शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षाच्या गुडघेदुखीपासून मिळाली मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना ...

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना गुडघेदुखीची समस्या सुरू झाली होती. १० वर्षापूर्वी तर त्यांना चालताही येत नव्हते. पाय तिरपे झाले होते. पूर्ण शरीर कठोर झाले होते. याच दरम्यान त्यांना वाताच्या समस्येनेही ग्रासले. त्वचा काळवंडायला लागली होती. अन्न ग्रहणही कठीण झाले होते. गुडघे बदलण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

बरीच वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार झाले. मात्र, गुण येत नव्हते. सगळीकडून हताश झाल्यानंतर त्या डॉ. नितेश खोंडे यांच्याकडे गेल्या. तेथे त्यांना योग्य उपचार मिळाले आणि गुण मिळायला लागले. त्यामुळे, त्या आता सहज चालू शकत आहेत. तब्बल २५-३० वर्षानंतर आता स्कूटरवर बसणे शक्य होत असल्याचे शोभा काबरा यांनी सांगितले. सलग सहा महिनेपर्यंत उपचार घेतल्यानंतर त्यांची समस्या कमी झाली. सोबतच डोकेदुखी, श्वसनासंदर्भातील अडचण, छातीतील अकडन, डोक्यातील अकडन आदीपासून मुक्ती केली आहे.

डॉ. नितेश खोंडे यांनी शोभा काबरा यांच्यावर केलेल्या उपचारांबाबत स्पष्टीकरण दिले. ईलापिडी, पोडीकिडी, पीडिचिल, नवराकिडी, शिरोधारा, जानोधारा, उपनाह अवगाह, संकर स्वे चिकित्सा, लेपनम, शिला करपोराधी, गौरीकाधी, लता हिंगवाधि, परीऑस्ट, परीकैल्प, इंसोकैल्प आदींचा समावेश उपचारात केला. सुरुवातीच्या सहा महिन्यात त्यांच्या गुडघेदुखीतील ९० टक्के समस्या कमी झाल्या. आता तीन वर्षाच्या उपचारानंतर त्या पूर्णत: समस्यामुक्त झाल्याचे खोंडे म्हणाले.

* करावा लागला नातेवाईकांच्या विरोधाचा सामना

शोभा काबरा यांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यास स्वत:च्याच नातेवाईकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. पती व मुलाकडूनच आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केल्या जात होत्या. या उपचाराने काहीच शक्य होणार नाही, असे वारंवार बोलले जात होते. परंतु, शोभा काबरा यांना आयुर्वेदानेच लाभ मिळेल यावर विश्वास होता आणि अखेर तो विश्वास खरा ठरला. आयुर्वेदिक उपचारावर त्या ठाम राहिल्या आणि आज त्यांच्या समस्या पूर्णत: समाप्त झाल्या आहेत.

* प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदाचे उपचार घेतल्यास ज्यादा लाभ

सामान्यत: रुग्ण सगळीकडे फिरून आल्यावर आयुर्वेदाकडे वळतात. मात्र, तोवर बराच उशीर झालेला असतो. असे असतानाही रुग्णाला तात्काळ लाभ मिळण्याची अपेक्षा असते. आजाराच्या प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदिक उपचार घेण्यास सुरुवात केली तर लाभ लवकर मिळतो. उशिराने येण्यामुळे आजारही वाढलेला असतो. त्यामुळेच, आजारापासून मुक्ती मिळण्यासही वेळ लागतो. त्याच कारणाने आयुर्वेदिक उपचारात वेळ देणे गरजेचे असते.

.......