शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

आरडीएसएस व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे होणार ऊर्जा क्षेत्राचा कायापालट - विश्वास पाठक

By आनंद डेकाटे | Updated: November 18, 2023 16:37 IST

दोन्ही योजना यशस्वीपणे राबवण्याच्या सूचना

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारी आरडीएसएस योजना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या दोन योजनांमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचा कायापालट होणार असून त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असे एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी शनिवारी येथे सांगितले.

महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. सुनील केदार, आ. प्रवीण दटके, आ. राजू पारवे, आ. आशिष जैस्वाल, आ. टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकाटे आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख उपस्थित होते. तसेच महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे आणि महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक वैभव पाथोडे उपस्थित होते.

विश्वास पाठक म्हणाले, देशातील वाढती वीज मागणी ध्यानात घेऊन वीज वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरासाठी आरडीएसएस ही महत्त्वाकांक्षी योजना लागू केली आहे. त्याच्या अंतर्गत राज्यात ४२ हजार कोटींचे प्रकल्प राबविण्यात येत असून नागपूर जिल्ह्याचा वाटा चार हजार कोटींचा आहे. त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन लागू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सात हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा लाभ होण्यासोबतच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होणे आणि ग्रामीण भागात तीस हजार कोटींची गुंतवणूक होईल. या दोन योजनांमुळे आगामी अडीच वर्षात राज्याचे ऊर्जा क्षेत्र आमुलाग्र बदलणार आहे.

-जिल्ह्यातील वीज वितरण ११०० मेगावॅटने वाढवण्यात येत आहे

आरडीएसएस योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात नवीन ५३ वीज उपकेंद्रे उभारण्यात येत आहेत व ४५ उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात येत आहे. २०३० सालापर्यंत नागपूरची विजेची मागणी ध्यानात घेऊन जिल्ह्यातील वीज वितरण क्षमता ११०० मेगावॅटने वाढविण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजGovernmentसरकार