शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

स्पेशल रेल्वे गाड्यांच्या नावाखाली प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST

नागपूर : कोरोनामुळे रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु या विशेष रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांकडून अधिक ...

नागपूर : कोरोनामुळे रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु या विशेष रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांकडून अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे. यात एका प्रवाशाला साधारणपणे २०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने नियमित रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

कोरोनामुळे रेल्वेत २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन करण्यात आले; परंतु जागोजागी अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमित रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे मे महिन्यापासून विशेष रेल्वे गाड्यांचा पर्याय शोधण्यात आला. परंतु या विशेष रेल्वे गाड्यांसाठी विशेष शुल्क आकारण्यात आले. नाइलाजास्तव प्रवाशांना हे शुल्क मोजावे लागत आहे. नियमित रेल्वे गाड्या सुरू असत्या तर प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली नसती. विशेष रेल्वे गाड्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला १०० ते २०० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. परंतु फायदा होत असल्यामुळे रेल्वे प्रशासन विशेष रेल्वे गाड्या चालवित असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून होत आहे. प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी नियमित रेल्वे गाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

.............

कोरोनाच्या आधी धावणाऱ्या रेल्वे गाड्या : १२५

आता धावत असलेल्या रेल्वे गाड्या : ९०

नागपूरवरून विविध ठिकाणचे प्रवासभाडे

मुंबईनियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१५६५, एसी थ्री-११२५, स्लिपर ४३०

विशेष रेल्वे गाड्या : एसी टू-१७१०, एसी थ्री-१२१०, स्लिपर ४६०

पुणे नियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१५१०, एसी थ्री-११६५, स्लिपर ४२५

विशेष रेल्वे गाड्या : एसी टू-१७२५, एसी थ्री-१२०५, स्लिपर ४४५

हैदराबाद नियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१२१०, एसी थ्री ७७०, स्लिपर-३५५

विशेष रेल्वेगाड्या : एसी टु-१३४०, एसी थ्री-९५५, स्लिपर-३६५

दिल्ली नियमित रेल्वे गाड्या : एसी टू-१७८०, एसी थ्री १२५५, स्लिपर-५१५

विशेष रेल्वे गाड्या : एसी टू-२०२०, एसी थ्री-१४२०, स्लिपर-५४०

नियमित रेल्वेगाड्या सुरू कराव्यात

‘रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या काळात विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या. परंतु या गाड्यांत अधिक प्रवासभाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांची लूट थांबवावी.’

-प्रशांत सरमोकदम, रेल्वे प्रवासी

आर्थिक लूट थांबवावी

‘विशेष रेल्वे गाड्यांच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. प्रवाशांना १०० ते २०० रुपये अधिक प्रवासभाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने प्रवाशांची आर्थिक लूट थांबवून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-विलास वानखेडे, रेल्वे प्रवासी

...........