शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

२,५५३ गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले; गावांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:39 IST

Nagpur : विभागीय आयुक्तांच्या बैठकीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपचखेडी : भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्ह्यांतील काही गावांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर आली. या प्रकल्पाला ४२ वर्षे पूर्ण झाली असून, या काळात काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, २,५५३ गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही रखडले आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नागपूर शहरात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी (दि. २९) बैठक बोलावली असून, या बैठकीतील निर्णयाकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

या प्रकल्पामुळे नागपूर जिल्ह्यातील ५१, भंडारा ३४ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील  दोन अशी एकूण ८७ गावांमधील १५,१९१ कुटुंबे प्रभावित झाली. यातील १२,६३८ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले असून, २,५५३ कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप व्हायचे आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. पवनी (जिल्हा भंडारा) तालुक्यातील नेरला येथील १,२३६ व खापरी (रेहपाडे) येथील ४७८, कुही (जिल्हा नागपूर) तालुक्यातील रुयाड (टेकेपार) येथील १३२, चंद्रपूर जिल्ह्यातील सायमारा (चक) व सावंगी (दीक्षित) या दोन गावांमधील २०७ अशा एकूण २,५५३ कुटुंबाचे पुनर्वसन रखडले असल्याचे प्रशासनाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे.

ही समस्या सोडविण्यास दिरंगाई होत असल्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यात प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करून ते राज्य सरकारकडे पाठविले जाईल, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. या समस्येवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा व तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी जीवनापूर, ता. कुही येथील प्रकल्पग्रस्त उमाजी शिवरकर यांनी केली आहे. 

किंमत ७० पटींनी वाढलीगोसेखुर्द प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. २२ मे २०२५ च्या प्रशासकीय मान्यतेनुसार ही किंमत २५,९७२.६९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ४२ गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन प्रस्तावित असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. शासन व प्रशासन पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप एजाज अली सय्यद यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर