शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

एससींच्या विकासासाठी आरक्षण महत्त्वाचे : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:59 IST

शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देजागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित जागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी डॉ. थोरात यांची प्रगट मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. थोरात म्हणाले, लोकांच्या मताने लोक प्रतिनिधी निवडून येत असल्यामुळे लोकशाहीची घसरण झाली नाही. परंतु वैचारिकतेत, धर्मनिरपेक्षतेतही घसरण झाली आहे. प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. परंतु काही राज्यात धर्माच्या आधारावर सत्ता स्थापन होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शासनाचे एससी, एसटीबाबतचे धोरण बदलल्यामुळे दलितात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. राज्यात अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. मागील पाच वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी योग्य ती तरतूद न केल्यामुळे त्याचा विकासावर परिणाम झाला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात येत असल्यामुळे एससींचा मार्ग बंद झाला आहे. विकास हा गरिबापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दारिद्र्य संपेल असा विकास व्हावा. शेती, उद्योगधंद्यांचे उत्पन्न वाढावे, पण त्यासोबतच गरिबांचेही उत्पन्न वाढण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. परंतु गरिबीत महाराष्ट्र ११ व्या क्रमांकावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाच्या खासगीकरणावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शैक्षणिक विषमता वाढून त्याचा परिणाम रोजगारावर होईल. शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती होत असून खासगी कंपन्यातही आरक्षण मिळत नसल्यामुळे एससींच्या विकासावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.आंबेडकरी चळवळीतील गटबाजी धोकादायकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून महाडचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिरात प्रवेश मिळविला. पुढे त्यांनी उभारलेल्या चळवळीचे गटातटात विभाजन झाले.एससींच्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे या विभाजनाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा डॉ. थोरात यांनी दिला.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीreservationआरक्षण