शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

ओबीसींचे आरक्षण मोदी, फडणवीस यांच्यामुळेच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:09 IST

नागपूर : महाराष्ट्रात ओबीसींची खरी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनीच केली. आरक्षण पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यामुळेच गेले, असे शरसंधान ...

नागपूर : महाराष्ट्रात ओबीसींची खरी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनीच केली. आरक्षण पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यामुळेच गेले, असे शरसंधान ओबीसींचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी साधले.

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात शनिवारी झालेल्या प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. मुख्य वक्ते ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते. प्रा. हरी नरके यांनी ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जनगणनेचा मुद्दा सविस्तर मांडला. ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, याचे विवेचन केले. राष्ट्रनिर्मिती आणि सामाजिक न्याय यांवर रावसाहेब कसबे म्हणाले, सद्य:स्थितीत देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. ओबीसी म्हणणारे केंद्रीय नेतृत्वच ओबीसीला संपवायला निघाले आहे. सामान्य माणूस खडतर स्थितीतून जात असल्याने ओबीसी नेतृत्वाची गरज त्यांनी व्यक्त केली.

उत्तम कांबळे यांनी सामाजिक न्यायामध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची सोदाहरण मांडणी केली. केवळ आरक्षण देऊन चालणार नाही. देशाची संपत्ती व अधिकारांचे समान वाटप होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आम्ही ५२ टक्के आहोत, या भ्रमात राहू नका. यासाठी आतून आणि बाहेरून लढाई लढावी लागणार आहे.

प्रारंभी परिषदेचे प्रास्ताविक महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांनी केले. कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राष्ट्रवादी काॅंंग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मनोज गणोरकर, मिलिंद पाचपोर, अरुण पवार, दत्ता खरात, निळकंठ पिसे, आरिफ काजी, डाॅ. अनिल ठाकरे, बापू चरडे, कविता मुंगळे, विद्या बहेकर, राहुल निर्वाण, नफिस शेख, विजय लोनबले, निशा मुंडे, रेखा कृपाले, वंदना वनकर, आदींसह समता परिषद, ओबीसी सेल व विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

...

संघभूमीतून नरके यांनी संघावर डागली तोफ

रेशीमबाग परिसरातील सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमीतून प्रा. हरी नरके यांनी पत्रकार परिषदेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोफ डागली. अलीकडे दत्तात्रय होसबळे यांची आरक्षणासंदर्भात आलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेची चिरफाड करताना ते म्हणाले, संघाची आरक्षणासंदर्भात भूमिका बदलली, असे या प्रतिक्रियेवरून समजण्याचे कारण नाही; कारण संघाचा ९६ वर्षांचा प्रवासच आरक्षणमुक्त भारताचा आणि सामाजिक न्यायाच्या विरोधातील आहे. मंडल आयोगाच्या वेळी कमंडलू यात्रा काढणारे कोण होते हे सर्वांना माहीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेररचनेदरम्यान मंत्र्यांचा परिचय करून देताना मोदी यांना अचानकपणे आलेला ओबीसी खासदारांचा कळवळा हासुद्धा दिखाऊपणा आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत फडणवीसांनी दिशाभूल केली. त्यांच्या खोटारडेपणाचे २७ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

...