शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मौद्रिक धोरणातून झळकली रिझर्व्ह बँकेची हतबलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 10:11 IST

गेल्या सहा महिन्यात रेपो रेट ६.५० टक्क्यावरून ५.७५ टक्क्यावर आला तरी सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर सतत कमी होतो आहे आणि हीच हतबलता शक्तिकांत दास यांच्या आजच्या मौद्रिक धोरणातूनही झळकते आहे.

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाल्यानंतर शक्तिकांत दास यांनी तीन मौद्रिक धोरणे दिली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक धोरणात रेपो रेट पाव टक्क्याने कमी केला. गेल्या सहा महिन्यात रेपो रेट ६.५० टक्क्यावरून ५.७५ टक्क्यावर आला तरी सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर सतत कमी होतो आहे आणि हीच हतबलता शक्तिकांत दास यांच्या आजच्या मौद्रिक धोरणातूनही झळकते आहे.आपल्या वक्तव्यामध्ये शक्तिकांत दास यांनी अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापार प्रभावित झाल्याचे व कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर झाल्याने जीडीपीचा दर कमी झाला असून महागाई वाढल्याचे मान्य केले. चालू वर्षासाठी (२०१९-२०) जीडीपीचा दर ७.२० टक्क्याऐवजी ७ टक्क्याने वाढेल व महागाईचा दर २.९० टक्क्यावरून ३.३० टक्क्यांवर वाढणार असल्याचे भाकीत केले आहे.पायाभूत क्षेत्राच्या सिमेंट, पोलाद, वीज निर्मिती, कोळसा, खनिज उत्पादन व कृषी उत्पादन अशा आठही उद्योगात मंदी आली आहे. ती दूर करण्यासाठी बाजारात भांडवल तरलता (लिक्विडिटी) वाढवणे आवश्यक आहे. पण तरलतेसाठी काय उपाययोजना करायची हे ठरविण्यासाठी एक समिती नेमून शक्तिकांत दास मोकळे झाले. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात समिती नेमण्याचा हा प्रकार प्रथमच घडला आहे.बँकांचे ९ लाख कोटी थकीत कर्ज वसुलीसाठी या आठवड्यात नवीन परिपत्रक काढू असेही दास यांनी जाहीर केले. नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज (एनबीएफसी) व दिवाण हाऊसिंग फायनान्ससारख्या कंपन्या कर्ज सापळ्यात अडकल्या आहेत. त्याबाबतही मौद्रिक धोरण गप्प आहे.एवढेच नव्हे तर एनबीएफसीजचे नियंत्रण सेबीकडे आहे व गृहकर्ज कंपन्यांचे नियंत्रण नॅशनल हाऊसिंग बँक करते, रिझर्व्ह बँक करते असा कातडी वाचवणारा युक्तिवादही या मौद्रिक धोरणात प्रथमच दिसला. मजेची बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यात रेपो रेटमध्ये ०.७५ टक्क्यांची घट झाली असली तरी बँकांनी मात्र व्याजाचे दर फक्त ०.२१ टक्क्यांनी घटवले आहेत. त्यामुळे बँका रिझर्व्ह बँकेचे धोरण पाळत नाहीत हे दास यांनीच मान्य केले आहे.रिझर्व्ह बँकेची ही हतबलता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ‘निफ्टी’ व मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स यांच्या गडगडण्यातूनही दिसते आहे. गेल्या दहा दिवसांपासून ४०,००० च्या आसपास असणारा सेन्सेक्स, मौद्रिक धोरण जाहीर झाल्यावर एक तासातच ५५३ अंकांनी व निफ्टी १७६ अंकांनी घसरला व अनुक्रमे ३९५२९.७२ वर व ११८४४.७० अंकावर बंद झाला.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक