शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

दर प्रिंट नसल्याने नागपुरात  १.६६ लाखांचे तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 00:54 IST

कळमना बाजारात दोन दुकानातून २५ किलोच्या तांदळाच्या पोत्यावर दराचे प्रिंट नसल्याने १.६६ लाख रुपयांचा तांदूळ जप्त केला आहे.

ठळक मुद्देमास्क व सॅनिटायझर जास्त दरात विक्रीची आठ प्रकरणे : सर्व विभागाने एकत्रित काम करावे

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनदरम्यान काळाबाजार आणि साठेबाजीच्या तक्रारी वाढल्यानंतर संबंधित विभाग सक्रिय झाला आहे. वैधमापनशास्त्र विभागाने मास्क आणि सॅनिटायझरची ठराविक पेक्षा जास्त दरात विक्री केल्याची आठ प्रकरणे नोंदविली आहेत. याशिवाय कळमना बाजारात दोन दुकानातून २५ किलोच्या तांदळाच्या पोत्यावर दराचे प्रिंट नसल्याने १.६६ लाख रुपयांचा तांदूळ जप्त केला आहे.तसे पाहता तक्रारींच्या तुलनेत कारवाईची संख्या फारच कमी आहे. याच कारणामुळे नफाखोरी करणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. अनेक व्यापारी ९० रुपये लिटरचे सोयाबीन तेल ११० ते १२० रुपयांत विकत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक व्यापारी भविष्यात जीवनावश्यक मालाचा तुटवडा होणार असल्याची सूचना ग्राहकांना देत आहेत. अखेर व्यापाऱ्यांची हिंमत का वाढत आहे, याचे कारण अनभिज्ञ आहे. पण त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अधिकारी कारवाई करीत नसल्याने साठेबाजी आणि नफाखोरीला बळ मिळत आहे. या प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यांच्यात कुठलाही ताळमेळ नाही. कुठल्याही संदर्भात एका विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला तर ते दुसऱ्या विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव सांगून जबाबदारी ढकलत आहेत. वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसंदर्भात ज्या प्रकारे कारवाई करून दंड वसूल केला होता, त्यानुसार सर्व विभागाने एकत्रितरीत्या साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.काय म्हणतात अधिकारीवैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक धनवंत कोवे म्हणाले, पॅकेट आणि सहा डिक्लेरेशन (प्रिंटेड रेट, वजन, उत्पादकाचे नाव, तारीख) आदी वस्तूंवर विभाग काम करते. जर ग्राहकाला बिलावर ठरावित किमतीपेक्षा जास्त दर आढळून आल्यास तो विभागाचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९४०४९५१८२८ यावर तक्रार करू शकतो. अशा स्थितीत प्रकरणाची त्वरित नोंद होते. स्टॉकशी जुळलेली प्रकरणे विभागाकडे येत नाहीत तर खुल्या खाद्य सामग्रीच्या दरात फरक असल्याची प्रकरणे अन्न विभागाशी संबंधित असतात. स्टॉकसंदर्भात अन्न पुरवठा अधिकारी-२ अनिल सवाई म्हणाले, सध्या कमी स्टॉकसंदर्भात कारवाई झालेली नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अभय देशमुख म्हणाले, तक्रारीनुसार कारवाई करण्यात येत आहे. औषधासंदर्भातील प्रकरणांमध्ये कारवाईसाठी वेगळे कलम आहेत.विश्वास वाढविण्याची संधीया संकटसमयी बहुतांश नागरिक मोहल्ल्यातील किराणा दुकानातून खरेदी करीत आहेत. दरामधील अंतर पाहून ऑनलाईन शॉपिंगला जास्त पसंती देत आहे. अशा स्थिती किराणा दुकानदारांना ग्राहकांचा विश्वास संपादन करायचा आहे. पण साठेबाजांना याचे काहीही औचित्य नसून ते मनमानी करीत आहेत. वैधमापनशास्त्र विभाग, अन्न पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित काम केल्यास अनुचित घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य होऊन साठेबाजी करणाऱ्यांवर आळा बसणार आहे.

टॅग्स :raidधाडfoodअन्न