शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

बारावीत नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के : इशिका सतिजा नागपुरात ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 20:53 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरून अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिच्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करत तृतीय स्थानावर राहिला.

ठळक मुद्देविभाग राज्यात तळाशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरून अखेरच्या स्थानावर घसरण झाली आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८२.५१ टक्के इतकी आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपुरातील के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी इशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. तिच्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करत तृतीय स्थानावर राहिला. 

विज्ञान शाखेतून डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कनक गजभिये ही ९४.१६ टक्के (६१२) गुण मिळवत प्रथम आली आहे. तर कला शाखेतून हिस्लॉप महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थिनी पाखी मोर हिने ९५.६ टक्के गुण मिळवत ‘टॉप’ केले.विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७७ हजार १३८ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ६६ हजार ५८६ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.३२ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७८.८९ टक्के इतके आहे. सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ५८ हजार ३१९ पैकी १ लाख ३० हजार ६३२ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.नियमित विद्यार्थ्यांची विभागीय आकडेवारीअभ्यासक्रम          परीक्षार्थी        उत्तीर्ण          टक्केवारीविज्ञान                  ६८,३४१         ६१,०९८       ८९.४४कला                   ६०,४९४          ४४,४९५       ७३.६१वाणिज्य               २१,९१७          १९,००९        ८६.७९एमसीव्हीसी          ७,६७५           ६,०३०          ७८.७०एकूण               १,५८,३१९       १,३०,६३२     ८२.५१विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ४४७ म्हणजेच ८७.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातून ६२ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व यातील ५२ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.३२ टक्के इतकी आहे. विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १२ हजार ९०१ पैकी ८ हजार ८७३ म्हणजे ६८.८० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा                निकाल टक्केवारी (२०१९)           निकाल टक्केवारी (२०१८)भंडारा                 ८४.५३ %                                   ८८.७३ %चंद्रपूर                 ८०.८९ %                                   ८६.८२ %नागपूर                 ८४.३२ %                                 ८९.७२ %वर्धा                     ८०.५२ %                                  ८२.६८ %गडचिरोली           ६८.८० %                                 ८०.९८ %गोंदिया                ८७.९९ %                                  ८९.३६ %विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून १९ हजार ८४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ४४७ म्हणजेच ८७.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातून ६२ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व यातील ५२ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ८४.३२ टक्के इतकी आहे. विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १२ हजार ९०१ पैकी ८ हजार ८७३ म्हणजे ६८.८० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा         निकाल टक्केवारी (२०१९)           निकाल टक्केवारी (२०१८)भंडारा          ८४.५३ %                                 ८८.७३ %चंद्रपूर          ८०.८९ %                                  ८६.८२ %नागपूर         ८४.३२ %                                  ८९.७२ %वर्धा              ८०.५२ %                                 ८२.६८ %गडचिरोली    ६८.८० %                               ८०.९८ %गोंदिया         ८७.९९ %                               ८९.३६ %

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर