शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफचे 'लाख मोलाचे' ऑपरेशन अमानत; प्रवाशांना दिलासा, रोकड अन् दागिन्यांसह ९ लाखांचा ऐवज परत केला

By नरेश डोंगरे | Updated: February 17, 2024 20:48 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे.

नागपूर : रेल्वेची संपत्ती तसेच प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 'ऑपरेशन अमानत' अंतर्गत तत्परतेचा परिचय देऊन अवघ्या १० दिवसांत दोन प्रवाशांची रोकड आणि माैल्यवान चिजवस्तूंसह ९ लाखांचे साहित्य परत केले.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे. वेगवेगळ्या कारणामुळे घरून पळून जाणाऱ्या, कुणी पळवून नेणाऱ्या किंवा अनवधानाने हरविलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्याची महत्वपूर्ण कामगिरी 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत बजावली जाते. तर, 'ऑपरेशन अमानत 'अंतर्गत चोरीला गेलेले किंवा चुकीने राहून गेलेले प्रवाशांचे सामान त्यांना परत मिळवून देण्याची कामगिरी आरपीएफ करते. ६ फेब्रुवारीला ०७८२९ गोंदिया-गढा पॅसेंजरमध्ये एका महिलेची बॅग राहून गेली. रेल्वे सुरक्षा दलाच्या बालाघाट चाैकीतील जवानांनी ज्या महिलेची ही बॅग होती, त्यांचा पत्ता शोधून त्यांना ती परत केली. बॅगमध्ये ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य होते.

अशाच प्रकारे राजनांदगाव (छत्तीसगड) मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची ट्रॉली बॅग घाईगडीत राहून गेली. त्या महिलेचा शोध घेऊन आरपीएफने ती बॅग परत केली. याबॅगमध्ये १ लाख, ६० हजारांची रोकड आणि अन्य सामान असे सुमारे पावणदोन लाखांचे साहित्य होते. घरच्यांना माहिती झाले तर काय होणार, अशी चिंता लागलेल्या या महिलांना अवघ्या काही तासातच रोख आणि दागिने परत मिळाल्याने त्या महिलांनी आरपीएफ जवानांचे तोंडभरून काैतुक केले. अशा प्रकारे १ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या दीड महिन्याच्या कालावधीत आरपीएफनेलहान मोठ्या २५ प्रकरणातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांचे ११ लाख, ४६ हजार, ८९९ रुपये किंमतीचे साहित्य परत केले. गेल्या वर्षी अशाच प्रकारे १६७ प्रकरणात प्रवाशांचे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किंमतीच्या चिजवस्तू परत मिळवून दिल्या होत्या, असेही आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी सांगितले.

घाईगडबड करू नकाया संबंधाने आर्य यांनी रेल्वेत प्रवास करताना कोणत्याही प्रकारची घाईगडबड करू नये, धावत्या गाडीत चढू अथवा उतरू नये. कुठे काही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ आरपीएफशी संपर्क करावा, असे आवाहनही आर्य यांनी रेल्वे प्रवाशांना केले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसjewelleryदागिने