शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
2
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: २४ तासांची परवानगी, मग आता तुम्ही कोणत्या अधिकारात तिथे बसला आहात; हायकोर्टाचा सवाल
4
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
5
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
6
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
7
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
8
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
9
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
10
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
11
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
12
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
13
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
14
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
15
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
16
Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव
17
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
18
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
19
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
20
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

ओबीसींचे आरक्षण मोदी, फडणवीस यांच्यामुळेच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:09 IST

नागपूर : महाराष्ट्रात ओबीसींची खरी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनीच केली. आरक्षण पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यामुळेच गेले, असे शरसंधान ...

नागपूर : महाराष्ट्रात ओबीसींची खरी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनीच केली. आरक्षण पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यामुळेच गेले, असे शरसंधान ओबीसींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी साधले.

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात शनिवारी झालेल्या प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. मुख्य वक्ते ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते. प्रा. हरी नरके यांनी ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जनगणनेचा मुद्दा सविस्तर मांडला. ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, याचे विवेचन केले. राष्ट्रनिर्मिती आणि सामाजिक न्याय यांवर रावसाहेब कसबे म्हणाले, सद्य:स्थितीत देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. ओबीसी म्हणणारे केंद्रीय नेतृत्वच ओबीसीला संपवायला निघाले आहे. सामान्य माणूस खडतर स्थितीतून जात असल्याने ओबीसी नेतृत्वाची गरज त्यांनी व्यक्त केली.

उत्तम कांबळे यांनी सामाजिक न्यायामध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची सोदाहरण मांडणी केली. केवळ आरक्षण देऊन चालणार नाही. देशाची संपत्ती व अधिकारांचे समान वाटप होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आम्ही ५२ टक्के आहोत, या भ्रमात राहू नका. यासाठी आतून आणि बाहेरून लढाई लढावी लागणार आहे.

प्रारंभी परिषदेचे प्रास्ताविक महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांनी केले. कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राष्ट्रवादी काॅंंग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मनोज गणोरकर, मिलिंद पाचपोर, अरुण पवार, दत्ता खरात, निळकंठ पिसे, आरिफ काजी, डाॅ. अनिल ठाकरे, बापू चरडे, कविता मुंगळे, विद्या बहेकर, राहुल निर्वाण, नफिस शेख, विजय लोनबले, निशा मुंडे, रेखा कृपाले, वंदना वनकर, आदींसह समता परिषद, ओबीसी सेल व विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

...

संघभूमीतून नरके यांनी संघावर डागली तोफ

रेशीमबाग परिसरातील सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीतून प्रा. हरी नरके यांनी पत्रकार परिषदेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली. अलीकडे दत्तात्रय होसबळे यांची आरक्षणासंदर्भात आलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेची चिरफाड करताना ते म्हणाले, संघाची आरक्षणासंदर्भात भूमिका बदलली, असे या प्रतिक्रियेवरून समजण्याचे कारण नाही; कारण संघाचा ९६ वर्षांचा प्रवासच आरक्षणमुक्त भारताचा आणि सामाजिक न्यायाच्या विरोधातील आहे. मंडल आयोगाच्या वेळी कमंडलू यात्रा काढणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेररचनेदरम्यान मंत्र्यांचा परिचय करून देताना मोदी यांना अचानकपणे आलेला ओबीसी खासदारांचा कळवळा हासुद्धा दिखाऊपणा आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत फडणवीसांनी दिशाभूल केली. त्यांच्या खोटारडेपणाचे २७ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

...