शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

भारत - पाकिस्तान सामन्यावर रेकॉर्ड ब्रेक सट्टा! ४० ते ४५ हजार कोटींचा आकडा

By नरेश डोंगरे | Published: October 14, 2023 11:37 PM

मध्य भारतातून ३ हजारांवर कोटींच्या सट्ट्याची खयवाडी लगवाडी, बड्या बुकींचे दुबई तर नागपूरच्या बुकींचे गोव्यात हेडक्वॉर्टर

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: क्रिकेट विश्वातील परंपरागत शत्रू मानले जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज झालेल्या क्रिकेट सामन्यावर बुकी बाजारात आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक सट्टा लागला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या सामन्यावर ४० ते ४५ हजार कोटींचा सट्टा लागला असून, एकट्या विदर्भ तसेच मध्य भारतातून बुकींनी ३ हजारांवर कोटींच्या सट्ट्याची खयवाडी लगवाडी केल्याचे वृत्त आहे. एका मॅचवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सट्टा लागल्याचे बुकींचे मत आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा हंगाम बुकी बाजारासाठी दिवाळीचे पर्व असते. एकेका सामन्यावर नव्हे एकेका चेंडूवर बुकीबाजारात कोट्यवधींची खयवाडी होते. त्यात विश्वचषकासाठी होणारा भारत-पाकिस्तान संघातील क्रिकेट सामना बुकी बाजारासाठी हजारो कोटींच्या उलाढालीचा 'डाव' ठरतो. केवळ या दोन देशात नव्हे तर जागतिक बुकी बाजारात सर्वाधिक सट्टा या दोन संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यावर लागतो. शनिवारी १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत-पाक संघ भिडणार असल्याचे आधीच जाहिर झाल्याने बुकींनी पूर्वतयारी करून ठेवली होती. एकाच दिवशी कोट्यवधींचे वारे-न्यारे होत असताना कारवाईचे बालंट नको म्हणून बड्या बुकींनी यावेळी क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्याचे मुख्यालय दुबईत ठेवले. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या सट्ट्याचे मध्य भारतातील सर्वात मोठे केंद्र म्हणून नागपूरची चर्चा होते. येथील बुकी विश्वचषकाच्या हंगामात हजारो कोटींची खयवाडी लगवाडी करतात. मात्र, यावेळी नागपुरातील बहुतांश बड्या बुकींनी खयवाडीसाठी गोव्यात हेडक्वॉर्टर बनविले आणि तेथूनच खयवाडी केली.

कुणी हॉटेल तर कुणी फ्लॅटमध्ये

नागपूर-विदर्भातील ८० टक्के बडे बुकींनी आज गोव्यातून खयवाडी केली. कुण्या बुकीने आपल्या पंटर्सला गोवा, पणजीतील हॉटेलमध्ये, कुणी फार्म हाऊस तर कुणी भाड्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये बसवून अड्डे चालविल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. विश्वचषकात ही मंडळी तेथूनच रोज शेकडो कोटींची खयवाडी करणार आहे.

सर्व कटिंग दुबईतच

सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरसह मध्य भारतातील निवडक बुकींचा अपवाद वगळता ईतर सर्व बुकी गोव्यातून खयवाडी करीत असले तरी ते दुबईतच कटिंग करतात. अर्थात् घेतलेल्या सट्ट्याची पलटी (उतारी) दुबईतच होते.

बुकींचे भाकित पाकिस्तानच्या विरोधातच

आजच्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तान टिकणार नाही, असे भाकित बुकींनी वर्तविले होते. त्यामुळे मॅचमध्ये प्रारंभी पासून बुकींनी ४६-५० आणि ४८-५० असाच सामन्याचा रेट दिला होता. अर्थात भारत जिंकण्याचा दावा करणाऱ्या सटोड्यांना १०० रुपये लावल्यास ४६ (नंतर ४८ रुपये) मिळतील आणि पाकिस्तान जिंकण्याचा दावा करणाऱ्या सटोड्यांना १०० रुपये लावल्यास दोनशे रुपये मिळतील, असे जाहिर केले होते. मात्र मध्यंतरी काही वेळेसाठी हा रेट ७९ -८१ वर पोहचला होता.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी