शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के : इशिका सतिजा नागपुरात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 20:53 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरून अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिच्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करत तृतीय स्थानावर राहिला.

ठळक मुद्देविभाग राज्यात तळाशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरून अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिच्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करत तृतीय स्थानावर राहिला. 

विज्ञान शाखेतून डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कनक गजभिये ही ९४.१६ टक्के (६१२) गुण मिळवत प्रथम आली आहे. तर कला शाखेतून हिस्लॉप महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थिनी पाखी मोर हिने ९५.६ टक्के गुण मिळवत ‘टॉप’ केले.विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार १३८ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ६६ हजार ५८६ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.३२ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७८.८९ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ५८ हजार ३१९ पैकी १ लाख ३० हजार ६३२ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.नियमित विद्यार्थ्यांची विभागीय आकडेवारीअभ्यासक्रम          परीक्षार्थी        उत्तीर्ण          टक्केवारीविज्ञान                  ६८,३४१         ६१,०९८       ८९.४४कला                   ६०,४९४          ४४,४९५       ७३.६१वाणिज्य               २१,९१७          १९,००९        ८६.७९एमसीव्हीसी          ७,६७५           ६,०३०          ७८.७०एकूण               १,५८,३१९       १,३०,६३२     ८२.५१विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ४४७ म्हणजेच ८७.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातून ६२ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व यातील ५२ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.३२ टक्के इतकी आहे. विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १२ हजार ९०१ पैकी ८ हजार ८७३ म्हणजे ६८.८० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा                निकाल टक्केवारी (२०१९)           निकाल टक्केवारी (२०१८)भंडारा                 ८४.५३ %                                   ८८.७३ %चंद्रपूर                 ८०.८९ %                                   ८६.८२ %नागपूर                 ८४.३२ %                                 ८९.७२ %वर्धा                     ८०.५२ %                                  ८२.६८ %गडचिरोली           ६८.८० %                                 ८०.९८ %गोंदिया                ८७.९९ %                                  ८९.३६ %विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ४४७ म्हणजेच ८७.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातून ६२ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व यातील ५२ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.३२ टक्के इतकी आहे. विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १२ हजार ९०१ पैकी ८ हजार ८७३ म्हणजे ६८.८० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा         निकाल टक्केवारी (२०१९)           निकाल टक्केवारी (२०१८)भंडारा          ८४.५३ %                                 ८८.७३ %चंद्रपूर          ८०.८९ %                                  ८६.८२ %नागपूर         ८४.३२ %                                  ८९.७२ %वर्धा              ८०.५२ %                                 ८२.६८ %गडचिरोली    ६८.८० %                               ८०.९८ %गोंदिया         ८७.९९ %                               ८९.३६ %

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर