शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

विदर्भाची निर्मिती ही अटलजींना खरी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:50 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली तर ती अटलबिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शिक्षण मंचचे प्रभुजी देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्देप्रभुजी देशपांडे : लोकनायक बापुजी अणे जयंती साजरी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात काही राज्यांची निर्मिती झाली व वेगळ्या विदर्भाच्या स्थापनेबाबत ते सकारात्मकही होते. सध्या राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपा शासनाच्या काळात वेगळ्या विदर्भाची निर्मिती झाली तर ती अटलबिहारी वाजपेयी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन शिक्षण मंचचे प्रभुजी देशपांडे यांनी केले.लोकनायक बापुजी अणे स्मारक समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व साप्ताहिक विदर्भ मिरर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी टिळक पत्रकार भवन येथे स्वतंत्र विदर्भ राज्याचे प्रणेते लोकनायक बापुजी अणे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीचे अ‍ॅड. अविनाश काळे, जनमंचचे प्रमोद पांडे, पत्रकार भवन ट्रस्टचे ट्रस्टी विश्वास इंदूरकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाले, विदर्भ हे नैसर्गिक संसाधनांनी भरलेले असून, आतापर्यंत महाराष्ट्र शासनात त्याचे दोहन झाले. कापसाच्या पिकामुळे विदर्भाची भरभराट होऊ शकते व पूरक उद्योगांचा विस्तार होऊ शकतो. टाटांनी बांबू उद्योगाकडे लक्ष वेधल्यानंतरच सरकारला जाग आली. ब्रिटिशांचे राज्य गेल्यानंतर केवळ राज्यकर्ते बदलल्याची टीका करीत विदर्भाला कायम मागे राहावे लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अ‍ॅड. अविनाश काळे यांनी वैनगंगा ते नळगंगा प्रकल्पाचा उल्लेख करीत ६८० किमीचा हा प्रकल्प करण्यासाठी सरकारजवळ इच्छाशक्ती नसल्याची टीका केली. लखमापूर धरणाच्या संदर्भातही दुर्लक्ष झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. विश्वास इंदूरकर म्हणाले, विदर्भाच्या निर्मितीसाठी भाजपाच्या नेत्यांनी अ‍ॅफिडेव्हीट सादर केले होते, मात्र तेही बदलले आहेत. विदर्भासाठी जनमत नाही असे म्हणतात, मात्र आम्ही ९७ टक्के जनमत तयार केले होते. त्यामुळे आता विदर्भातील जनतेने निवडणुकीवर बहिष्कार घालून सत्ताधारी व विरोधकांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रवर विदर्भाचा शेष बसवावा व तो पैसा विदर्भाकडे वळविणे आवश्यक असल्याचे सांगत स्वतंत्र विदर्भासाठी राज्य सरकारची जबरदस्त इच्छाशक्ती असणे गरजेचे असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. विदर्भ मिररचे अ‍ॅड. संदेश सिंगलकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीVidarbhaविदर्भ