शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उपराजधानीत माहितीचा अधिकार दिरंगाईच्या घेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:21 AM

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना वास्तवापासून दूर ठेवण्याचा अधिकार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप अनेक स्तरावरून केला जात आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र आयुक्ताअभावी प्रकरणे धूळखात सप्टेंबरमध्ये सुनावणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी विभागांतील कार्यप्रणालीची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, या हेतूने भारतात २००५ पासून माहितीचा अधिकार लागू करण्यात आला. मात्र, भ्रष्टाचाराला बगल देणारी यंत्रणा, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अपुरी नियुक्ती अन् असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना वास्तवापासून दूर ठेवण्याचा अधिकार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप अनेक स्तरावरून केला जात आहे.सामाजिक कार्यकर्ते राजेश पौनीकर यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. नागपूर विभागाच्या राज्य माहिती अधिकार आयोगावर गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतंत्र आयुक्तच नसल्याने, याचा अतिरिक्त पदभार औरंगाबादचे माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्यावर सोपविण्यात आला आहे. नागपूर विभागात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश होतो. विभागाकडे दररोज प्रत्येक जिल्ह्यांतून शेकडो अर्ज येत असतात. मात्र, पूर्णवेळ आयुक्ताअभावी सर्व प्रकरणे प्रलंबित आहेत. मार्च महिन्यापासून १४०० हून अधिक प्रकरणांवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशीच स्थिती पुणे व अमरावती विभागाची असून, या दोन्ही विभागांकडे पाच हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, नागपूर विभागाकडे सप्टेंबर महिन्यात एकाही प्रकरणावर सुनावणी झालेली नसल्याचे उघडकीस येत आहे. अशा तºहेने वर्तमान सरकारकडून मुद्दामहून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप पौनिकर यांनी लावला आहे. कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच आयुक्तांची नियुक्ती केली जात नाही. ज्यांची नियुक्ती केली जाते, ते दोषी कर्मचाऱ्यांना क्लीन चिट देऊन मोकळे होतात. या सगळ्यांची मंत्र्यांशी व नेत्यांशी तडजोड असून, राष्ट्रहितासाठी सरकारी विभागांवर कर्मठ आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार