शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सरकारी कंपनीकडे ‘अमृत’ची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:21 IST

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका प्रशासनाने सहावेळा निविदा काढल्या. परंतु खासगी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काहींनी निविदा सादर केल्या परंतु त्या ३५ टक्केहून अधिक दराच्या होत्या. मात्र आता शासनाच्या वाप्कोस कंपनी प्रकल्पाच्या २३ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यताखासगी कंपन्यांचा प्रतिसाद नाही : वाप्कोस २३ टक्के अधिक दरावर काम करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका प्रशासनाने सहावेळा निविदा काढल्या. परंतु खासगी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काहींनी निविदा सादर केल्या परंतु त्या ३५ टक्केहून अधिक दराच्या होत्या. मात्र आता शासनाच्या वाप्कोस कंपनी प्रकल्पाच्या २३ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.शहरातील अधिकृत व अनधिकृत वस्त्या व झोपडपट्टी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने २२६.६९ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला २८ आॅक्टोबर २०१६ रोजी मंजुरी दिली आहे. त्यानंतर १९ एप्रिल २०१७ ला २२७.७९ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रकल्पाच्या चारवेळा संयुक्त निविदा काढल्या. सुरुवातीला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या दीड वर्षात सहावेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु कंत्राटदारांनी निर्धारित दरात काम करण्याची तयारी दर्शविली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे.नंतर ३५ टक्के अधिक दराच्या निविदा आल्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अमृत योजनेच्या कामाची सहा टप्प्यात विभागणी क रून निविदा काढली. शेवटी २२.१४ टक्के अधिक दराने २७८.२१ कोटीत हा प्रकल्प राबविण्याची तयारी खासगी कंत्राटदाराने दर्शविली. दरम्यान ३० जानेवारी २०१८ रोजी जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारच्या वाप्कोस लिमिटेड कंपनीने काम करण्याची तयारी दर्शविली. अखेर या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. महापालिकेच्या सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.प्रकल्पाच्या खर्चात वारंवार बदलसुुरुवातील वाफ्कोस कंपनीने प्रकल्पाचे प्राकलन २२ टक्के अधिक दराचे म्हणजेच २२६.६९ कोटीचे व सल्लागार शुल्क ८ टक्के असा एकूण २९८.६९ कोटींचा प्रस्ताव महापालिकेला दिला. चर्चेत कंपनीने २० टक्के अधिक दर व सल्लागार शुल्क ५ टक्के कमी करण्याची तयारी दर्शविली. आता या प्रकल्पाचा खर्च २८५.६२ कोटी झाला आहे. हा प्रस्ताव २७ मार्च २०१८ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. १ जून २०१८ जीवन प्राधिकरणने सुधारित आराखडा तयार केला. त्यानुसार राज्य सरकारने २५ जून २०१८ ला २७३.७८ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली.सल्लागाराचे शुल्कही कमी केलेराज्य सरकारने हिरवी झेंडी दिल्यानतंर २९ जून २०१८ रोजी आयुक्तांनी वाफ्कोस कंपतीच्या अधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले. यात सल्लागार शुल्क ५ टक्केवरून ३ टक्के कमी करण्याला कंपनीने संमती दर्शविली. आता वाप्कोस कंपनी २८०.१८ कोटीत हा प्रकल्प राबविणार आहे.मनपाचा वाटा १३६.८९ कोटींचाअखेर अमृत योजनेच्या सुधारित २७३.७८ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यात केंद्र सरकारचा वाटा ३३.३३ टक्के म्हणजेच ९१.२५ कोटी, राज्य सरकार १६.६७ टक्के म्हणजेच ४५.६४ कोटी तर महापालिकेला ५० टक्के वाटा उचलावयाचा असून यावर १३६.८९ कोटी खर्च करावे लागतील. राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी २२.३० कोटी प्राप्त झाले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी