शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नाकारलेल्या दीड लाख वॅगन्सची रेल्वेकडून दुरूस्ती

By नरेश डोंगरे | Updated: May 24, 2024 21:54 IST

मालवाहतुकीतून मालामाल : ९८६ कोटींचा अतिरिक्त महसूल.

नागपूर : मालवाहतुकीसाठी अयोग्य असल्याचा ठपका ठेवून नाकारण्यात आलेल्या सुमारे दीड लाख वॅगन्सची नव्याने दुरूस्ती करून रेल्वे प्रशासनाने त्या वापरात आणल्या. या माध्यमातून मध्य रेल्वेला ९८६ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसुल मिळाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात चंद्रपूर, बल्लारशाह, घुग्गूस, वणी, माजरी उमरेड तसेच मकरधोकडा या भागात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी कोळसा पाठविला जातो. या कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रेल्वेच्या वॅगन्स वारंवार वापरात येत असल्याने ठिकठिकाणाहून त्या डॅमेज होतात. अर्थात, कुण्या वॅगनची फ्लोअर, कुणाचे दार तर कुण्या वॅगनचा दुसराच कोणता पार्ट खराब होतो. अशा वॅगन्समधून मालवाहतूक करणे धोकादायक ठरते. त्यामुळे डॅमेज झालेली वॅगन लोडिंगसाठी उभी झाल्यास तिची तपासणी करणाऱ्या स्टाफकडून ती वापरायोग्य नाही, असा शेरा मारून त्या वॅगनला बाहेर काढले जाते.

२०२३-२४ या वर्षभराच्या कालावधीत अशा प्रकारे चंद्रपूर, बल्लारशाह, घुग्गूस, वणी, माजरी उमरेड तसेच मकरधोकडा या साईडिंगवरून तब्बल १, ५४, ८७२ वॅगन्स वापरण्यायोग्य नसल्याने नाकारण्यात आल्या होत्या. त्यातील १, ४८, ३२८ वॅगन्सची दुरूस्ती करून त्या वापरण्यायोग्य बनविण्यात मध्य रेल्वेने यश मिळवले. दुरस्तीनंतर त्या चांगल्या झाल्या की नाही, त्याचा वापर खरेच केला जाऊ शकतो का, हे तपासण्यासाठी रेल्वेचा एक स्वतंत्र विभाग आहे. तो त्या वॅगन्सची तपासणी केल्यानंतर तसे प्रमाणपत्र जारी करतो. या विभागाने नाकारण्यात आलेल्या वॅगन्सपैकी दुरूस्तीनंतर ९६ टक्के वॅगन्स वापरण्यायोग्य असल्याचे प्रमाणित केले. त्यामुळे त्या वॅगन्सचा पुन्हा वापर सुरू झाला असून त्यातून नागपूर विभागाला ९८५.७९ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर