शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागात ‘रेड बग’ ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 10:52 IST

नागपूर ग्रामीण भागात ‘रेड बग’मुळे शेतकऱ्यांसह कापूस हाताळणीचे काम करणाऱ्या मजुरांना त्वचेचे आजार जडायला सुरुवात झाली असून, याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह मजुरांना त्वचेचा आजार भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी कपाशीवर बोंडअळींसोबतच ‘रेड बग’ (लाल ढेकूण)चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस शेतातून घरी आणल्यानंतर शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही घरीच साठवून ठेवला आहे. काहींनी तो आता विकायला सुरुवात केली आहे. मात्र, या ‘रेड बग’मुळे शेतकऱ्यांसह कापूस हाताळणीचे काम करणाऱ्या मजुरांना त्वचेचे आजार जडायला सुरुवात झाली असून, याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.भिवापूर तालुक्यातील नांद, भगवानपूर, चिखलापार, बेसूर, धामणगाव, लोणारा यासह परिसरातील गावांमधील शेतकरी व मजुरांना या ‘रेड बग’मुळे त्वचेचे आजार जडल्याचे दिसून येते. त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात खाज येत असून, शरिरावर ठिकठिकाणी लाल रंगाचे चट्टे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या आजाराने त्रस्त झाला आहे. याची प्रचिती नांद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाढलेल्या रुग्णांच्या संख्येवरून येत असून, त्यात बहुतांश रुग्ण त्वचेच्या आजाराचे आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.शेवटच्या वेचणीच्या कापसावर या ‘रेड बग’चा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून आले. हे ‘रेड बग’ कापसासोबत शेतातून शेतकऱ्यांच्या घरी आले.

कृषी विभाग अनभिज्ञया आजाराबाबत कृषी विभागाला अद्याप कोणतीही माहिती नाही. परिसरातील मजुरांना कामाअभावी कापूस हाताळणीची कामे करावी लागत असून, शेतकऱ्यांना हा कापूस मिळेल त्या भावात विकावा लागत आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांसह मजुरांनी या आजाराकडे दुर्लक्ष केले. नंतर काहींनी उपचाराला सुरुवात केली. काहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यायला सुरुवात केली तर काहींनी गावठी इलाजावर भर दिला आहे. काही रुग्ण ‘काऊंटर मेडिसीन’ घेऊन काळ काढत आहेत.

लाळ व विष्ठा घातककापूस हे ‘रेड बग’चे खाद्य आहे. त्यांचे जीवनचक्र कापसावरच पूर्ण होते. ते त्यांची लाळ व विष्ठा कापसावरच सोडतात. या ‘रेड बग’ची संख्या अधिक असल्याने लाळ व विष्ठा सोडण्याचे प्रमाणही तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही बाबी साध्या डोळ्याने सहज. दिसून येत नाही. त्यांची लाळ व विष्ठा घातक असून, या लाळ व विष्ठा पसरलेल्या कापसाच्या संपर्कात जो येईल, त्याच्या शरीराला खाज सुटते. त्यानंतर या खाजेचे रूपांतर लाल रंगाच्या चट्ट्यांमध्ये होते.

योग्य उपचार घ्यावेतखाज व शरीरावर लाल चट्टे असलेल्या रुग्णांची संख्या परिसरात वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्याची संख्या तुलनेत कमी आहे. हा आजार कापूस हाताळणाऱ्या मजुरांमध्ये अधिक दिसून येतो. त्वचेचा हा आजार प्राथमिक उपचाराने बरा होतो. त्यामुळे शेतकरी व मजुरांनी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी योग्य उपचारावर भर द्यावा.- डॉ. मदन राजपूत, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, नांद.

टॅग्स :Healthआरोग्य