शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पेंचमध्ये पाच टीएमसी पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 8:35 PM

उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली.

ठळक मुद्देबावनकुळे यांची मागणी : शिवराज सिंग चौहान यांच्याशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली.नवी दिल्लीत मुख्यमंत्री चौहान व पालकमंत्री बावनकुळे यांची केंद्रीय कोळसामंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मध्यप्रदेशमधील चौराई धरणामुळे पेंचमधील पाणीसाठा कमी झाला असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पेंचमधून नागपूर व भंडारा जिल्ह्याला पिण्यासाठ़ी पाणीपुरवठा करण्यात येतो. नागपूर व भंडाऱ्यातील ३० लाख लोकसंख्येला टंचाईचा सामना करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चौराई धरणातून पाच टीएमसी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री चौहान यांना करण्यात आली.चौराई जलाशयाचे काम यंदा पूर्ण झाले असून या जलाशयात ६० टक्के पाणी आहे. शिवाय चौराईच्या शेजारील भाग अजूनही विकसित झाला नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्यातून ५ टीएमसी पाणी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे. मध्यप्रदेशचा पाणीपुरवठा विस्कळीत न होता, हे पाणी महाराष्ट्राला देण्यात यावे, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले.सावनेरचा विकास आराखडा रखडला बावनकुळे यांनी दिल्लीत कोळसामंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेतली. सावनेर शहरासह परिसराचा ८० टक्के भाग हा कोळसा खाणीसाठी आरक्षित करण्यात आला असल्यामुळे सावनेरचा विकास आराखडा मंजूर होऊ शकला नाही. कोळसा खाणीसाठी आरक्षण करण्यात आले. पण अजूनपर्यंत कोणतेही भूसंपादन वेकोलिने केलेले नाही. त्यामुळे शेतकरी आणि शहरातील नागरिक अडचणीत सापडले आहे. तसेच शहराचा विकास आराखडा मंजूर करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, याकडे बावनकुळे यांनी कोळसामंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.आदासा खाणीचे काम सुरू नाही आदासा खाणीसाठी २०५.४६ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली. पण आजपर्यंत कोणतेही काम सुरु झाले नाही आणि भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांसाठी कोणताही करार करण्यात आला नाही. हेवती आणि मकरधोकडा या दोन्ही गावांचे पुनर्वसनही झाले नाही. हे दोन्ही विषय लवकर सोडविण्यात यावे, अशी विनंतीही कोळसा मंत्र्यांना करण्यात आली. याशिवाय कामठी रेल्वे स्टेशन आणि जवळच्या रेल्वे स्टेशनच्या समस्यांवरही दोन्ही मंत्र्यांची चर्चा झाली.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे