शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींचे रहस्य शोधण्यात सरकारांची भूमिका उदासीन : आनंद हर्डीकरांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:09 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ साली विमान अपघातातील मृत्यू हे आजही एक रहस्य आहे. त्यापुढच्या काळात सोव्हिएत रशिया, जपान, जर्मनी आदी देशातून वेगळे पुरावे समोर येतात. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे राहणारे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याच्या रहस्यमय गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींचे रहस्य उलगडण्यात कोणत्याच सरकारने सहकार्य केले नाही, अशी खंत प्रसिद्ध लेखक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ साली विमान अपघातातील मृत्यू हे आजही एक रहस्य आहे. त्यापुढच्या काळात सोव्हिएत रशिया, जपान, जर्मनी आदी देशातून वेगळे पुरावे समोर येतात. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे राहणारे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याच्या रहस्यमय गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींचे रहस्य उलगडण्यात कोणत्याच सरकारने सहकार्य केले नाही, अशी खंत प्रसिद्ध लेखक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केली.विदर्भ साहित्य संघ व राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेताजी, तुमि कोथाय?’ या विशेष व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग हे अध्यक्षस्थानी होते. हर्डीकर यांनी सांगितले, विमान अपघातात नेताजींच्या मृत्यूच्या बातमीनंतरही अनेक वर्ष ते परदेशात आणि वेगवेगळ्या वेशात भारतात राहत असल्याच्या अनेक अफवा ६०-७० च्या दशकात पसरल्या होत्या. यात सर्वात महत्त्वाचे रहस्य त्यांच्या गुमनामी बाबा म्हणून असलेल्या वास्तव्याचे आहे. सुरेश बाबू यांच्या कन्या व नेताजींच्या पुतणी ललिता बोस यांचा शोध सुरू होता. अशावेळी नेताजी उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे ‘भगवान बाबा’ या नावाने राहत असल्याची माहिती ‘नार्दन इंडिया’ या पत्रिकेतील लेखमालेतून प्रसिद्ध झाली होती. तोपर्यंत या गुमनामी बाबांचा मृत्यू झाला होता. १९८५ साली त्या आधारावर शक्तीसिंह यांनी ललिता बोस यांना फैजाबाद येथे चौकशी करण्याची सूचना केली. बोस यांनी पाहिले असता, नेताजींचे अस्तित्व दर्शविणारे अनेक साहित्य या गुमनामी बाबांच्या खोलीत आढळून आले होते. यात नेताजी यांच्या आईवडिलांसह त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्र, नातेवाईकांची पत्रे, शासकीय दस्तावेज आदींचा समावेश होता. ललिता बोस यांनी तत्कालीन उत्तरप्रदेश सरकारकडून सहकार्याची अपेक्षा केली, मात्र त्यांना ते मिळाले नाही. पुढे त्यांनी न्यायालयात जाऊन हे साहित्य सुरक्षित केले. पुढे अयोध्येत राममंदिराचे टाळे उघडले गेल्याने राजकारण त्याकडे वळले आणि हा विषय मागे पडल्याची खंत हर्डीकर यांनी व्यक्त केली. हे साहित्य अयोध्येमध्ये गुमनामी बाबांच्या दालनात ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.१९४५ च्या विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान पं. नेहरू आणि सरदार पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे टाळत १९५६ पर्यंत रेंगाळत ठेवली. त्यावेळी जनतेनेही चौकशीची मागणी लावून धरली नसल्याची खंत हर्डीकरांनी व्यक्त केली.१९७५ पर्यंत भारतीय गुप्तचर संस्थांमध्ये ब्रिटिशांचा हस्तक्षेप राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढे गुमनामी बाबा यांच्याबाबातही पत्रकारांनी व अभ्यासकांनी अनेक पुरावे गोळा केले. त्यावर चौकशीसाठी न्या. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेत आयोग नेमण्यात आला होता. वाजपेयी सरकारच्या काळात पुढाकार घेतला गेला. मात्र बाबांच्या साहित्यांची डीएनए टेस्ट किंवा इतर आधुनिक प्रक्रिया करण्याबाबत कुणीही लक्ष दिले नसल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही तर नेताजींचे दस्ताऐवज सार्वजनिक करण्याबाबतही राजकारण झाल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकीत भाजपा याचा लाभ घेणार या दबावातूनच ममता बॅनर्जी यांनी ६४ फाईली सार्वजनिक केल्याचेही त्यांनी नमूद केले. अभ्यासकांनी नेताजींबद्दलचे संशोधन करावे व त्यांचा देदीप्यमान इतिहास देशासमोर यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन नितीन सहस्रबुद्धे यांनी केले.

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसVidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ