शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

३० वर्षाच्या गुडघेदुखीपासून मिळाली मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना ...

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना गुडघेदुखीची समस्या सुरू झाली होती. १० वर्षापूर्वी तर त्यांना चालताही येत नव्हते. पाय तिरपे झाले होते. पूर्ण शरीर कठोर झाले होते. याच दरम्यान त्यांना वाताच्या समस्येनेही ग्रासले. त्वचा काळवंडायला लागली होती. अन्न ग्रहणही कठीण झाले होते. गुडघे बदलण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

बरीच वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार झाले. मात्र, गुण येत नव्हते. सगळीकडून हताश झाल्यानंतर त्या डॉ. नितेश खोंडे यांच्याकडे गेल्या. तेथे त्यांना योग्य उपचार मिळाले आणि गुण मिळायला लागले. त्यामुळे, त्या आता सहज चालू शकत आहेत. तब्बल २५-३० वर्षानंतर आता स्कूटरवर बसणे शक्य होत असल्याचे शोभा काबरा यांनी सांगितले. सलग सहा महिनेपर्यंत उपचार घेतल्यानंतर त्यांची समस्या कमी झाली. सोबतच डोकेदुखी, श्वसनासंदर्भातील अडचण, छातीतील अकडन, डोक्यातील अकडन आदीपासून मुक्ती केली आहे.

डॉ. नितेश खोंडे यांनी शोभा काबरा यांच्यावर केलेल्या उपचारांबाबत स्पष्टीकरण दिले. ईलापिडी, पोडीकिडी, पीडिचिल, नवराकिडी, शिरोधारा, जानोधारा, उपनाह अवगाह, संकर स्वे चिकित्सा, लेपनम, शिला करपोराधी, गौरीकाधी, लता हिंगवाधि, परीऑस्ट, परीकैल्प, इंसोकैल्प आदींचा समावेश उपचारात केला. सुरुवातीच्या सहा महिन्यात त्यांच्या गुडघेदुखीतील ९० टक्के समस्या कमी झाल्या. आता तीन वर्षाच्या उपचारानंतर त्या पूर्णत: समस्यामुक्त झाल्याचे खोंडे म्हणाले.

* करावा लागला नातेवाईकांच्या विरोधाचा सामना

शोभा काबरा यांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यास स्वत:च्याच नातेवाईकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. पती व मुलाकडूनच आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केल्या जात होत्या. या उपचाराने काहीच शक्य होणार नाही, असे वारंवार बोलले जात होते. परंतु, शोभा काबरा यांना आयुर्वेदानेच लाभ मिळेल यावर विश्वास होता आणि अखेर तो विश्वास खरा ठरला. आयुर्वेदिक उपचारावर त्या ठाम राहिल्या आणि आज त्यांच्या समस्या पूर्णत: समाप्त झाल्या आहेत.

* प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदाचे उपचार घेतल्यास ज्यादा लाभ

सामान्यत: रुग्ण सगळीकडे फिरून आल्यावर आयुर्वेदाकडे वळतात. मात्र, तोवर बराच उशीर झालेला असतो. असे असतानाही रुग्णाला तात्काळ लाभ मिळण्याची अपेक्षा असते. आजाराच्या प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदिक उपचार घेण्यास सुरुवात केली तर लाभ लवकर मिळतो. उशिराने येण्यामुळे आजारही वाढलेला असतो. त्यामुळेच, आजारापासून मुक्ती मिळण्यासही वेळ लागतो. त्याच कारणाने आयुर्वेदिक उपचारात वेळ देणे गरजेचे असते.

.......