शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

टॅब परत करा ! नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:08 IST

साडेसात वर्षाच्या जवळपास जिल्हा परिषदेत अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना एका झटक्यात शासनाने परतीचा मार्ग दाखविला. शासनाने दिलेल्या वस्तू पत्र पाठवून परत मागविल्या आहे. जि.प. सदस्यांना दिलेले टॅब परत करा, असे आदेश जि.प. सदस्यांना दिले आहे.

ठळक मुद्देसदस्यांची गोची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेसात वर्षाच्या जवळपास जिल्हा परिषदेत अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना एका झटक्यात शासनाने परतीचा मार्ग दाखविला. शासनाने दिलेल्या वस्तू पत्र पाठवून परत मागविल्या आहे. जि.प. सदस्यांना दिलेले टॅब परत करा, असे आदेश जि.प. सदस्यांना दिले आहे.सत्तेत असताना सलाम ठोकणाऱ्या प्रशासनाने सत्ता गेल्याबरोबरच सदस्यांना रामराम ठोकला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जि.प.चे सदस्यही अपडेट रहावे, या उद्देशातून २१ लाख रुपयांचे टॅब जि.प.च्या पदाधिकाऱ्यांपासून सदस्यांना वाटण्यात आले होते. परंतु नव्याच्या नवलाईसारखे दोन दिवस हे टॅब सदस्यांच्या हाती दिसले. नंतर मात्र हे टॅब घरातच राहिले, तर कुणाच्या मुलांच्या वापरात आले. बोटावर मोजण्याइतके सदस्य सोडल्यास अनेकांनी टॅब वापरल्याचे आढळले नाही.विशेष म्हणजे केंद्र सरकारने घोषित केलेल्या डिजिटल इंडियाच्या धर्तीवर सदस्यही अपडेट व्हावा व ग्रामस्थांपर्यंत प्रत्येक योजना आणि उपक्रमांची माहिती पोहचविण्यासाठी त्या सदस्यांना टेक्नोसॅव्ही करण्याचा निर्णय जि.प.ने घेतला होता. यासाठी जि.प. माजी अध्यक्ष निशा सावरकर यांनी ग्राम विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ३१ मार्च २०१६ रोजी जि.प. ला पत्र पाठवून टॅबला मंजुरी दिली होती. जि.प. ने स्वत:च्या सेस फंडातून ५८ सदस्यासाठी २१ लाखावर तरतूद केली. हे टॅब निवडणुका लागल्यानंतर जि.प.प्रशासनाकडे परत करावे लागणार, अशी अट देतानाच घातली होती. १८ जुलै रोजी जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना प्रशासनाने कुलूप लावले. त्यांचे बंगले, वाहने प्रशासनाने ताब्यात घेतले. आता टॅब परत करण्यासाठी प्रत्येक सदस्याला पत्र पाठविण्यात आले आहे.काहींना पत्र मिळाले, काहींना गेले फोनसामान्य प्रशासन विभागाने पं.स. च्या माध्यमातून टॅब परत करण्यासाठी पत्र पाठविले आहे. काही सदस्यांना पत्र मिळाले तर काही सदस्यांना पं.स. मधून फोन सुद्धा गेले आहे. विशेष म्हणेज काही सदस्यांनी टॅब घेतला नसतानाही त्यांनाही पत्र गेले आहे. काही सदस्यांनी टॅब परत करण्यासाठी प्रशासनाला स्वत:हून विचारणा केली. पण ज्यांचे टॅब खराब झाले असेल, हरविले असेल तर त्यांची गोची होणार आहे. विशेष म्हणजे टॅब परत न केल्यास, गहाळ झाल्यास भरपाई करून न दिल्यास, त्यांना निवडणुकीला उभे राहता येत नाही, असा नियम आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरtabletटॅबलेट