शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

एकरी २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:19 IST

तळोधी, बाळापूरच्या अण्णासाहेब पोशेट्टीवार फार्म प्रयोगशाळेत रासायनिक खतांऐवजी ऑर्गेनिक पद्धतीने एकराला २५ ते २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाची प्रजाती विकसित केली आहे.

ठळक मुद्देतळोधी, बाळापूर येथे प्रयोगसर्वोत्तम सहा प्रजाती केल्या विकसित

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक एकर जागेत १७ ते १८ क्विंटलचे उत्पादन देणाऱ्या धानाला सर्वोत्तम प्रजातीचा धान समजला जातो. पाच ते सहा क्विंटलपासून वाढलेले हे उत्पादन १८ क्विंटलपर्यंत पोहचले आहे. मात्र अस्तित्वात असलेल्या या प्रजातींची ही उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी रासायनिक खते, कीटनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही.मात्र तळोधी, बाळापूरच्या अण्णासाहेब पोशेट्टीवार फार्म प्रयोगशाळेत रासायनिक खतांऐवजी ऑर्गेनिक पद्धतीने एकराला २५ ते २७ क्विंटल उत्पादन देणाऱ्या धानाची प्रजाती विकसित केली आहे. तळोधी हिरा-१२५ या नावाच्या या प्रजातीवर सध्या ट्रायल सुरू असून, येत्या दोन वर्षात ती शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.तळोधी परिसरात १४ एकरच्या शेतात धानाचे नवनवे सर्वोत्तम वाण विकसित करण्याचे प्रयत्न गेल्या १६ वर्षांपासून सुरू आहेत. शेतकरी आणि शास्त्रज्ञ असा समन्वय ठेवून बार्कचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार आणि पीकेव्ही, अकोलाचे डॉ. आनंद मुकेवार यांच्या मार्गदर्शनात आसावरी व नीलेश पोशेट्टीवार हे या फार्म प्रयोगशाळेचे काम चालवीत आहेत. बीजोत्सवांतर्गत महिला शेतकरी संमेलनात आसावरी यांनी या संशोधनाबाबत माहिती दिली. शेतामधल्या वेगळ्या प्रकारच्या धानाची फार्म प्रयोगशाळेत लागवड केली जाते. त्यावर बाह्य गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून धानाचे पूर्णविकसित लोंब कव्हर करून टॅग करण्यात येते.आलेल्या धान्यातून निकृष्ट धान बाजूला करून पुन्हा त्याची लागवड केली जाते. अशा तीन-चार प्रक्रियेनंतर विकसित झालेल्या सर्वोत्तम प्रजातींची १५० एकरच्या शेतात वेगवेगळी लागवड केली जाते. या प्रयोगात निर्धारित क्षमता सिद्ध झाली की हे विकसित वाण शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे आसावरी यांनी सांगितले. पोशेट्टीवार फार्म प्रयोगशाळेत गेल्या १६ वर्षात ‘पार्वती चिन्नोर, पार्वती सूत-२७, बासमती-३३, साईभोग’ या सुवासिक आणि ‘तळोधी हिरा-१३५’ या सुगंधित नसलेल्या धानाची प्रजाती विकसित केली आहे.याशिवाय आरोग्यास अतिलाभदायक असलेली ‘तळोधी रेड-२५’ हा लाल रंगाचा धानही विकसित करण्यात आला आहे. हे सर्व धान कमी दिवसात आणि अल्प पाण्यात पिकणारे ऑर्गेनिक धान असल्याचे आसावरी यांनी स्पष्ट केले. लवकरच सर्वात कमी म्हणजे १२५ दिवसात पिकणारा ‘तळोधी हिरा-१२५’ हे वाण शेतकºयांपर्यंत पोहचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :agricultureशेती