शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

नाणार प्रकल्प विदर्भातच स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भातच स्थलांतरित करावा, अशी मागणी केली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भातच स्थलांतरित करावा, अशी मागणी केली असून, परत एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आश्वासन दिले होते, त्यांनी याचे पालन करावे, असे या पत्रातून देशमुख यांनी म्हटले आहे.

रत्नागिरीच्या नाणार येथील ३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भात हलवा, अशा मागणीचे निवेदन देशमुख यांनी २९ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत भेटीत हा प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करू, असे आश्वासन दिल्याचा दावा देशमुख यांनी केला. रत्नागिरीच्या नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेनेचा व स्थानिक लोकांचा विरोध आहे. हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. शिवाय विदर्भातील ४० ते ४५ हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व १ लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी, अशी मागणी देशमुख यांनी या पत्रातून केली आहे.

समृद्धी महामार्गाशेजारी पाईपलाईन उभारावी

पानिपत, भटिंडा, दिल्ली, बिना, गोवाहाटी इत्यादी ठिकाणी इनलँड रिफायनरी प्रकल्प आहेत. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाईपलाईनने जोडल्या आहेत. समृद्धी महामार्गाच्या शेजारीदेखील अशाच प्रकारे विदर्भ ते मुंबई बंदराला जोडणारी पाईपलाईन उभारता येईल. हा प्रकल्प विदर्भात आला तर आजुबाजूच्या राज्यांचादेखील फायदा होईल, असे देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.