शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

रेस्टॉरन्ट, बारचालकांना नियमांचे ‘बंधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 9:43 PM

अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे.

ठळक मुद्दे करावे लागणार सर्व नियमांचे पालन : शासनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार आहेत.रेस्टॉरन्ट आणि बार व्यवसायाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाखो लोक जुळले आहेत. नागपुरात अडीच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरन्ट आणि तेवढेच फूटपाथवर खाद्य विक्रेते आहेत. या माध्यमातून जवळपास २५ ते ३० हजार लोकांना पुन्हा रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरन्ट व्यवसायाशी जुळलेल्या असोसिएशनसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. ५० टक्के उपस्थितीसह परवानगी दिली आहे. एका टेबलवर दोन वा तीन व्यक्तींना बसण्याची परवानगी राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात अनलॉक-४ मध्ये केंद्र सरकारने या संदर्भात निर्णय घेण्याचे आवाहन राज्य शासनाला केले होते. या अंतर्गत काही राज्यात रेस्टॉरन्ट सुरू झाले आहेत. पण महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शासनाने रेस्टॉरन्ट आणि बार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती.

पुरवठादारांचा कच्च्या मालाचा व्यवसाय वाढणारनागपुरात रेस्टॉरन्ट आणि बारची संख्या जास्त आहे. या प्रतिष्ठानांमध्ये असंघटित क्षेत्रातील सर्वाधिक लोक काम करतात. त्यांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचा व्यवसाय वाढणार आहे. पूर्वी काऊंटरवरून मद्य विक्रीला परवानगी होती. पण बार सुरू होताच ग्राहकांची संख्या वाढेल, असे बार संचालकांनी सांगितले. याशिवाय फूटपाथवर विक्री करणाऱ्या खाद्य विक्रेत्यांच्या व्यवसायात वाढ होणार आहे.हॉटेल व रेस्टॉरंट संचालकांनी सांगितले की, पूर्वी पार्सलला परवानगी होती. आता शासनाच्या परवानगीने व्यवसायात पुन्हा उत्साह येणार आहे. ग्राहकांना कोरोना नियमांचे पालन करून रेस्टॉरन्टमध्ये यावे लागेल. याशिवाय आम्हीही नियमांतर्गत व्यवसाय चालविणार आहोत. एका वा दोन दिवसात शासनाची नियमावली येणार आहे.असे असतील नियमरेस्टॉरन्ट व बारमध्ये ५० टक्के अर्थात एका टेबलवर दोन वा तीन जणांना परवानगीसॅनिटायझरची व्यवस्था मालकांना करावी लागणारग्राहकांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारककर्मचाऱ्यांना मास्क व ग्लोव्हज बंधनकारकवेळेचे बंधन पाळावे लागणाररेस्टॉरन्ट व बार नियमित सॅनिटाईज करणे बंधनकारक

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर