शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींना दिलासा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:19 IST

Nagpur : सरकारच्या घोषणेच्या पूर्ततेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सौरभ ढोरे लोकमत न्यूज नेटवर्क काटोल : राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशनही आटोपले. लाडक्या बहिणींना खात्यात डिसेंबरचा हप्ता येणे सुरू झाले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घोषणेप्रमाणे शतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार, असा प्रश्न विचारत आहे. महायुती सरकार राज्यात आल्यास २०१९ पासून ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे अशांची सरसकट कर्ज माफी करू अशी घोषणा करण्यात आली होती. तसे घोषणा पत्रसुद्धा भाजपच्या वतीने काढण्यात आले होते.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी जाहीर करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी कृती समितीचे महादेव नखाते, मनोज जवंजाळ, कृष्णा डफरे, प्रा. वीरेंद्र इंगळे, अंगात भैस्वार, स्वप्नील धोटे आदी शेकऱ्यांनी केली आहे. 

"राज्यात २००२ पासून आजपर्यंत तीनवेळा कर्जमाफी जाहीर करण्यात आल्या. यात कधी शेतीच्या आकारमानावर तर कधी किमान रक्कम ठरवून कर्जमाफी घोषणा करण्यात आली. मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकालेला नाही. विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मागील तीनही कर्ज माफीचा फायदा होऊ शकलेला नाही. अशात नव्याने स्थापन झालेल्या सरकार मतदार म्हणून बळीराजाने भरभरून मतदान करीत रेकॉर्ड तोडून सरकार दिले आहे. आता त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे." - कृष्णा डफरे, शेतकरी

"गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यात बँकेची हुशारी कारणीभूत आहे. काही शेतकऱ्यावर २००३ पासून कर्ज आहे. बँकेने पाहिली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुद्दल आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकेने शासनाला दिली. याला पुनर्गठन असे नाव दिले. या हुशारीमुळेच शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीत बसलेला नाही. त्यामुळे आता तरी पुनर्गठन शब्द वगळून सरसकट अशी कर्ज माफी जाहीर करण्यात यावी." - महादेव नखाते शेतकरी कृती समिती

टॅग्स :Farmerशेतकरीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाfarmingशेतीnagpurनागपूर