शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

३० वर्षाच्या गुडघेदुखीपासून मिळाली मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना ...

भरतनगर, नागपूर येथील निवासी शोभा रतन काबरा गेल्या २५ - ३० वर्षापासून गुडघेदुखीपासून त्रस्त होत्या. दुसऱ्या प्रसुती पासूनच त्यांना गुडघेदुखीची समस्या सुरू झाली होती. १० वर्षापूर्वी तर त्यांना चालताही येत नव्हते. पाय तिरपे झाले होते. पूर्ण शरीर कठोर झाले होते. याच दरम्यान त्यांना वाताच्या समस्येनेही ग्रासले. त्वचा काळवंडायला लागली होती. अन्न ग्रहणही कठीण झाले होते. गुडघे बदलण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

बरीच वर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांकडे होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार झाले. मात्र, गुण येत नव्हते. सगळीकडून हताश झाल्यानंतर त्या डॉ. नितेश खोंडे यांच्याकडे गेल्या. तेथे त्यांना योग्य उपचार मिळाले आणि गुण मिळायला लागले. त्यामुळे, त्या आता सहज चालू शकत आहेत. तब्बल २५-३० वर्षानंतर आता स्कूटरवर बसणे शक्य होत असल्याचे शोभा काबरा यांनी सांगितले. सलग सहा महिनेपर्यंत उपचार घेतल्यानंतर त्यांची समस्या कमी झाली. सोबतच डोकेदुखी, श्वसनासंदर्भातील अडचण, छातीतील अकडन, डोक्यातील अकडन आदीपासून मुक्ती केली आहे.

डॉ. नितेश खोंडे यांनी शोभा काबरा यांच्यावर केलेल्या उपचारांबाबत स्पष्टीकरण दिले. ईलापिडी, पोडीकिडी, पीडिचिल, नवराकिडी, शिरोधारा, जानोधारा, उपनाह अवगाह, संकर स्वे चिकित्सा, लेपनम, शिला करपोराधी, गौरीकाधी, लता हिंगवाधि, परीऑस्ट, परीकैल्प, इंसोकैल्प आदींचा समावेश उपचारात केला. सुरुवातीच्या सहा महिन्यात त्यांच्या गुडघेदुखीतील ९० टक्के समस्या कमी झाल्या. आता तीन वर्षाच्या उपचारानंतर त्या पूर्णत: समस्यामुक्त झाल्याचे खोंडे म्हणाले.

* करावा लागला नातेवाईकांच्या विरोधाचा सामना

शोभा काबरा यांना आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यास स्वत:च्याच नातेवाईकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. पती व मुलाकडूनच आयुर्वेदिक उपचार पद्धतीवर वारंवार शंका उपस्थित केल्या जात होत्या. या उपचाराने काहीच शक्य होणार नाही, असे वारंवार बोलले जात होते. परंतु, शोभा काबरा यांना आयुर्वेदानेच लाभ मिळेल यावर विश्वास होता आणि अखेर तो विश्वास खरा ठरला. आयुर्वेदिक उपचारावर त्या ठाम राहिल्या आणि आज त्यांच्या समस्या पूर्णत: समाप्त झाल्या आहेत.

* प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदाचे उपचार घेतल्यास ज्यादा लाभ

सामान्यत: रुग्ण सगळीकडे फिरून आल्यावर आयुर्वेदाकडे वळतात. मात्र, तोवर बराच उशीर झालेला असतो. असे असतानाही रुग्णाला तात्काळ लाभ मिळण्याची अपेक्षा असते. आजाराच्या प्रारंभिक अवस्थेतच आयुर्वेदिक उपचार घेण्यास सुरुवात केली तर लाभ लवकर मिळतो. उशिराने येण्यामुळे आजारही वाढलेला असतो. त्यामुळेच, आजारापासून मुक्ती मिळण्यासही वेळ लागतो. त्याच कारणाने आयुर्वेदिक उपचारात वेळ देणे गरजेचे असते.

.......