शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२,५५३ गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले; गावांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 19:39 IST

Nagpur : विभागीय आयुक्तांच्या बैठकीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपचखेडी : भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तीन जिल्ह्यांतील काही गावांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर आली. या प्रकल्पाला ४२ वर्षे पूर्ण झाली असून, या काळात काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, २,५५३ गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही रखडले आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नागपूर शहरात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी (दि. २९) बैठक बोलावली असून, या बैठकीतील निर्णयाकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

या प्रकल्पामुळे नागपूर जिल्ह्यातील ५१, भंडारा ३४ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील  दोन अशी एकूण ८७ गावांमधील १५,१९१ कुटुंबे प्रभावित झाली. यातील १२,६३८ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले असून, २,५५३ कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप व्हायचे आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. पवनी (जिल्हा भंडारा) तालुक्यातील नेरला येथील १,२३६ व खापरी (रेहपाडे) येथील ४७८, कुही (जिल्हा नागपूर) तालुक्यातील रुयाड (टेकेपार) येथील १३२, चंद्रपूर जिल्ह्यातील सायमारा (चक) व सावंगी (दीक्षित) या दोन गावांमधील २०७ अशा एकूण २,५५३ कुटुंबाचे पुनर्वसन रखडले असल्याचे प्रशासनाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे.

ही समस्या सोडविण्यास दिरंगाई होत असल्याने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यात प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करून ते राज्य सरकारकडे पाठविले जाईल, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. या समस्येवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा व तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी जीवनापूर, ता. कुही येथील प्रकल्पग्रस्त उमाजी शिवरकर यांनी केली आहे. 

किंमत ७० पटींनी वाढलीगोसेखुर्द प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. २२ मे २०२५ च्या प्रशासकीय मान्यतेनुसार ही किंमत २५,९७२.६९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ४२ गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन प्रस्तावित असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. शासन व प्रशासन पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप एजाज अली सय्यद यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर