शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

मतदान प्रक्रियेतील घोळ दूर करा : भाजपची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:19 IST

मतदार यादीमधील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, अशा अनेक समस्यांमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद केली होती. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व घोळ दूर करा, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत आल्या होत्या अडचणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मतदार यादीमधील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, अशा अनेक समस्यांमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद केली होती. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीदरम्यान होऊ नये यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व घोळ दूर करा, अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. शिष्टमंडळामध्ये आमदार डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, सुनील मित्रा, दिलीप गौर, मुकेश साधवानी तसेच सर्व प्रभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात मतदारांशी संबंधित अनेक तक्रारींबाबत अवगत करण्यात आले. लोकसभा निवडणुकीदरम्यान एकाच कु टुंबातील सदस्यांचे वेगवेगळ्या बुथवर मतदान होते. नियमित असणारे केंद्र बदलविण्यात आल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला. मतदारांचे मतदार केंद्र हे त्यांच्या निवासस्थानापासून एक-दोन किमीच्या अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी अनेक मतदारांचे केंद्र त्यांच्या घरापासून आठ ते दहा किलोमीटर दूर असल्याने मतदानाची टाळाटाळ झाल्याच्या तक्रारीही नागरिकांनी दिल्या होत्या. ही अडचण दूर करण्याची मागणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत असंख्य मतदारांचे विधानसभा क्षेत्रच बदलले होते. उत्तर नागपूरच्या मतदारांचे नाव पूर्व नागपूरमध्ये गेल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. ही बाब निवेदनात नमूद करण्यात आली. मृतांची नावे वगळण्यात यावी, मतदार यादी शुद्ध व्हावी आणि मतदारांच्या मतदान केंद्राची माहिती ८ दिवसांपूर्वी उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणीही भाजपने यावेळी केली.विशेष म्हणजे भाजपने यापूर्वीही मतदारांच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यामध्ये नोंदणीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात यावा, ऑनलाईन अर्जात त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याकरिता बीएलओकडून कोणतीही विचारणा होत नाही. ऑनलाईन अर्जाची प्रिंट मिळण्याची मुभा नही. पोच पावतीची , ट्रॅक नंबरचे प्रिंट काढता येत नाही. ऑनलाईन अर्ज मंजूर होण्याचा कालावधी कमी करावा आणि जुने प्लास्टिक लॅमिनेटेड कार्ड हरवल्यास, खराब झाल्यास, न मिळाल्यास, नवीन कार्ड बनवून मिळण्याची मोठी यंत्रणा उभारण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयMLAआमदारBJPभाजपाElectionनिवडणूक