शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांसाठी १ लाख ५९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 18:13 IST

शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ विद्यार्थ्यांचा समावेश : लॉकडाऊन उघडताच सुरू होणार पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय, जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पुस्तकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बालभारतीकडे नोंदणी केली आहे. शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, राज्यस्तरावरून पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन उघडताच तालुकास्तरावर पुस्तकांचा पुरवठा होणार असून, विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.केंद्र शासनाच्या ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे धोरण आहे. त्यानुसार जि.प. च्या शाळांनी बालभारतीच्या वेबसाईटला भेट देऊन पटसंख्येनुसार ही नोंदणी करावयाची होती. नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्र्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली. तालुकास्तरावरून ऑनलाईन पद्धतीने वर्ष २०१८-१९ च्या युडायसनुसार वर्ग, विषय, विद्यार्थीनिहाय नोंदणी करण्यात आली. शाळा भरलेल्या ‘यूडीआयएसई’ डाटानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ८९,३७० विद्यार्थी, सहावी ते आठवीपर्यंत ७०,३११ अशा एकूण १ लाख ५९ हजार ६८१ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. जि.प. माध्यमिक शिक्षण विभाग नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पुस्तके उपलब्ध करून देणार आहे. पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून ब्लॉकस्तरावर ही पुस्तके रवाना होतील. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. कुठलाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही.विशेष म्हणजे, राज्य स्तरावरून बालभारतीकडे पुस्तके तयार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच राज्य स्तरावरूनच पुरवठाधारकही मंजूर झाला आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक वगळता इतर सर्व वाहतुकींवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. लॉकडाऊन संपुष्टात येताच पुरवठाधाराकडून तालुकास्तरावर पुस्तके पोहचविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जेव्हाही शाळा सुरू होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध होतील, याचेही नियोजन जि.प.च्या शिक्षण विभागाने केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर