शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नागपूर जिल्ह्यातील रेवराल ग्रामपंचायतने जपली ‘सामाजिक बांधिलकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:56 IST

जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसा ग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला.

ठळक मुद्देगावातील १८ दिव्यांग बांधवांना केले अर्थसाहाय्य : करवसुलीचा निर्धारित टप्पा गाठल्याने राबविला नाविन्यपूर्ण

उपक्रमचक्रधर गभणे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जेवढा पैसा आला तेवढा कमीच असतो. तो एखाद्या व्यक्तीकडे असो संस्था-कंपनीकडे असो किंवा एखाद्या कार्यालयाकडे असो. पैसे हातचे सुटत नाही, हा मनुष्यजातच स्वभाव आहे. त्यामुळे खिशातून एक रुपया काढून दुसऱ्याला देताना खूप विचार केला जातो. दुसरीकडे समाजशील असलेला मनुष्यच त्याला अपवाद ठरतो. हजारो-लाखोंमध्ये एखादा मनुष्य दुसऱ्याच्या आर्थिक मदतीसाठी हात पुढे करतो. सर्वच ग्रामपंचायतींचेही तसेच काहीसे समीकरण आहे. जेवढी जास्त करवसुली होईल, तिजोरी भरेल, तो पैसाग्रामपंचायत आणि गावाच्या विकासाच्या कामात उपयोगात आणता येईल, असा सर्वसाधारण नियमच आहे. मात्र याला काहीसा अपवाद ठरली ती रेवराल ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतने करवसुलीचे निर्धारित उद्दिष्ट गाठल्यानिमित्त करवसुलीतील ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग, गरीब बांधवांना देण्याचा समाजहितोपयोगी उपक्रम राबविला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाची सर्व स्तरातून दखल घेण्यात आली. तब्बल १८ दिव्यांग बांधवांना मदत करून ग्रामपंचायतने इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला.रेवराल ग्रामपंचायतने यावर्षी करवसुलीचे निर्धारित लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी ९१ टक्क्यांपर्यंत करवसुली करण्यात ग्रामपंचायतला यश आले. करवसुलीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनीही हातभार लावल्यानेच ही उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने करवसुलीतील तब्बल ३ टक्के निधी हा गावातील दिव्यांग-अंध बांधवांना अर्थसाहाय्य म्हणून देण्याचे ठरविले. दिव्यांग बांधवांना औषधोपचार वा इतर आर्थिक बाबीसाठी तो खर्च करता येईल, असा विचार प्रशासनाने केला. त्यानुसार ग्रामपंचायतने याबाबत सभा घेऊन प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने पारित केला.ठरल्यानुसार गावातील १८ गरीब, गरजू, दिव्यांग बांधवांची यादी तयार करण्यात आली. त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले. त्या सर्वांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले आणि सर्वांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाने दिव्यांग बांधवांनीही ग्रामपंचायतचे आभार मानले. या कार्यक्रमाला सरपंच चिंतामण मदनकर, उपसरपंच महेंद्र बोरघरे, ग्रामविकास अधिकारी सी. एस. बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील मस्के, रोशन मेश्राम, सुनीता गाढवे, अनिता मोहनकर, रेखा लोणकर, माला सोनेकर, छाया चुटे आदी उपस्थित होते.यांना केले अर्थसाहाय्यकरवसुलीतील ३ टक्के निधीतून एकूण १८ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी १५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये वॉर्ड क्र. १ मधील सुधाकर बिल्लारे, माया आस्वले, रामचंद्र वानखेडे, ईश्वर मेश्राम, बालचंद मस्के, पपिता राऊत, वॉर्ड क्र. २ मधील राहुल मदनकर, प्रभाकर मदनकर, वॉर्ड क्र. ३ मधील टेकचंद लोणकर, बलदेव श्रावणकर, जनार्दन सरोदे, मनोज नेवारे, वॉर्ड क्र. ४ मधील अमर सूर्यवंशी, शोभाराम मते, रामा हरकंडे, गौरव मुळे, आयुष पटले, सुखदेव खांडेकर यांचा समावेश आहे. छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर