शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
7
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
8
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
9
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
10
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
11
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
12
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
13
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
14
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
15
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
16
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
17
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
18
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
19
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
20
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न

नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:56 IST

जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला.

ठळक मुद्देगावातील १८ दिव्यांग बांधवांना केले अर्थसाहाय्य : करवसुलीचा निर्धारित टप्पा गाठल्याने राबविला नाविन्यपूर्ण

उपक्रमचक्रधर गभणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेवढा पैसा आला तेवढा कमीच असतो. तो एखाद्या व्यक्तीकडे असो संस्था-कंपनीकडे असो किंवा एखाद्या कार्यालयाकडे असो. पैसे हातचे सुटत नाही, हा मनुष्यजातच स्वभाव आहे. त्यामुळे खिशातून एक रुपया काढून दुसऱ्याला देताना खूप विचार केला जातो. दुसरीकडे समाजशील असलेला मनुष्यच त्याला अपवाद ठरतो. हजारो-लाखोंमध्ये एखादा मनुष्य दुसऱ्याच्या आर्थिक मदतीसाठी हात पुढे करतो. सर्वच ग्रामपंचायतींचेही तसेच काहीसे समीकरण आहे. जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसाग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाची सर्व स्तरातून दखल घेण्यात आली. तब्बल १८ दिव्यांग बांधवांना मदत करून ग्रामपंचायतने इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला.रेवराल ग्रामपंचायतने यावर्षी करवसुलीचे निर्धारित लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी ९१ टक्क्यांपर्यंत करवसुली करण्यात ग्रामपंचायतला यश आले. करवसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनीही हातभार लावल्यानेच ही उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने करवसुलीतील तब्बल ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग-अंध बांधवांना अर्थसाहाय्य म्हणून देण्याचे ठरविले. दिव्यांग बांधवांना औषधोपचार वा इतर आर्थिक बाबीसाठी तो खर्च करता येईल, असा विचार प्रशासनाने केला. त्यानुसार ग्रामपंचायतने याबाबत सभा घेऊन प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने पारित केला.ठरल्यानुसार गावातील १८ गरीब, गरजू, दिव्यांग बांधवांची यादी तयार करण्यात आली. त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले. त्या सर्वांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले आणि सर्वांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाने दिव्यांग बांधवांनीही ग्रामपंचायतचे आभार मानले. या कार्यक्रमाला सरपंच चिंतामण मदनकर, उपसरपंच महेंद्र बोरघरे, ग्रामविकास अधिकारी सी. एस. बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील मस्के, रोशन मेश्राम, सुनीता गाढवे, अनिता मोहनकर, रेखा लोणकर, माला सोनेकर, छाया चुटे आदी उपस्थित होते.यांना केले अर्थसाहाय्यकरवसुलीतील ३ टक्के निधीतून एकूण १८ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये वॉर्ड क्र. १ मधील सुधाकर बिल्लारे, माया आस्वले, रामचंद्र वानखेडे, ईश्वर मेश्राम, बालचंद मस्के, पपिता राऊत, वॉर्ड क्र. २ मधील राहुल मदनकर, प्रभाकर मदनकर, वॉर्ड क्र. ३ मधील टेकचंद लोणकर, बलदेव श्रावणकर, जनार्दन सरोदे, मनोज नेवारे, वॉर्ड क्र. ४ मधील अमर सूर्यवंशी, शोभाराम मते, रामा हरकंडे, गौरव मुळे, आयुष पटले, सुखदेव खांडेकर यांचा समावेश आहे. छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर