शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:50 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली तर ती अटलबिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शिक्षण मंचचे प्रभुजी देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्देप्रभुजी देशपांडे : लोकनायक बापुजी अणे जयंती साजरी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली तर ती अटलबिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शिक्षण मंचचे प्रभुजी देशपांडे यांनी केले.लोकनायक बापुजी अणे स्मारक समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व साप्ताहिक विदर्भ मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी टिळक पत्रकार भवन येथे स्वतंत्र विदर्भ राज्याचे प्रणेते लोकनायक बापुजी अणे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीचे अ‍ॅड. अविनाश काळे, जनमंचचे प्रमोद पांडे, पत्रकार भवन ट्रस्टचे ट्रस्टी विश्वास इंदूरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाले, विदर्भ हे नैसर्गिक संसाधनांनी भरलेले असून, आतापर्यंत महाराष्ट्र शासनात त्याचे दोहन झाले. कापसाच्या पिकामुळे विदर्भाची भरभराट होऊ शकते व पूरक उद्योगांचा विस्तार होऊ शकतो. टाटांनी बांबू उद्योगाकडे लक्ष वेधल्यानंतरच सरकारला जाग आली. ब्रिटिशांचे राज्य गेल्यानंतर केवळ राज्यकर्ते बदलल्याची टीका करीत विदर्भाला कायम मागे राहावे लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अ‍ॅड. अविनाश काळे यांनी वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पाचा उल्लेख करीत ६८० किमीचा हा प्रकल्प करण्यासाठी सरकारजवळ इच्छाशक्ती नसल्याची टीका केली. लखमापूर धरणाच्या संदर्भातही दुर्लक्ष झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. विश्वास इंदूरकर म्हणाले, विदर्भाच्या निर्मितीसाठी भाजपाच्या नेत्यांनी अ‍ॅफिडेव्हीट सादर केले होते, मात्र तेही बदलले आहेत. विदर्भासाठी जनमत नाही असे म्हणतात, मात्र आम्ही ९७ टक्के जनमत तयार केले होते. त्यामुळे आता विदर्भातील जनतेने निवडणुकीवर बहिष्कार घालून सत्ताधारी व विरोधकांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रवर विदर्भाचा शेष बसवावा व तो पैसा विदर्भाकडे वळविणे आवश्यक असल्याचे सांगत स्वतंत्र विदर्भासाठी राज्य सरकारची जबरदस्त इच्छाशक्ती असणे गरजेचे असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. विदर्भ मिररचे अ‍ॅड. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीVidarbhaविदर्भ