावली जाते. तर, 'ऑपरेशन अमानत 'अंतर्गत चोरीला गेलेले किंवा चुकीने राहून गेलेले प्रवाशांचे सामान त्यांना परत मिळवून देण्याची कामगिरी आरपीएफ करते. ६ फेब्रुवारीला ०७८२९ गोंदिया-गढा पॅसेंजरमध्ये एका महिलेची बॅग राहून गेली. रेल्वे सुरक्षा दलाच्या बालाघाट चाैकीतील जवानांनी ज्या महिलेची ही बॅग होती, त्यांचा पत्ता शोधून त्यांना ती परत केली. बॅगमध्ये ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य होते.

अशाच प्रकारे राजनांदगाव (छत्तीसगड) मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची ट्रॉली बॅग घाईगडीत राहून गेली. त्या महिलेचा शोध घेऊन आरपीएफने ती बॅग परत केली. याबॅगमध्ये १ लाख, ६० हजारांची रोकड आणि अन्य सामान असे सुमारे पावणदोन लाखांचे साहित्य होते. घरच्यांना माहिती झाले तर काय होणार, अशी चिंता लागलेल्या या महिलांना अवघ्या काही तासातच रोख आणि दागिने परत मिळाल्याने त्या महिलांनी आरपीएफ जवानांचे तोंडभरून काैतुक केले. अशा प्रकारे १ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या दीड महिन्याच्या कालावधीत आरपीएफनेलहान मोठ्या २५ प्रकरणातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांचे ११ लाख, ४६ हजार, ८९९ रुपये किंमतीचे साहित्य परत केले. गेल्या वर्षी अशाच प्रकारे १६७ प्रकरणात प्रवाशांचे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किंमतीच्या चिजवस्तू परत मिळवून दिल्या होत्या, असेही आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी सांगितले.

घाईगडबड करू नकाया संबंधाने आर्य यांनी रेल्वेत प्रवास करताना कोणत्याही प्रकारची घाईगडबड करू नये, धावत्या गाडीत चढू अथवा उतरू नये. कुठे काही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ आरपीएफशी संपर्क करावा, असे आवाहनही आर्य यांनी रेल्वे प्रवाशांना केले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसjewelleryदागिने