शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नागपूर ग्रामीण भागात ‘रेड बग’ ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 10:52 IST

नागपूर ग्रामीण भागात ‘रेड बग’मुळे शेतकऱ्यांसह कापूस हाताळणीचे काम करणाऱ्या मजुरांना त्वचेचे आजार जडायला सुरुवात झाली असून, याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह मजुरांना त्वचेचा आजार भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी कपाशीवर बोंडअळींसोबतच ‘रेड बग’ (लाल ढेकूण)चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस शेतातून घरी आणल्यानंतर शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही घरीच साठवून ठेवला आहे. काहींनी तो आता विकायला सुरुवात केली आहे. मात्र, या ‘रेड बग’मुळे शेतकऱ्यांसह कापूस हाताळणीचे काम करणाऱ्या मजुरांना त्वचेचे आजार जडायला सुरुवात झाली असून, याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.भिवापूर तालुक्यातील नांद, भगवानपूर, चिखलापार, बेसूर, धामणगाव, लोणारा यासह परिसरातील गावांमधील शेतकरी व मजुरांना या ‘रेड बग’मुळे त्वचेचे आजार जडल्याचे दिसून येते. त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात खाज येत असून, शरिरावर ठिकठिकाणी लाल रंगाचे चट्टे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या आजाराने त्रस्त झाला आहे. याची प्रचिती नांद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाढलेल्या रुग्णांच्या संख्येवरून येत असून, त्यात बहुतांश रुग्ण त्वचेच्या आजाराचे आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.शेवटच्या वेचणीच्या कापसावर या ‘रेड बग’चा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून आले. हे ‘रेड बग’ कापसासोबत शेतातून शेतकऱ्यांच्या घरी आले.

कृषी विभाग अनभिज्ञया आजाराबाबत कृषी विभागाला अद्याप कोणतीही माहिती नाही. परिसरातील मजुरांना कामाअभावी कापूस हाताळणीची कामे करावी लागत असून, शेतकऱ्यांना हा कापूस मिळेल त्या भावात विकावा लागत आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांसह मजुरांनी या आजाराकडे दुर्लक्ष केले. नंतर काहींनी उपचाराला सुरुवात केली. काहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यायला सुरुवात केली तर काहींनी गावठी इलाजावर भर दिला आहे. काही रुग्ण ‘काऊंटर मेडिसीन’ घेऊन काळ काढत आहेत.

लाळ व विष्ठा घातककापूस हे ‘रेड बग’चे खाद्य आहे. त्यांचे जीवनचक्र कापसावरच पूर्ण होते. ते त्यांची लाळ व विष्ठा कापसावरच सोडतात. या ‘रेड बग’ची संख्या अधिक असल्याने लाळ व विष्ठा सोडण्याचे प्रमाणही तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही बाबी साध्या डोळ्याने सहज. दिसून येत नाही. त्यांची लाळ व विष्ठा घातक असून, या लाळ व विष्ठा पसरलेल्या कापसाच्या संपर्कात जो येईल, त्याच्या शरीराला खाज सुटते. त्यानंतर या खाजेचे रूपांतर लाल रंगाच्या चट्ट्यांमध्ये होते.

योग्य उपचार घ्यावेतखाज व शरीरावर लाल चट्टे असलेल्या रुग्णांची संख्या परिसरात वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्याची संख्या तुलनेत कमी आहे. हा आजार कापूस हाताळणाऱ्या मजुरांमध्ये अधिक दिसून येतो. त्वचेचा हा आजार प्राथमिक उपचाराने बरा होतो. त्यामुळे शेतकरी व मजुरांनी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी योग्य उपचारावर भर द्यावा.- डॉ. मदन राजपूत, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, नांद.

टॅग्स :Healthआरोग्य