शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

पाठ्यपुस्तकांसाठी १ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:13 IST

शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ विद्यार्थ्यांचा समावेश : लॉकडाऊन उघडताच सुरू होणार पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उघडताच तालुकास्तरावर पुस्तकांचा पुरवठा होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.केंद्र शासनाच्या ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटला भेट देऊन पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्र्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली. तालुकास्तरावरून ऑनलाईन पद्धतीने वर्ष २०१८-१९ च्या युडायसनुसार वर्ग, विषय, विद्यार्थीनिहाय नोंदणी करण्यात आली. शाळा भरलेल्या ‘यूडीआयएसई’ डाटानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ८९,३७० विद्यार्थी, सहावी ते आठवीपर्यंत ७०,३११ अशा एकूण १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. जि.प. माध्यमिक शिक्षण विभाग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून ब्लॉकस्तरावर ही पुस्तके रवाना होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. कुठलाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही.विशेष म्हणजे, राज्य स्तरावरून बालभारतीकडे पुस्तके तयार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच राज्य स्तरावरूनच पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक वगळता इतर सर्व वाहतुकींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. लॉकडाऊन संपुष्टात येताच पुरवठाधाराकडून तालुकास्तरावर पुस्तके पोहचविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जेव्हाही शाळा सुरू होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होतील, याचेही नियोजन जि.प.च्या शिक्षण विभागाने केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर