शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

एससींच्या विकासासाठी आरक्षण महत्त्वाचे : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:59 IST

शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देजागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित जागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी डॉ. थोरात यांची प्रगट मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. थोरात म्हणाले, लोकांच्या मताने लोक प्रतिनिधी निवडून येत असल्यामुळे लोकशाहीची घसरण झाली नाही. परंतु वैचारिकतेत, धर्मनिरपेक्षतेतही घसरण झाली आहे. प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. परंतु काही राज्यात धर्माच्या आधारावर सत्ता स्थापन होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शासनाचे एससी, एसटीबाबतचे धोरण बदलल्यामुळे दलितात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. राज्यात अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. मागील पाच वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी योग्य ती तरतूद न केल्यामुळे त्याचा विकासावर परिणाम झाला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात येत असल्यामुळे एससींचा मार्ग बंद झाला आहे. विकास हा गरिबापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दारिद्र्य संपेल असा विकास व्हावा. शेती, उद्योगधंद्यांचे उत्पन्न वाढावे, पण त्यासोबतच गरिबांचेही उत्पन्न वाढण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. परंतु गरिबीत महाराष्ट्र ११ व्या क्रमांकावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाच्या खासगीकरणावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शैक्षणिक विषमता वाढून त्याचा परिणाम रोजगारावर होईल. शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती होत असून खासगी कंपन्यातही आरक्षण मिळत नसल्यामुळे एससींच्या विकासावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.आंबेडकरी चळवळीतील गटबाजी धोकादायकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून महाडचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिरात प्रवेश मिळविला. पुढे त्यांनी उभारलेल्या चळवळीचे गटातटात विभाजन झाले.एससींच्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे या विभाजनाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा डॉ. थोरात यांनी दिला.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीreservationआरक्षण