शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लाडक्या बहिणींना दिलासा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 17:19 IST

Nagpur : सरकारच्या घोषणेच्या पूर्ततेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सौरभ ढोरे लोकमत न्यूज नेटवर्क काटोल : राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशनही आटोपले. लाडक्या बहिणींना खात्यात डिसेंबरचा हप्ता येणे सुरू झाले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घोषणेप्रमाणे शतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार, असा प्रश्न विचारत आहे. महायुती सरकार राज्यात आल्यास २०१९ पासून ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे अशांची सरसकट कर्ज माफी करू अशी घोषणा करण्यात आली होती. तसे घोषणा पत्रसुद्धा भाजपच्या वतीने काढण्यात आले होते.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफी जाहीर करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी कृती समितीचे महादेव नखाते, मनोज जवंजाळ, कृष्णा डफरे, प्रा. वीरेंद्र इंगळे, अंगात भैस्वार, स्वप्नील धोटे आदी शेकऱ्यांनी केली आहे. 

"राज्यात २००२ पासून आजपर्यंत तीनवेळा कर्जमाफी जाहीर करण्यात आल्या. यात कधी शेतीच्या आकारमानावर तर कधी किमान रक्कम ठरवून कर्जमाफी घोषणा करण्यात आली. मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकालेला नाही. विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मागील तीनही कर्ज माफीचा फायदा होऊ शकलेला नाही. अशात नव्याने स्थापन झालेल्या सरकार मतदार म्हणून बळीराजाने भरभरून मतदान करीत रेकॉर्ड तोडून सरकार दिले आहे. आता त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे." - कृष्णा डफरे, शेतकरी

"गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यात बँकेची हुशारी कारणीभूत आहे. काही शेतकऱ्यावर २००३ पासून कर्ज आहे. बँकेने पाहिली कर्जमाफी केली तेव्हा कर्ज रकमेची असलेली मुद्दल आणि यावर व्याज बेरीज करून या रकमेची आकडेवारी बँकेने शासनाला दिली. याला पुनर्गठन असे नाव दिले. या हुशारीमुळेच शेतकरी गेल्या तीन कर्जमाफीत बसलेला नाही. त्यामुळे आता तरी पुनर्गठन शब्द वगळून सरसकट अशी कर्ज माफी जाहीर करण्यात यावी." - महादेव नखाते शेतकरी कृती समिती

टॅग्स :Farmerशेतकरीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाfarmingशेतीnagpurनागपूर