शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

आरपीएफने गुन्हेगारात वचक निर्माण करावा : त्रिलोक कोठारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 19:34 IST

रेल्वे सुरक्षा दलाची प्रवाशांच्या सुरक्षिततेची कामगिरी मोलाची असून सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी सांभाळत असताना आरपीएफने गुन्हेगारात आपला वचक निर्माण करावा, असे प्रतिपादन अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी यांनी केले.

ठळक मुद्दे रेल्वे सुरक्षा दलाचा ३४ वा स्थापना दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाची प्रवाशांच्या सुरक्षिततेची कामगिरी मोलाची असून सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी सांभाळत असताना आरपीएफने गुन्हेगारात आपला वचक निर्माण करावा, असे प्रतिपादन अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी यांनी केले.रेल्वे सुरक्षा दलाच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त अजनी परेड मैदानावर आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. कार्यक्रमाला रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, लोहमार्ग पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे उपस्थित होते. कोठारी म्हणाले, आरपीएफने असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करून प्रवाशांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली आहे. रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून प्रवाशांचे महागडे साहित्य परत करण्यात येत आहे. मागील ४५० दिवसात रेल्वेस्थानकाला व्हेंडरमुक्त करण्यात आले आहे. १८२ हेल्पलाईन अपग्रेड झाल्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे. यावेळी कमांडंट सतीजा म्हणाले, आरपीएफने वर्षभरात आठ वेळा गांजाची तस्करी पकडून चार आरोपींना अटक केली. दारूची तस्करी करणाऱ्या ७२ जणांना अटक करून ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे संपत्तीची चोरी करणाºयांकडून ५२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. २४ रेल्वेगाड्यात स्कॉटिंग करण्यात येत असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थापना दिनाच्या परेडचे नेतृत्व आरपीएफच्या उपनिरीक्षक शिवानी बिधुरी, आमलाच्या उपनिरीक्षक गोपिका मानकर, अनुराधा मेश्राम, किरण पाठक, सुशिला अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमात श्वान रेक्स, जॉन यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी प्रमुख पाहुणे, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत केले. संचालन नेताजी शेंडे यांनी केले. आभार ए.सी. सिन्हा यांनी मानले. कार्यक्रमाला आरपीएफ नागपूर ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, दिनेश कुमार मिश्रा, सुरेश कांबळे, रामगोपाल निपसैया, बद्रिप्रसाद यादव, सुरेंद्र कुमार कोश्टा यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस