शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट केस: मोठी कारवाई! हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक; उमरचे कॉल डिटेल्स ठरले महत्त्वाचे
2
Ditwah: 'दितवा' चक्रीवादळ कोणत्याहीक्षणी धडकणार; 'या' ३ राज्यांना रेड अलर्ट, ४७ उड्डाणे रद्द!
3
सरकारी गॅरंटीसह दुप्पट फायदा! पोस्ट ऑफिसच्या 'या' FD स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास मिळेल बंपर रिटर्न!
4
रेल्वे अचानक दोन भागात विभागली, बंगळुरू स्पेशल एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला; आराजवळ कपलिंग तुटले
5
Sanchar Saathi: एका महिन्यात ५० हजारांहून अधिक हरवलेले मोबाईल परत; 'हे' सरकारी ॲप ठरले गेमचेंजर! 
6
महिला कॉन्स्टेबलने आयुष्य संपवले, मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहिले हे; धक्कादायक कारण आले समोर
7
सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन एफआयआर दाखल
8
IND vs SA 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा उतरणार मैदानात! कुठं अन् कसा पाहता येईल सामना?
9
Mohan Bhagwat: वाद करणे हा भारताचा स्वभाव नाही, सहकार्य- एकत्र चालण्याची संस्कृती- भागवत
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना फायदा, मनासारखे घडेल; धनलाभ, ६ राशींना त्रासाचा, काळजी घ्या!
11
‘फक्त ६ जणच आलेत, बाकीचे कुठे आहेत’? राहुल गांधींचा सवाल, नेते म्हणाले आपले एवढेच आमदार जिंकलेत
12
सेहरा सजा के रखना! पूजा बिरारीच्या हातावर रंगली मेहंदी; सोहम बांदेकर म्हणतो, 'बापरे...'
13
भारत-रशियात लष्करी कराराची शक्यता; पुतीन भारत दौऱ्यावर, तज्ज्ञ काय म्हणतात ?
14
आजचे राशीभविष्य, ३० नोव्हेंबर २०२५: मेष-मिथुनसाठी उत्साह, कन्या-तूळ राशीला सुख-समृद्धी; वाचा तुमचे भविष्य
15
कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका
16
"धरमजी अमर आहेत...", दिल्लीहून परत येताच शत्रुघ्न सिन्हांनी घेतली देओल कुटुंबाची भेट
17
सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकला, संजनासोबत घेतले सात फेरे; फोटो-व्हिडीओ समोर
18
मुंबई-पुणे कॉरिडॉर : भारताच्या नव्या सेवा अर्थव्यवस्थेचा बूस्टर, नीती आयोगाचा अहवाल
19
देशाच्या नौदलाचे बळ वाढले! तारागिरी युद्धनौकेचे जलावतरण, निलगिरी वर्गातील चौथी प्रगत स्वदेशी 'स्टील्थ फ्रिगेट' ताफ्यात दाखल
20
काही लोकांना १० वर्षे आधीच होऊ शकतो कॅन्सर? टाटा मेमोरियलचा अभ्यास
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक विकास मंडळांचे लवकरच पुनरुज्जीवन : डाॅ.भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 14:17 IST

दरडोई उत्पन्नाची तुलना करता महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा भारतीय जनता पक्ष तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अजेंड्यावर

नागपूर :

दरडोई उत्पन्नाची तुलना करता महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा भारतीय जनता पक्ष तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अजेंड्यावर असून विदर्भ, मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनाचा विषय लवकरच मार्गी लागेल. त्या दृष्टीने आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा करीत असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे दिली. 

नागपूर दौऱ्यावर आलेल्या डॉ. कराड यांनी गुरुवारी सायंकाळी ‘लोकमत’ भवनाला सदिच्छा भेट दिली. ख्यातनाम उद्योजक व आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अयोध्या रामी रेड्डी त्यांच्यासोबत होते. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी उभयतांचे स्वागत केले. यावेळी मनमोकळी चर्चा करताना डॉ. कराड म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेली प्रादेशिक विकास मंडळे पुन्हा कार्यरत व्हावीत. जेणेकरून जिल्ह्याजिल्ह्यांचे मागासलेपण मोजले जावे, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतानाही तशी घोषणा केली आहे. यासंदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली असून, लवकरच या मंडळांचे पुनरुज्जीवन होईल. 

दरडोई उत्पन्न कमी असलेल्या देशभरातील ११२ जिल्ह्यांना ॲस्पिरेशनल डिस्ट्रीक्ट्स किंवा आकांक्षित जिल्ह्यांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील नंदुरबार, वाशिम, धाराशिव व गडचिरोली हे चार जिल्हे आहेत. या जिल्ह्यांवर भाजपचे विशेष लक्ष असून, अशा जिल्ह्यांमध्ये उद्योग, शेती, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. आपण स्वत: या महिन्यात नंदुरबारमध्ये यासंदर्भात बैठक घेत आहोत.मराठवाडा विकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने विदर्भ, मराठवाड्याचे मागासलेपण आपण जवळून अनुभवले आहे. ते दूर करण्यासाठी चाकोरीबाहेरच्या काही गोष्टी करण्याची गरज आहे. त्यानुसार, आपण स्वत: परिश्रम घेऊन छत्रपती संभाजीनगरजवळच्या विस्तीर्ण अशा नाथसागर धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यातून लवकरच १२०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होईल. हा किमान आशिया खंडातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट असेल.

ईशान्य भारताचा कायापालट झाला- पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात ईशान्य भारताचा अक्षरश: कायापालट झाला. २०१४च्या पूर्वीची ईशान्य भारतातील सात राज्यांची स्थिती व नंतरची स्थिती यातील फरक स्पष्टपणे जाणवतो. प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांनी एक महिना यापैकी एका राज्याला द्यावा, असे पंतप्रधानांचे निर्देश आहेत. त्यानुसार आपल्याकडे आधी सिक्कीमची जबाबदारी होती, तर या महिन्यात अरुणाचल प्रदेशची जबाबदारी आहे. - तेथील विकास प्रक्रियेचा नुकताच आढावा घेतला असून, बँका व विमा कंपन्यांशी संबंधित बरीच कामे मार्गी लावली आहेत. याशिवाय, पक्षाने आपल्यावर गुजरातमधील जुनागड, पाटण व आणंद तसेच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली व धाराशिव या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी विश्वासाने सोपविली आहे. राज्यातील या जागा शिवसेना लढवायची. तेथे पुन्हा भाजप-शिवसेना युतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.